शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

साखरेचा उठाव नसल्याने कारखानदारी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:24 IST

सरवडे : गेल्या गळीत हंगामातील शिल्लक साखर व चालू वर्षीही साखरेचे प्रचंड उत्पादन झाले आहे. त्यामुळे साखरेला ...

सरवडे : गेल्या गळीत हंगामातील शिल्लक साखर व चालू वर्षीही साखरेचे

प्रचंड उत्पादन झाले आहे. त्यामुळे साखरेला भाव नाही. बाजारात साखरेचा उठाव नसल्याने कारखानदारी अडचणीत सापडली आहे. केंद्र शासनाने हमी भाव निश्चित करत शेतकरी व साखर कारखानदारी टिकण्यासाठी धोरण ठरवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील यांनी केले.

बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगासाखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभप्रसंगी ते बोलत होते. हंगामाची सांगता संचालक जगदीश पाटील व त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्या हस्ते केली. पाटील म्हणाले की, चालू गळीत हंगामात ६ लाख ८० हजार ४२६ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, ८ लाख ६५ हजार ६०० साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे, तर सरासरी १२.७२ साखर उतारा मिळवला आहे, तर आजतागायत कारखान्याकडे ९ लाख साखर पोती शिल्लक आहेत. गतसालची २ लाख २३ हजार साखर पोती शिल्लक आहेत. या हंगामात आजअखेर सहवीज प्रकल्पातून ६ कोटी ३१ लाख ५०० युनिट वीजनिर्मिती झाली असून, त्यापैकी ४ कोटी ८५ लाख युनिट वीज विक्री केली आहे. अजूनही दीड महिना सहवीज प्रकल्प सुरू राहणार असून, सुमारे २ कोटी युनिट वीजनिर्मिती होईल.

यावेळी उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक आर.डी. देसाई यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते.

.................

३० बिद्री

बिद्री कारखान्याच्या गळीत हंगाम समाप्ती समारंभप्रसंगी संचालक जगदीश पाटील, जयश्री पाटील व संचालक मंडळ उपस्थित होते.