शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

लोकसभा एकदिलाने लढवण्याचा ‘इंडिया’चा निर्धार, सतेज पाटील यांच्या पुढाकारातून आदित्य ठाकरेंसोबत बैठक

By समीर देशपांडे | Updated: January 10, 2024 15:23 IST

कोल्हापूर : महायुतीला विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पातळीवर ‘इंडिया’ आघाडी मजबूत होत असल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. माजी मंत्री ...

कोल्हापूर : महायुतीला विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पातळीवर ‘इंडिया’ आघाडी मजबूत होत असल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकाराने शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या आघाडीची बैठक बुधवारी सकाळी एका हॉटेलवर झाली. लोकसभेला उमेदवार कोणत्याही पक्षाचा व कोणही असो त्याच्या विजयासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.कॉंग्रेसच्या खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये महायुतीविरोधातील सर्व पक्ष एकत्र आले होते. त्यानंतर अशा पद्धतीने एकत्र येण्याची गरज व्यक्त करण्यात आली. त्यामुळेच सतेज पाटील यांनी ठाकरे आल्याची संधी घेत ही बैठक आयोजित केली. यावेळी भाकपचे नेते दिलीप पोवार यांच्या हस्ते ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले आणि याच पद्धतीने सध्याच्या केंद्र आणि राज्य सरकारविरोधात लढा देण्यासाठी वज्रमूठ आवळण्याचे आवाहन केले.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी आपण पक्षाकडे उमेदवारी मागितल्याचे सांगितले. यावेळी ठाकरे यांनी उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. प्रत्येक पक्षाला उमेदवारी मिळणारच नाही; परंतु, तरीही महाविकास आघाडी म्हणून दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याची इतरांनी भूमिका घेतली पाहिजे, असे स्पष्ट केले.यावेळी खासदार अनिल देसाई, आमदार जयश्री जाधव, जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, संजय पवार, विजय देवणे, रवी इंगवले, सुनील माेदी, माजी आमदार सत्यजित पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के. पाेवार, ॲड. महादेवराव आडगुळे, अनिल घाटगे, माकपचे राज्य सचिव उदय नारकर, अतुल दिघे, भाकपचे जिल्हा सरचिटणीस सतीशचंद्र कांबळे, प्रा. सुभाष जाधव, सुभाष देसाई, समाजवादी पक्षाचे शिवाजीराव परूळेकर, शेकापचे बाबूराव कदम, बाबासाहेब देवकर, आपचे जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील, वंचित आघाडीचे पदाधिकारी यांच्यासह पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

जनमत संघटित करण्याचे आव्हानसध्याचे सरकार सुडाचे राजकारण करत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाविरोधात जनमतामध्ये संताप आहे. हेच जनमत संघटित करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. हे अजिबात अशक्य नाही. त्यामुळे सर्वांनी एकमुखाने ‘इंडिया’ मजबुतीसाठी कामाला लागा, असे आवाहन यावेळी प्रमुख नेत्यांनी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAditya Thackreyआदित्य ठाकरेSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील