शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ‘दिल्ली’ महागली, रेडिरेकनरमधील वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 18:43 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षांची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी दिल्ली महागली आहे. रेडिरेकनरमधील (बाजारमूल्य) वाढ आणि जीएसटीमुळे निवास व्यवस्था, क्लासेसचे शुल्क आणि जेवण यासाठीचा दरमहा एका विद्यार्थ्याचा खर्च किमान सहा हजारांनी वाढला आहे.

ठळक मुद्देजीएसटीचा परिणाम; दरमहा सहा हजारांनी खर्च वाढलामहाराष्ट्र सरकारकडून विद्यार्थ्यांच्या अपेक्षा

संतोष मिठारी

कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षांची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी दिल्ली महागली आहे. रेडिरेकनरमधील (बाजारमूल्य) वाढ आणि जीएसटीमुळे निवास व्यवस्था, क्लासेसचे शुल्क आणि जेवण यासाठीचा दरमहा एका विद्यार्थ्याचा खर्च किमान सहा हजारांनी वाढला आहे.

दिल्लीतील मुखर्जीनगर, करोल बाग, ओल्ड राजेंद्रनगर परिसरात युपीएससी परीक्षांबाबत मार्गदर्शन करणारे वीसहून अधिक क्लासेस आहेत. त्यामुळे या परिसरात राहण्यास युपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी प्राधान्य देतात. करोल बाग आणि ओल्ड राजेंद्रनगरसह विविध भागांत महाराष्ट्रातून आलेले तब्बल १५ हजार विद्यार्थी राहतात. त्यामध्ये अधिकतर मुलांची संख्या आहे. बहुतांश विद्यार्थी हे वन बीएचके फ्लॅट हा तीन ते चार जणांमध्ये भाडेतत्त्वावर घेतात. त्यासाठी त्यांना एकत्रितपणे दरमहा २० ते २२ हजार रुपये भाडे द्यावे लागते.

दिल्लीमध्ये दर अकरा महिन्यांनी रेडिरेकनरमध्ये वाढ होते. त्यानुसार सरासरी दहा टक्क्यांनी घरभाड्यामध्ये वाढ केली जाते. रेडिरेकनर वाढल्याने यावर्षी आॅक्टोबरपासून दहा टक्क्यांनी घरांची भाडेवाढ झाली आहे शिवाय जीएसटीमुळे क्लासेसचे शुल्क वाढले आहे. क्लास झाल्यानंतर अभ्यासासाठी त्यांना काही खासगी ग्रंथालयांचा आधार घ्यावा लागतो. त्यासाठी दरमहा १५०० ते १८०० रुपये मोजावे लागतात.

एकूणच पाहता या विद्यार्थ्यांच्या दर महिन्याचा खर्च सहा हजारांनी वाढला आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक नियोजनाची कसरत करावी लागत आहे. युपीएससीतील महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढण्यासाठी दिल्लीतील या विद्यार्थ्यांना ग्रंथालय, अभ्यासिका आणि निवासाची व्यवस्था करणे महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.

महाराष्ट्र सरकारकडून विद्यार्थ्यांच्या अपेक्षा

  1.  दीपक नराळे (अकलूज) : रेडिरेकनरमधील वाढ आणि जीएसटीमुळे दर महिन्याच्या दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. घरभाडे आणि जेवणामध्ये काहीच तडजोड करता येत नाही. क्लास आणि रूममध्ये अभ्यास करणे शक्य होत नाही. त्यामुळे ग्रंथालय, अभ्यासिका लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ते लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने दिल्लीमध्ये ग्रंथालय, अभ्यासिका आणि वसतिगृह सुरू करावे. पुण्यातील यशदा, मुंबईतील ‘एसआयएसएच’सारखी संस्था दिल्ली सुरू करण्याची गरज आहे.
  2.  
  3. राहुल सावंत (कोल्हापूर) : दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्रामध्ये ग्रंथालय आहे; पण, त्याठिकाणी ‘युपीएससी’साठीची पुस्तके उपलब्ध नाहीत. जुन्या महाराष्ट्र सदनमधील ग्रंथालय आमच्यासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिल्यास किमान १५०० ते १८०० रुपयांची आमची बचत होईल.

 

अकरा महिन्यांचा पर्यायदिल्लीतील क्लासेसचे वर्ग हे अकरा महिन्यांचे असतात. त्यामुळे इतक्या कालावधीपर्यंत त्यांना दिल्लीमध्ये राहावेच लागते. वर्षागणिक वाढणारा खर्च परवडणारा नसल्याने काही विद्यार्थ्यांनी अकरा महिन्यांचा क्लास करून परत आपआपल्या शहर, गावांमध्ये जाऊन परीक्षेची तयारी करण्याचा पर्याय निवडला आहे.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीDelhi Gateदिल्ली गेटGSTजीएसटी