शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांच्या समाधी स्मारकाचे पन्हाळ्यात उद्या लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 16:43 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांचे अमात्य व छत्रपती संभाजी महाराजांनंतर स्वराज्य सावरणारे रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांच्या पन्हाळा येथील समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा उद्या, शनिवारी होणार आहे, अशी माहिती हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य बावडेकर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव नील पंडित बावडेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देरामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांच्या समाधी स्मारकाचे पन्हाळ्यात उद्या लोकार्पणनील पंडित बावडेकर यांनी दिली माहिती, पन्हाळ्यात होणार सोहळा

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचे अमात्य व छत्रपती संभाजी महाराजांनंतर स्वराज्य सावरणारे रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांच्या पन्हाळा येथील समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा उद्या, शनिवारी होणार आहे, अशी माहिती हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य बावडेकर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव नील पंडित बावडेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.सोमेश्वर तलावाशेजारील समाधी परिसरात सकाळी ११.३० वाजता शाहू छत्रपती यांच्या हस्ते हा सोहळा होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार असतील. यावेळी माजी आमदार मालोजीराजे यांच्यासह शिवकालीन मराठा राजे व सरदार घराण्यातील वंशज उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी पाच वाजता कोल्हापुरातील श्रीमंत माईसाहेब बावडेकर प्रशालेतील सभागृहात ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचे ‘मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी खासदार संभाजीराजे उपस्थित असतील.या कार्यक्रमाला फलटणचे नाईक निंबाळकर, भोरचे पंत सचिव, हंबीरराव मोहिते, सेनापती धनाजीराव जाधवराव, कान्होजी आंग्रे, सरदार शिरोळे, पेशवे मोरोपंत पिंगळे, खंडेराव दाभाडे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, होळकर, येसाजी कंक, कान्होजी जेधे, विठ्ठल विचूरकर, अंताजी गंधे, सरदार रास्ते, सरदार पेठे, सरदार बावणे, तानाजी मालुसरे, सरदार गरुड, ढमाले देशमुख, नातू, हिरोजी इंदलकर अशा राजे व सरदार घराण्यांतील वंशज उपस्थित राहणार आहेत.समाधी स्मारक प्रकाशातरामचंद्रपंत बावडेकर हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अमात्य होते. पुढे संभाजी महाराज यांच्या बलिदानानंतर त्यांनी कठीण परिस्थितीत स्वराज्य सावरण्याचे व टिकविण्याचे कार्य केले. त्यांना छत्रपती राजाराम महाराज यांनी ‘हुुकुमतपनाह’ हा सर्वोच्च किताब दिला.

रामचंद्रपंत यांचे ८ फेब्रुवारी १७१६ रोजी निधन झाले. त्याच कालावधीत पन्हाळ्यात त्यांची समाधी बांधण्यात आली. त्यावर त्यांचे नावही कोरण्यात आले आहे. कालौघात समाधी विस्मृतीत गेली. सबनीस व मु. गो. गुळवणी यांनी ती पहिल्यांदा प्रकाशात आणली. त्यानंतर पुढे इतिहास संशोधकांनी समाधिस्थळाचे महत्त्व व रामचंद्रपंतांचे कार्यकर्तृत्व उजेडात आणले.२० लाख खर्चून जीर्णोद्धारट्र्स्टने स्वनिधीतून २० लाख रुपये खर्चून समाधी स्मारकाचा जीर्णोद्धार केला आहे. हे काम दीड वर्ष सुरू होते. जीर्णोद्धाराच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरात खाली दगड, स्मारकासमोर कमान व छोटेखानी संग्रहालय उभारण्याचा मानस आहे. त्यासाठी ३० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यासोबत परिसरात आणखी दोन समाध्या आहेत. या स्मारकांच्या देखभालीसाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. 

 

टॅग्स :historyइतिहासkolhapurकोल्हापूर