शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

२२५ रुपये वाढविले अन्‌ केवळ १० रुपये कमी केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेल्या नऊ महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल २२५ रुपयांची वाढ केल्यानंतर शासनाने आता केवळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : गेल्या नऊ महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल २२५ रुपयांची वाढ केल्यानंतर शासनाने आता केवळ दहा रुपयांनी सिलिंडरचे दर कमी केले आहेत. हा प्रकार म्हणजे आवळा देऊन कोहळा काढण्याचा आहे. आधीच कोरोनाचे जगणे मुश्कील केलेले असताना गॅस सिलिंडरच्या दरात दिवसेंदिवस केली जाणारी वाढ आणि आता दहा रुपयांनी कमी केलेले दर म्हणजे थट्टा करता काय राव, अशी सर्वसामान्यांची भावना आहे.

गतवर्षी मार्चमध्ये कोरोना संसर्ग सुरू झाला. तीन महिने लॉकडाऊनमध्ये घरी घालवल्यानंतर जूनपासून सर्वसामान्यांना विस्कटलेली आर्थिक घडी सावरायला सुरुवात केली. आधीच चार महिने रोजगार बंद, नोकरी-धंद्यात मंदी, व्यवसायाची पिछेहाट, नागरिकांची कमी झालेली क्रयशक्ती आणि कोरोनाची भीती अशा चोहोबाजूंनी संकटाचा सामना करत जगण्याची धडपड करत असताना गेल्या नऊ महिन्यांपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या कालावधीत केंद्र शासनाने तब्बल २२५ रुपयांची दरवाढ केली. दोन दिवसांपूर्वी गॅस सिलिंडर दहा रुपयांनी स्वस्त झाले आहे; पण ज्या वेगाने आणि ज्या पटीत दरवाढ झाली त्या तुलनेत हा कमी झालेला दर म्हणजे सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

--

असे वाढले दर

सिलिंडरचे वाढलेले दर असे

जून २०२० : ५९५

डिसेंबर २०२० : ६४७

जानेवारी २०२१ : ६९७.

फेब्रुवारी : ७२२

मार्च : ८२२

आताचा दर : ८१०

---

गॅस ही जीवनावश्यक बाब असल्याने त्याचे दर कमीच असले पाहिजे. आधीच कोरोनामुळे कामधंदा नाही, हातावरचे पोट असणाऱ्यांनी गॅस सिलिंडरसाठी एवढे पैसे मोजायचे कसे, बरं सिलिंडर न घेऊन पण चालत नाही, इकडे आड अन् तिकडे विहीर अशी स्थिती झाली आहे. गरिबांनी घर चालवायचं कसं याचा विचार शासनाने करायला पाहिजे.

लक्ष्मी मिराशी (गृहिणी)

--

आधीच इतकी महागाई वाढली आहे की, घर चालवताना कसरत होते. यापूर्वी गॅसवर अनुदान दिले जायचे, हे अनुदान गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे आणि दर महिन्याला नव्या वाढलेल्या दरानेच गॅस सिलिंडर घरात येतो. असे असेल तर अनुदान पुन्हा सुरू करावे.

दीपाली यादव (गृहिणी)

--

गॅसचे दर वाढवताना ३० ते ५० रुपयांनी वाढवायचे आणि १० रुपयांनी कमी करायचे हा काय प्रकार आहे. सव्वादोनशे रुपयांनी दरवाढ केल्यावर दहा रुपये कमी केले, या रुपयांत कोथिंबीर, कढीपत्ता देखील येत नाही. आधीच महागाईमुळे जीव मेटाकुटीस आला आहे. त्यात ही सवलत दिल्यानंतर दहा रुपयांत काय येतंय हे सरकारनेच सांगावं.

उषा पाटील (गृहिणी)