शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिकूल परिस्थितीमध्ये १९६५ चे युद्ध भारताने जिंकले : दांडेकर

By admin | Updated: June 24, 2015 00:41 IST

--राजर्षी शाहू व्याख्यानमाला

कोल्हापूर : पाकिस्तानच्या तुलनेमध्ये जुनी युद्धसामग्री असतानाही भारतीय सैन्याने १९६५ चे युद्ध जिंकले. चीनविरुद्धच्या १९६२ च्या युद्धातील पराभव, पंतप्रधान नेहरूंचे निधन अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे युद्ध झाले, पण मोठ्या हुशारीने भारतीय सैन्याने लाहोरपर्यंत धडक मारली, असे प्रतिपादन युद्धशास्त्र अभ्यासक विश्वास दांडेकर यांनी केले. कोल्हापुरातील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे शाहू स्मारक भवनात सुरू असलेल्या शाहू व्याख्यानमालेत मंगळवारी दांडेकर बोलत होते. भारत-पाक युद्धाची ५० वर्षे हा व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. भारती पाटील होत्या. दांडेकर म्हणाले, चीनसोबत १९६२ मध्ये भारताचा विदारक पराभव झाला. या पराभवामुळे पंतप्रधान नेहरू खचून गेले. या युद्धानंतर त्यांचे निधनही झाले. नेहरूंनंतर लालबहादूर शास्त्री हे पंतप्रधान झाले. शास्त्री हे कमकुवत पंतप्रधान असा देशात आणि परदेशातही गैरसमज निर्माण झाला होता. अन्नधान्याच्या समस्येने देशाला ग्रासले होते. अशातच चीन आणि पाकची मैत्री वृद्धिंगत होत होती. अमेरिकेकडून पाकला ‘पॅटर्न’सारखे अत्याधुनिक रणगाडे व शस्त्रसामग्री मिळाली होती. त्यामुळे पाकने भारताविरुद्ध १९६५ चे युद्ध पुकारले.दांडेकर म्हणाले, या युद्धात लष्कराला युद्ध तंत्राबाबतचे निर्णय घेण्याची मुभा देत लाल बहादूर शास्त्रींनी हे युद्ध जिंकले. तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या बुद्धीची चुणूकही या युद्धादरम्यान देशाने अनुभवली. कच्छ, जम्मू-काश्मीर आणि पंजाब या ठिकाणी हे युद्ध लढले गेले पण कमीत-कमी शस्त्रसाठा खर्च करत भारतीय सैन्यांनी लाहोरपर्यंत धडक मारली. या युद्धात सैन्याला पंजाबमधील शेतकऱ्यांपासून ते जम्मू-काश्मीरमधील नागरिकांची कोणत्या ना कोणत्या मार्गाने मदत झाली. काश्मीरमधील जनतेने पाकमधून नागरिकांच्या वेषात आलेल्या सैनिकांना मदत केली नाही. पंजाबमधील शेतकऱ्यांनी भारतीय विमानतळ उद्ध्वस्त करण्यासाठी पॅराशूटमधून उतरणाऱ्या पाक सैनिकांना पकडले. अमृतसर ते लाहोर या दरम्यानच्या मार्गावरील पाकिस्तानी सैन्यांची ठिकाणे शोधून त्यांना चकवा देण्यासाठी सीमेवरील तस्करांनीही मदत केली. आज हुकूमशाहीचे खूप वेड आहे पण सैन्य आणि जनता यांचा काय संबंध असतो याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण सैन्य हे या देशातील जनतेमधूनच आलेले असते. भारतामध्ये अनेक जाती समुदाय आणि धर्म असले तरी, एकात्मता हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. ही एकात्मता सैन्यातही असते. त्यामुळे भारतीय सैन्याकडून नागरी शासन बळकावण्याचे प्रयत्न झालेले नाहीत. याउलट पाकिस्तान आणि बांगलादेशामध्ये सैन्याकडून सत्ता ताब्यात घेण्याचे प्रकार घडलेले आहेत. भारत-पाकिस्तान युद्धानंतरच्या पन्नास वर्षांत भारताने ही गोष्ट कमावलेली आहे. हुकूमशाही ही कोणत्याही देशाला धोकादायकच असते, असे मतही दांडेकर यांनी व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात डॉ. भारती पाटील म्हणाल्या, प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानविरुद्धचे युद्ध जिंकले, याचा अभिमान बाळगला पाहिजे. या युद्धात काश्मीरमधील जनताही भारताशी एकरूप राहिली. प्रमुख वक्त्यांचे स्वागत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, डॉ. अशोक चौसाळकर, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे प्रशासनाधिकारी राजदीप सुर्वे उपस्थित होते. प्रा. सूर्यकांत गायकवाड यांनी आभार मानले.