शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

२२५ रुपये वाढविले अन्‌ केवळ १० रुपये कमी केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेल्या नऊ महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल २२५ रुपयांची वाढ केल्यानंतर शासनाने आता केवळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : गेल्या नऊ महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल २२५ रुपयांची वाढ केल्यानंतर शासनाने आता केवळ दहा रुपयांनी सिलिंडरचे दर कमी केले आहेत. हा प्रकार म्हणजे आवळा देऊन कोहळा काढण्याचा आहे. आधीच कोरोनाचे जगणे मुश्कील केलेले असताना गॅस सिलिंडरच्या दरात दिवसेंदिवस केली जाणारी वाढ आणि आता दहा रुपयांनी कमी केलेले दर म्हणजे थट्टा करता काय राव, अशी सर्वसामान्यांची भावना आहे.

गतवर्षी मार्चमध्ये कोरोना संसर्ग सुरू झाला. तीन महिने लॉकडाऊनमध्ये घरी घालवल्यानंतर जूनपासून सर्वसामान्यांना विस्कटलेली आर्थिक घडी सावरायला सुरुवात केली. आधीच चार महिने रोजगार बंद, नोकरी-धंद्यात मंदी, व्यवसायाची पिछेहाट, नागरिकांची कमी झालेली क्रयशक्ती आणि कोरोनाची भीती अशा चोहोबाजूंनी संकटाचा सामना करत जगण्याची धडपड करत असताना गेल्या नऊ महिन्यांपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या कालावधीत केंद्र शासनाने तब्बल २२५ रुपयांची दरवाढ केली. दोन दिवसांपूर्वी गॅस सिलिंडर दहा रुपयांनी स्वस्त झाले आहे; पण ज्या वेगाने आणि ज्या पटीत दरवाढ झाली त्या तुलनेत हा कमी झालेला दर म्हणजे सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

--

असे वाढले दर

सिलिंडरचे वाढलेले दर असे

जून २०२० : ५९५

डिसेंबर २०२० : ६४७

जानेवारी २०२१ : ६९७.

फेब्रुवारी : ७२२

मार्च : ८२२

आताचा दर : ८१०

---

गॅस ही जीवनावश्यक बाब असल्याने त्याचे दर कमीच असले पाहिजे. आधीच कोरोनामुळे कामधंदा नाही, हातावरचे पोट असणाऱ्यांनी गॅस सिलिंडरसाठी एवढे पैसे मोजायचे कसे, बरं सिलिंडर न घेऊन पण चालत नाही, इकडे आड अन् तिकडे विहीर अशी स्थिती झाली आहे. गरिबांनी घर चालवायचं कसं याचा विचार शासनाने करायला पाहिजे.

लक्ष्मी मिराशी (गृहिणी)

--

आधीच इतकी महागाई वाढली आहे की, घर चालवताना कसरत होते. यापूर्वी गॅसवर अनुदान दिले जायचे, हे अनुदान गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे आणि दर महिन्याला नव्या वाढलेल्या दरानेच गॅस सिलिंडर घरात येतो. असे असेल तर अनुदान पुन्हा सुरू करावे.

दीपाली यादव (गृहिणी)

--

गॅसचे दर वाढवताना ३० ते ५० रुपयांनी वाढवायचे आणि १० रुपयांनी कमी करायचे हा काय प्रकार आहे. सव्वादोनशे रुपयांनी दरवाढ केल्यावर दहा रुपये कमी केले, या रुपयांत कोथिंबीर, कढीपत्ता देखील येत नाही. आधीच महागाईमुळे जीव मेटाकुटीस आला आहे. त्यात ही सवलत दिल्यानंतर दहा रुपयांत काय येतंय हे सरकारनेच सांगावं.

उषा पाटील (गृहिणी)