शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

साखर निर्यात अनुदानावरुन भारताला धक्का, जागतिक व्यापार कराराचे उल्लंघन केल्याचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 17:31 IST

चालू वर्षी निर्यात अनुदानच देवू केलेले नसल्याने सध्या या निर्णयाचा भारतावर काहीच परिणाम होणार नाही.

चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : साखर निर्यात अनुदान देण्यावरुन जागतिक व्यापार संघटनेत सुरू असलेला खटल्याचा निकाल भारताच्या विरोधात गेला आहे. कृषी करारातील तरतुदींचे भारताने उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत संघटनेच्या पॅनेलने १२० दिवसात असलेली अनुदाने रद्द करा असा आदेश भारताला दिला आहे. या निर्णयाला भारत आव्हान देणार आहे. याचबराेबर चालू वर्षी निर्यात अनुदानच देवू केलेले नसल्याने सध्या या निर्णयाचा भारतावर काहीच परिणाम होणार नाही.जागतिक व्यापार संघटनेच्या कृषी करारानुसार कोणत्याही देशाला कृषी मालाच्या निर्यातीवर १० टक्केपेक्षा जादा अनुदान देता येत नाही. मात्र भारताने ते दिले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारताची स्वस्त साखर येवू लागल्याने साखरेच्या किमती २५ टक्क्यांनी घटल्या असल्याचा दावा करत ब्राझील, ऑस्ट्रेलिया आिण ग्वांटेमाला या देशांनी २०१९ मध्ये जागतिक व्यापार संघटेकडे तक्रार केली होती. या तक्रारीची सुनावणी संघटनेच्या पॅनेलने घेवून आपला निकाल मंगळवारी जाहीर केला आहे.भारताच्या साखर निर्यात अनुदानाच्या धोरणात सातत्य नाही. देशातंर्गत उत्पादन आणि निर्यातीवर १० टक्केपेक्षा जादा अनुदान देवू नये या करारातील तरतुदीचे भारताने २०१४ ते २०१९ या काळात उल्लंघन केलेले आहे. २०१८-१९ च्या हंगामात केंद्रआणि राज्य सरकारांनी मिळून वेगवेगळ्या स्वरुपात मदतीचे डझनभर आदेश काढून अनुदान दिले आहे. भारताने साखर निर्यातीसाठी देवू केलेली अनुदाने या निकालाच्या दिवसापासून १२० दिवसात रद्द केली पाहिजेत , असेही या आदेशात म्हटले आहे. या शिवाय साखर कारखान्यांना केंद्र सरकारने ठरवून दिलेला किमान निर्यात कोटा तसेच अन्य स्वरुपात प्रोत्साहन अशा स्वरुपात ५५ अब्ज रुपयांचे अनुदान भारताने दिले असल्याचा ठपका यात ठेवण्यात आला आहे.निकाल अस्विकारार्ह , आव्हान देणार: भारतजागतिक व्यापार संघटनेच्या पॅनेलने काढलेले निष्कर्श आणि दिलेला निकाल अस्विकारार्ह आहे. या विरोधात ॲपिलेट पॅनेलमध्ये आव्हान दिले जाईल असे भारताच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. या निकालाला ६० दिवसात आव्हान देता येते. मात्र सध्या ॲपिलेट पॅनेलच अस्तित्वात नाही.

जागतिक बाजारातील साखरेचे दर वधारलेले असल्याने चालू वर्षी भारत सरकारने साखर निर्यातीवर अनुदानच दिलेले नाही त्यामुळे या निकालाचा सध्यातरी भारतावर काहीच परिणाम होणार नाही. भविष्यातही इथेनॉल आणि साखर उत्पादनाचा मागणी पुरवठ्यानुसार समतोल साधल्यास काही परिणाम होणार नाही. -विजय औताडे, साखर उद्योगातील तज्ञ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने