शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

साखर निर्यात अनुदानावरुन भारताला धक्का, जागतिक व्यापार कराराचे उल्लंघन केल्याचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 17:31 IST

चालू वर्षी निर्यात अनुदानच देवू केलेले नसल्याने सध्या या निर्णयाचा भारतावर काहीच परिणाम होणार नाही.

चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : साखर निर्यात अनुदान देण्यावरुन जागतिक व्यापार संघटनेत सुरू असलेला खटल्याचा निकाल भारताच्या विरोधात गेला आहे. कृषी करारातील तरतुदींचे भारताने उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत संघटनेच्या पॅनेलने १२० दिवसात असलेली अनुदाने रद्द करा असा आदेश भारताला दिला आहे. या निर्णयाला भारत आव्हान देणार आहे. याचबराेबर चालू वर्षी निर्यात अनुदानच देवू केलेले नसल्याने सध्या या निर्णयाचा भारतावर काहीच परिणाम होणार नाही.जागतिक व्यापार संघटनेच्या कृषी करारानुसार कोणत्याही देशाला कृषी मालाच्या निर्यातीवर १० टक्केपेक्षा जादा अनुदान देता येत नाही. मात्र भारताने ते दिले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारताची स्वस्त साखर येवू लागल्याने साखरेच्या किमती २५ टक्क्यांनी घटल्या असल्याचा दावा करत ब्राझील, ऑस्ट्रेलिया आिण ग्वांटेमाला या देशांनी २०१९ मध्ये जागतिक व्यापार संघटेकडे तक्रार केली होती. या तक्रारीची सुनावणी संघटनेच्या पॅनेलने घेवून आपला निकाल मंगळवारी जाहीर केला आहे.भारताच्या साखर निर्यात अनुदानाच्या धोरणात सातत्य नाही. देशातंर्गत उत्पादन आणि निर्यातीवर १० टक्केपेक्षा जादा अनुदान देवू नये या करारातील तरतुदीचे भारताने २०१४ ते २०१९ या काळात उल्लंघन केलेले आहे. २०१८-१९ च्या हंगामात केंद्रआणि राज्य सरकारांनी मिळून वेगवेगळ्या स्वरुपात मदतीचे डझनभर आदेश काढून अनुदान दिले आहे. भारताने साखर निर्यातीसाठी देवू केलेली अनुदाने या निकालाच्या दिवसापासून १२० दिवसात रद्द केली पाहिजेत , असेही या आदेशात म्हटले आहे. या शिवाय साखर कारखान्यांना केंद्र सरकारने ठरवून दिलेला किमान निर्यात कोटा तसेच अन्य स्वरुपात प्रोत्साहन अशा स्वरुपात ५५ अब्ज रुपयांचे अनुदान भारताने दिले असल्याचा ठपका यात ठेवण्यात आला आहे.निकाल अस्विकारार्ह , आव्हान देणार: भारतजागतिक व्यापार संघटनेच्या पॅनेलने काढलेले निष्कर्श आणि दिलेला निकाल अस्विकारार्ह आहे. या विरोधात ॲपिलेट पॅनेलमध्ये आव्हान दिले जाईल असे भारताच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. या निकालाला ६० दिवसात आव्हान देता येते. मात्र सध्या ॲपिलेट पॅनेलच अस्तित्वात नाही.

जागतिक बाजारातील साखरेचे दर वधारलेले असल्याने चालू वर्षी भारत सरकारने साखर निर्यातीवर अनुदानच दिलेले नाही त्यामुळे या निकालाचा सध्यातरी भारतावर काहीच परिणाम होणार नाही. भविष्यातही इथेनॉल आणि साखर उत्पादनाचा मागणी पुरवठ्यानुसार समतोल साधल्यास काही परिणाम होणार नाही. -विजय औताडे, साखर उद्योगातील तज्ञ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने