शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

कोल्हापूर शहरातील निम्म्या शहरात अपुरा पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 20:32 IST

कोल्हापूर : शिंगणापूर येथील उपसा केंद्रातील चारपैकी एक पंप जळाल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून शहरातील निम्म्या भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे.

ठळक मुद्देउपसा केंद्रातील पंप जळालावेळीच लक्ष घातले असते, तर हा प्रसंग उद्भवला नसता,महापौर बाहेरगावी गेल्यामुळे नगरसेवकांनी थोडे नमते घेतले

कोल्हापूर : शिंगणापूर येथील उपसा केंद्रातील चारपैकी एक पंप जळाल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून शहरातील निम्म्या भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. सोमवारी सायंकाळी जळालेला पंप दुरूस्त करून नियमित उपसा सुरू झाल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे, आज मंगळवारपासून शहरात सगळीकडे सुरळीत पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा आहे.

बालिंगा तसेच शिंगणापूर येथील उपसा केंद्राकडील पंपामध्ये बिघाड झाल्याने गेल्या चार दिवसांपासून शहरातील ई वॉर्डसह सम्राटनगर, राजेंद्रनगर, जवाहरनगर, शास्त्रीनगर, महालक्ष्मीनगर, पाण्याचा खजिना, तपोवन, साळोखेनगर आदी परिसरात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. नागरिकांच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली तेव्हा काही नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधून अपुºया पाणीपुरवठ्याची माहिती दिली. त्यावेळी बालिंगा तसेच शिंगणापूर उपसा केंद्रातील एक-एक पंप नादुरूस्त असल्याचे लक्षात आले.

नगरसेवकांच्या दबावामुळे अधिकाºयांनी सोमवारी सकाळी पंप दुरूस्त करण्याचे काम हाती घेतले आणि सायंकाळपर्यंत पूर्णही केले. वरिष्ठ अधिकाºयांनी याबाबत वेळीच लक्ष घातले असते, तर हा प्रसंग उद्भवला नसता, असे परिवहन सभापती नियाज खान यांनी सांगितले. पाणीपुरवठा अपुरा होणार असेल तर त्याची माहिती नगरसेवकांसह जनतेला दिली नाही, तसेच पर्यायी व्यवस्था म्हणून पिण्याच्या पाण्याचे टँकरही दिले नाहीत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

नियाज खान यांच्यासह काही नगरसेवक पाणीपुरवठा विभागाचे जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना घेरावो घालून त्यांचे वाहन काढून घेण्याच्या पवित्र्यात होते; परंतु महापौर बाहेरगावी गेल्यामुळे नगरसेवकांनी थोडे नमते घेतले. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी तत्परतेने काम करत नाहीत, अशी तक्रार नगरसेवकांतून होत आहे.

 

टॅग्स :Waterपाणीpollutionप्रदूषण