शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोरोनामुळे कर्जदार गेले..अन् ६२ कोटींचे कर्ज थकले, पश्चिम महाराष्ट्रातील चित्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 18:57 IST

कर्ज कसे फेडायचे अशा विवंचनेत कुटुंबीय आहेत.

समीर देशपांडेकोल्हापूर : गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे १०६१ जणांचा मृत्यू झाला असून त्यामुळे ६२ कोटी ४६ लाख रुपयांचे कर्ज थकीत असल्याचे समोर आले आहे. घरातील कर्ता माणूसच गेल्याने ही थकबाकी राहिली असून आता हे कर्ज कसे फेडायचे अशा विवंचनेत कुटुंबीय आहेत.राज्य शासनाने महिन्याभरापूर्वी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या कर्जाची सद्यस्थिती याबाबतची माहिती मागवली होती. त्यानुसार कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील कर्जाच्या माहितीचे संकलन करण्यात आले आहे. यामध्ये तीन प्रकारच्या कर्जाची माहिती घेण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी आणि सेवक पतसंस्था मालमत्ता तारण असलेले थकीत कर्जदार अशी तीन विभागात ही माहिती घेण्यात आली आहे.नागरी पतसंस्था आणि सेवक पतसंस्थांचे सभासद आणि कर्जदार असलेले या तीनही जिल्ह्यातील ६०८ जण मृत्यू पावले असून त्या सर्वांनी २७ कोटी ५५ लाख ८ हजार ३४९ रुपये कर्ज घेतले होते. त्यातील २० कोटी ४९ लाख ३७ हजार ९९७ रुपये थकीत आहेत. तीनही जिल्ह्यातील ४५ बँकांकडे मालमत्ता तारण असलेल्या २६५ कर्जदारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांनी या बँकांकडून ३२ कोटी ९० लाख, ३० हजार ८५७ रुपये कर्ज घेतले होते. त्यापैकी २१ कोटी चार लाख ६९ हजार, ६८० रुपये थकीत आहेत.

केडीसीसी बँकेचे सर्व कर्ज थकीतकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ८६ जणांना १ कोटी ५४ लाख कर्ज मंजूर केले, परंतु गेल्या दोन वर्षात हे कर्ज न फेडल्याने उलट व्याज वाढल्याने ही रक्कम आता १ कोटी ५६ लाखांवर गेली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या कर्जाची स्थिती

बँकेचे नाव  मयत कर्जदार मंजूर कर्ज थकीत कर्ज 
कोल्हापूर जिल्हा बँक   ८६    १,५४,१६,४१५    १,५५,७४.१६७
सांगली जिल्हा बँक    ३७२   १०,०८,४३,०५०  ८,५४,५०,२७१
सातारा जिल्हा बँक     ९३०   १५,२९,२८,०७९    १०,८२,०३,१०८
एकूण १३८८      २६,९१,८७,५४४     २०,९२,२७,५४६

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकcorona virusकोरोना वायरस बातम्या