शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोल्हापूर शहरातील निम्म्या शहरात अपुरा पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 20:32 IST

कोल्हापूर : शिंगणापूर येथील उपसा केंद्रातील चारपैकी एक पंप जळाल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून शहरातील निम्म्या भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे.

ठळक मुद्देउपसा केंद्रातील पंप जळालावेळीच लक्ष घातले असते, तर हा प्रसंग उद्भवला नसता,महापौर बाहेरगावी गेल्यामुळे नगरसेवकांनी थोडे नमते घेतले

कोल्हापूर : शिंगणापूर येथील उपसा केंद्रातील चारपैकी एक पंप जळाल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून शहरातील निम्म्या भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. सोमवारी सायंकाळी जळालेला पंप दुरूस्त करून नियमित उपसा सुरू झाल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे, आज मंगळवारपासून शहरात सगळीकडे सुरळीत पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा आहे.

बालिंगा तसेच शिंगणापूर येथील उपसा केंद्राकडील पंपामध्ये बिघाड झाल्याने गेल्या चार दिवसांपासून शहरातील ई वॉर्डसह सम्राटनगर, राजेंद्रनगर, जवाहरनगर, शास्त्रीनगर, महालक्ष्मीनगर, पाण्याचा खजिना, तपोवन, साळोखेनगर आदी परिसरात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. नागरिकांच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली तेव्हा काही नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधून अपुºया पाणीपुरवठ्याची माहिती दिली. त्यावेळी बालिंगा तसेच शिंगणापूर उपसा केंद्रातील एक-एक पंप नादुरूस्त असल्याचे लक्षात आले.

नगरसेवकांच्या दबावामुळे अधिकाºयांनी सोमवारी सकाळी पंप दुरूस्त करण्याचे काम हाती घेतले आणि सायंकाळपर्यंत पूर्णही केले. वरिष्ठ अधिकाºयांनी याबाबत वेळीच लक्ष घातले असते, तर हा प्रसंग उद्भवला नसता, असे परिवहन सभापती नियाज खान यांनी सांगितले. पाणीपुरवठा अपुरा होणार असेल तर त्याची माहिती नगरसेवकांसह जनतेला दिली नाही, तसेच पर्यायी व्यवस्था म्हणून पिण्याच्या पाण्याचे टँकरही दिले नाहीत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

नियाज खान यांच्यासह काही नगरसेवक पाणीपुरवठा विभागाचे जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना घेरावो घालून त्यांचे वाहन काढून घेण्याच्या पवित्र्यात होते; परंतु महापौर बाहेरगावी गेल्यामुळे नगरसेवकांनी थोडे नमते घेतले. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी तत्परतेने काम करत नाहीत, अशी तक्रार नगरसेवकांतून होत आहे.

 

टॅग्स :Waterपाणीpollutionप्रदूषण