शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांच्या समाधी स्मारकाचे पन्हाळ्यात उद्या लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 16:43 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांचे अमात्य व छत्रपती संभाजी महाराजांनंतर स्वराज्य सावरणारे रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांच्या पन्हाळा येथील समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा उद्या, शनिवारी होणार आहे, अशी माहिती हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य बावडेकर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव नील पंडित बावडेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देरामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांच्या समाधी स्मारकाचे पन्हाळ्यात उद्या लोकार्पणनील पंडित बावडेकर यांनी दिली माहिती, पन्हाळ्यात होणार सोहळा

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचे अमात्य व छत्रपती संभाजी महाराजांनंतर स्वराज्य सावरणारे रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांच्या पन्हाळा येथील समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा उद्या, शनिवारी होणार आहे, अशी माहिती हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य बावडेकर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव नील पंडित बावडेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.सोमेश्वर तलावाशेजारील समाधी परिसरात सकाळी ११.३० वाजता शाहू छत्रपती यांच्या हस्ते हा सोहळा होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार असतील. यावेळी माजी आमदार मालोजीराजे यांच्यासह शिवकालीन मराठा राजे व सरदार घराण्यातील वंशज उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी पाच वाजता कोल्हापुरातील श्रीमंत माईसाहेब बावडेकर प्रशालेतील सभागृहात ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचे ‘मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी खासदार संभाजीराजे उपस्थित असतील.या कार्यक्रमाला फलटणचे नाईक निंबाळकर, भोरचे पंत सचिव, हंबीरराव मोहिते, सेनापती धनाजीराव जाधवराव, कान्होजी आंग्रे, सरदार शिरोळे, पेशवे मोरोपंत पिंगळे, खंडेराव दाभाडे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, होळकर, येसाजी कंक, कान्होजी जेधे, विठ्ठल विचूरकर, अंताजी गंधे, सरदार रास्ते, सरदार पेठे, सरदार बावणे, तानाजी मालुसरे, सरदार गरुड, ढमाले देशमुख, नातू, हिरोजी इंदलकर अशा राजे व सरदार घराण्यांतील वंशज उपस्थित राहणार आहेत.समाधी स्मारक प्रकाशातरामचंद्रपंत बावडेकर हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अमात्य होते. पुढे संभाजी महाराज यांच्या बलिदानानंतर त्यांनी कठीण परिस्थितीत स्वराज्य सावरण्याचे व टिकविण्याचे कार्य केले. त्यांना छत्रपती राजाराम महाराज यांनी ‘हुुकुमतपनाह’ हा सर्वोच्च किताब दिला.

रामचंद्रपंत यांचे ८ फेब्रुवारी १७१६ रोजी निधन झाले. त्याच कालावधीत पन्हाळ्यात त्यांची समाधी बांधण्यात आली. त्यावर त्यांचे नावही कोरण्यात आले आहे. कालौघात समाधी विस्मृतीत गेली. सबनीस व मु. गो. गुळवणी यांनी ती पहिल्यांदा प्रकाशात आणली. त्यानंतर पुढे इतिहास संशोधकांनी समाधिस्थळाचे महत्त्व व रामचंद्रपंतांचे कार्यकर्तृत्व उजेडात आणले.२० लाख खर्चून जीर्णोद्धारट्र्स्टने स्वनिधीतून २० लाख रुपये खर्चून समाधी स्मारकाचा जीर्णोद्धार केला आहे. हे काम दीड वर्ष सुरू होते. जीर्णोद्धाराच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरात खाली दगड, स्मारकासमोर कमान व छोटेखानी संग्रहालय उभारण्याचा मानस आहे. त्यासाठी ३० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यासोबत परिसरात आणखी दोन समाध्या आहेत. या स्मारकांच्या देखभालीसाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. 

 

टॅग्स :historyइतिहासkolhapurकोल्हापूर