शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
4
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
5
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
6
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
7
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
8
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
9
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
10
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
11
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
12
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
13
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
14
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
15
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
16
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
18
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
19
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
20
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
Daily Top 2Weekly Top 5

साखर दरवाढीने ७०/३० च्या फॉर्म्युल्यास बळकटी?

By admin | Updated: March 9, 2017 00:37 IST

साखरेला ३७०० ते ४००० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल दर : दरात वाढ झाली असली तरी म्हणावी तशी उचल नाही

प्रकाश पाटील---कोपार्डे --साखर उत्पादनातील संभाव्य घटीचे चित्र निर्माण होताच साखरेचे दर ३७०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले असून, शासनाने यात सकारात्मक भूमिका ठेवली तर येत्या दोन महिन्यांत प्रतिक्विंटल हे दर ४५०० वर पोहोचतील, असे या उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे. या दरवाढीने किमान महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी ७०/३० फॉर्म्युल्याचा केंद्र शासनाचा निर्णय अमलात आणला तर आणखी १०० ते ३०० रुपये दर मिळणे सहज शक्य आहे.महाराष्ट्रासह देशात दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस शेतीवर विपरीत परिणाम झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यावर्षी महाराष्ट्रात केवळ १५० साखर कारखाने आपला गाळप हंगाम सुरू करू शकले आहेत. पैकी १२२ साखर कारखान्यांनी आपले गाळप हंगाम फेब्रुवारीच्या मध्यावरच गुंडाळले आहेत, तर ऊस गाळपात सव्वादोनशे लाख मे. टनांनी घट झाली आहे. याचा परिणाम साखर उत्पादनावर झाला आहे. २५० लाख क्विंटल साखर उत्पादन कमी झाले असून, साखर टंचाई नसली तरी भविष्यात बाजारात साखर टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. सध्या एक्स फॅक्टरी साखरेचे दर ३७०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचल्याने साखर कारखान्यांना मागील दोन वर्षांतील आर्थिक तोटे भरून काढण्याबरोबर ऊस उत्पादकांना रंगराजन समितीच्या शिफारशीप्रमाणे ७०/३० च्या फॉर्म्युल्याने दर देण्यास बळकटी येईल असे चित्र आहे.कारखान्याचे सरासरी साखर उतारे १२ टक्क्यांपासून १२.५० टक्क्यांपर्यंत आहेत. याचा अर्थ एक टन उसापासून १२० किलो निव्वळ साखर मिळते. साखरेचा बाजारभाव ४५६० ते ४६८० पर्यंत प्रतिक्विंटल दर मिळत आहे. याचबरोबर मोलॅसिस, सहवीज प्रकल्प, बगॅस व डिस्टिलरी या उपउत्पादनातून मिळणारे एकत्रित ४०० ते ५०० रुपये उत्पन्न अंदाजे गृहीत धरल्यास एक टन उसापासून साखर कारखान्यांना किमान चार हजार ८०० ते पाच हजार २०० रुपये उत्पन्न मिळते. यातून साखर कारखान्यांचा उत्पादन खर्च ८०० ते १३०० रुपये प्रतिटन वजा करता एक टन उसापासून साखर कारखान्यांना निव्वळ उत्पन्न ३८०० ते ४००० रुपये मिळत आहे. निव्वळ मिळणाऱ्या उत्पन्नातून साखर कारखान्यांना ३० टक्के व ऊस उत्पादकांना ७० टक्के रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार असा वाटा केल्यास ऊस उत्पादकांना प्रतिटन तीन हजार रुपये दर देणे आताच्या साखर दरामुळे शक्य आहे. महाराष्ट्रात काय, पण कोल्हापूर जिल्ह्याचा ऊसदराचा विचार केला तर एक-दोन कारखाने वगळता एकाही साखर कारखान्याचा ऊसदर २७०० रुपयांवर नाही. जर ७०/३० फॉर्म्युल्याची अंमलबजावणी झाली, तर सध्या साखर कारखान्यांना ३०० ते ४०० रुपये आणखी ऊस उत्पादकांना द्यावे लागणार आहेत.सहकारी साखर कारखाने हे ऊस उत्पादकांच्या हितासाठीच आहेत. ज्यावेळी साखरेला दर मिळतो, त्यावेळी तरी सकारात्मकता दाखवून ऊस उत्पादकांना उत्पादन खर्चाएवढा दर मिळेल, अशी भूमिका ठेवावी.- संजय पाटील, ऊस उत्पादक, वाकरे,