शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

इच्छुक उमेदवारांची वाढली घालमेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2017 23:00 IST

रेंदाळ, हुपरी गटातील चित्र : जिल्हा परिषदेसाठी अर्ज भरण्यास प्रारंभ होऊनही युत्या, आघाड्यांचा पत्ताच नाही

तानाजी घोरपडे ---हुपरी --जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास बुधवारपासून प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. मात्र, राजकीय पक्षांच्या युत्या, आघाड्या अद्यापपर्यंत अस्तित्वातच आलेल्या नसल्याने सर्वच इच्छुक उमेदवारांची घालमेल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हातकणंगले तालुक्यात एकमेव सर्वसाधारण (खुला) मतदारसंघ असलेल्या रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातील वातावरण तुल्यबळ उमेदवारांच्या मांदियाळीमुळे अतिशय गरमागरम झाले आहे. तर ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित असणाऱ्या हुपरी मतदारसंघात मात्र सर्वत्र ठंडा..ठंडा...कुल..कुल.. अशा पद्धतीचे वातावरण आहे.माजी मंत्री प्रकाश आवाडे व माजी खासदार जयवंतराव आवळे यांच्यातील गेल्या अनेक वर्षांपासून उफाळून आलेल्या वर्चस्ववादावर काँग्रेस पक्ष नेतृत्वाने अद्यापपर्यंत सर्वमान्य असा तोडगा काढला नाही. त्यामुळे दोन्हीही गटांचे कार्यकर्ते सैरभैर होऊन तोडगा निघण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच भाजप-जनसुराज्य-ताराराणी आघाडीने शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेला साधे खीजगणतीतही धरले नसल्याने या दोन्हीही पक्षांचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.आवाडे घराण्याचे राजकीय वारसदार युवा नेते राहुल आवाडे, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उद्योजक महावीर गाठ व शिवसेनेचे शिवाजीराव पाटील यांच्यातच खऱ्या अर्थाने होणारी रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघामधील लढत ही अत्यंत अटीतटीची व चुरशीची होणार आहे. तसेच माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार सुरेश हाळवणकर यांचे ग्रामीण भागावरील राजकीय वर्चस्व सिद्ध करणारी ही लढाई असणार आहे. गेल्या ४0 वर्षांपासून ग्रामीण जनतेवर असणाऱ्या माजी मंत्री आवाडे यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने अगदी सुरुवातीपासूनच साम, दाम, दंड, भेद या कुटनीतीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत आवाडे यांचेच नेतृत्व मानणारे भाजपचे उमेदवार महावीर गाठ व पक्षांतर्गत विरोधक असणारे माजी खासदार जयवंतराव आवळे यांनाही हाताशी धरून आवाडे यांचा ग्रामीण भागातील बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. सर्वच बाबतीत सरस असणाऱ्या या दोन्ही तगड्या उमेदवारांनी हाय-फाय प्रचाराला बगल देत मतदारसंघातील पाचही गावांत जाऊन घर टू घर जात प्रत्येक मतदाराला आशीर्वाद देण्याचे आवाहन करीत आहेत. विरोधकांचे सर्व मनसुभे उद्ध्वस्त करणे व ग्रामीण भागावर असणारे आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी माजी मंत्री आवाडे यांनी कसलीही उणीव बाकी ठेवलेली नाही. प्रसंगी सर्व आयुधांचा वापर करून ‘जशास तसे प्रत्युत्तर’ देण्याची तयारी करून ठेवल्याचे निदर्शनास येत आहे.सध्याच्या घडीला आवाडे गटाकडून सज्जन रावळ, राहुल इंग्रोळे. भाजपकडून स्मिता वीरकुमार शेंडुरे (उमेदवारी जाहीर). माजी खासदार आवळे गटाकडून रजिया अमजद नदाफ. शिवसेनेकडून पूनम राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्र्रेसकडून महेश माळी, मनसेकडून आनंदी बापूसाहेब माळी, तसेच सरपंच दीपाली बाळासाहेब शिंदे, विद्यमान पंचायत समिती सदस्य सुप्रिया नंदकुमार सलगर, माजी सरपंच सुमन सर्जेराव हांडे यांचीही नावे चर्चेत आहेत.दररोज वेगवेगळी नावे : दाखल्यांचा गोंधळ सुरूचहुपरी जिल्हा परिषद मतदारसंघ यावेळी ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला असल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये म्हणावा तसा अजिबात उत्साह दिसून येत नाही. इच्छुक महिला उमेदवारांच्या दाखल्यांचा गोंधळ अजूनही सुरू असल्याने सर्वच पक्षांकडून दररोज वेगवेगळी नावे समोर आणली जात आहेत. परिणामी, मतदारसंघात निवडणूक आहे की नाही, अशी परिस्थिती असून, घाईगडबड, गटा-तटाची व पक्षीय ईर्षा अशा प्रकारचे कसलेही निवडणुकीचे वातावरण कोठेच पाहावयास मिळत नाही. सर्वत्र अगदी ‘ठंडा..ठंडा...कुल..कुल’ असे वातावरण असल्याचे चित्र अनुभवण्यास मिळत आहे.