शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

माणदेशी महिला खऱ्या अर्थाने कारभारणी : चेतना सिन्हा, राजर्षी शाहू मराठा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 11:20 IST

कोल्हापूर : माणदेशी महिला अशिक्षित असल्या, तरी त्या व्यवहारज्ञानात पुढे आहेत. त्या बळावरच त्यांनी रिझर्व्ह बॅँकेकडून माणदेशी बॅँकेला परवाना ...

ठळक मुद्देमाणदेशी महिला खऱ्या अर्थाने कारभारणी : चेतना सिन्हाराजर्षी शाहू मराठा महोत्सव

कोल्हापूर : माणदेशी महिला अशिक्षित असल्या, तरी त्या व्यवहारज्ञानात पुढे आहेत. त्या बळावरच त्यांनी रिझर्व्ह बॅँकेकडून माणदेशी बॅँकेला परवाना मिळविला. पाचवीला पुजलेल्या दारिद्र्य, अडचणी, संघर्ष व कष्टाला त्या आनंदाने सामोरे गेल्या; त्यामुळे माणदेशी परिसर जरी सधन नसला, तरी येथील महिला या खऱ्या अर्थाने मालकीन म्हणजे कारभारणी आहेत, असे गौरवोद्गार माण (जि. सातारा) येथील समाजसेविका चेतना सिन्हा यांनी काढले.मराठा महासंघातर्फे आयोजित राजर्षी शाहू मराठा महोत्सवात शाहू स्मारक भवन येथे ‘महिला सबलीकरण’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. प्रमुख उपस्थिती मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, महिला जिल्हाध्यक्ष शैलजा भोसले, बीना देशमुख, दीपा ढोणे, सुनीता घाटगे, छाया पवार, तेजस्विनी नलवडे, वंदना भोसले, महापालिका अधिकारी निवास कोळी, आदींची होती.चेतना सिन्हा म्हणाल्या, माणदेशी बॅँकेची संकल्पना सुचन्यामागे तेथील अशिक्षित व गरीब महिलांची धडपड कारणीभूत आहे. जिद्द, विनयशिलता व प्रामाणिकपणा या गोष्टींच्या बळावर या महिलांनी रिझर्व्ह बॅँकेलाही माणदेशी बॅँकेचा परवाना देणे भाग पडले. तो देताना अधिकाऱ्यांनी अशिक्षित महिलांना परवाना द्यायचा कसा? त्या कशा पद्धतीने कारभार करू शकतील. त्यावर या महिलांनी आमच्या काळात गावांमध्ये शाळाच नसल्याने आम्ही शिकू शकलो नाही; त्यामुळे आम्हाला लिहिता, वाचता येत नसले, तरी पैसे मोजता येतात, बॅँकेचे व्याजही मोजू शकतो या समर्पक व विचार करायला लावणाऱ्या उत्तराने अधिकारीही अवाक् झाले.

घिसाडी, मेंढपाळ, रोजगारावर जाणाऱ्या महिलांनी एकत्र येऊन ही बॅँक निर्माण केली. स्वत:च्या मिळकतीतील पै अन् पै बचत करून सर्वांसमोर एक उदाहरण घालून दिले. त्यांच्या दूरदृष्टीच्या विचाराने येथील मुले शिक्षण, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत सातासमुद्रापार गेली आहेत. कष्ट आणि संघर्षातही आनंद मानून त्याला हसतच सामोरे जाणाºया या महिलांचा खरोखरच अभिमान वाटतो.त्या पुढे म्हणाल्या, आयुष्य हे एकदा मिळते, त्यामुळे ते मौल्यवान असून, स्वच्छंदी व मुक्तपणे जगून त्याचा आनंद घ्या. महिलांनी शिकून इतरांनाही शिकण्यास प्रेरणा द्यायला हवी.

भूक विसरण्यासाठी गातो गाणीमाणदेशी बॅँकेनंतर महिलांनी स्वत:चे रेडिओ स्टेशन सुरू केले आहे. यामध्ये केराबाई सरगर या महिला स्वत: गाणी म्हणतात. त्याला श्रोतेही भरभरून दाद देतात. इतकी सुंदर गाणी कसे गाता? हा प्रश्न त्यांना विचारल्यावर वयाच्या ११ व्या वर्षी माझे लग्न झाले, गरोदर राहिल्यावर वारंवार लागणारी भूक विसरण्यासाठी मी गाणी म्हणायला लागले, असे सांगितले. यावरून ग्रामीण भागातील महिलांचे टॅलेंट दिसून येते, असे चेतना सिन्हा यांनी सांगितले. हा प्रसंग प्रत्येक महिलेसह माणसालाही अंतर्मुख व्हायला लावणारा असून, यामुळे उपस्थितांनाही गलबलून आले.

 

 

टॅग्स :Shahu Maharaj Jayantiशाहू महाराज जयंतीkolhapurकोल्हापूर