शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

परीक्षेपेक्षा अव्वाच्या सव्वा शुल्काचाच ताण!, परीक्षा की महसूल गोळा करताय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 13:46 IST

राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रानेही परीक्षांसाठी अल्प शुल्क ठेवावे

कोल्हापूर : गुणवत्तापूर्ण अधिकारी-कर्मचारी शासकीय सेवेत यावेत यासाठी राज्य सरकारकडून स्पर्धा व सरळसेवा परीक्षा घेतल्या जातात. मात्र, सध्या सरळसेवा परीक्षेचे शुल्क पाहिले तर सरकार महसूल गोळा करण्यासाठीच अशा परीक्षा घेत नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरळ सेवा परीक्षांचे शुल्क थेट तीन-चारपट वाढविल्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परीक्षेपेक्षाही या अव्वाच्या सव्वा शुल्काचाच अधिक 'ताण' येऊ लागला आहे.राज्य सरकारकडून विविध विभागांतील रिक्त जागा टीसीएस-आयबीपीएस या खासगी कंपनीमार्फत सरळ सेवा भरतीतून भरल्या जात आहेत. सध्या तलाठी, जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील जागांसाठी भरती सुरू आहे. मात्र, राज्य सरकारने या सर्वच परीक्षांसाठी खुल्या गटातील विद्यार्थ्यांना एक हजार तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्याला ९०० रुपये शुल्क आकारले आहे.

उमेदवार सैरभरलाखो सुशिक्षित परीक्षार्थी भरतीकडे डोळे लावून बसलेले असतात. प्रत्येक वर्षी किमान दहा परीक्षा द्यायच्या म्हटले तरी परीक्षा शुल्काचे दहा हजार आणायचे कुठून हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर आहे.

सरळ सेवेतून या होतात परीक्षाआरोग्यसेवक, ग्रामसेवक, लिपिक, स्थापत्य अभियंता, जलसंपदा, म्हाडा, एमआयडीसी, तलाठी, पुरवठा निरीक्षक, सहकार अधिकारी, एक्साईज कॉन्स्टेबल.

काय आहे ‘राजस्थान पॅटर्न’राजस्थानमध्ये कोणत्याही विद्यार्थ्यांला राज्य सरकारची परीक्षा द्यायची असेल तर त्याला वर्षभरासाठी केवळ ६०० रुपये शुल्क एकदाच आकारले जाते. हे शुल्क भरल्यानंतर त्याला परीक्षा कार्ड दिले जाते. त्याआधारे तो वर्षभरात होणाऱ्या सर्व परीक्षा देऊ शकतो.

कोल्हापुरात ४९ हजारांहून अधिक जण देणार परीक्षासध्या तलाठी परीक्षा सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास ४९ हजारांहून अधिक जण १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबरपर्यंत विविध केंद्रांवर ही परीक्षा देणार आहेत. खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी एक हजार रुपये शुल्क असून इतर मागासवर्गातील उमेदवारांसाठी ९०० रुपये शुल्क आहे. म्हणजे प्रत्येकी एक हजार धरले तरी एका जिल्ह्यात एका परीक्षेतून सरकारला ४ कोटींहून अधिकचा महसूल मिळणार आहे.

अशी आहे तफावतपूर्वी पशुसंवर्धन पदभरती परीक्षेसाठी खुल्या गटाला ३०० तर राखीव गटातील उमेदवाराला १५० रुपये शुल्क होते. आता हेच शुल्क खुल्या गटाला एक हजार तर राखीव गटाला ९०० रुपये केले आहे.

शासनाचा हेतू हा लोककल्याणकारी असला पाहिजे, मात्र, शासन अव्वाच्या सव्वा शुल्क आकारून त्यांचा मूळ हेतू विसरले आहे. या परीक्षा देणारे विद्यार्थी भावी अधिकारी आहेत. असे भरमसाठ शुल्क आकारल्यामुळे या विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतो याचा सरकारने विचार करायला हवा. राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रानेही परीक्षांसाठी अल्प शुल्क ठेवावे. - जॉर्ज क्रूझ, मार्गदर्शक, स्पर्धा परीक्षा.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकारexamपरीक्षा