शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

Lok sabha 2024: ‘कोल्हापूर’, ‘हातकणंगले’चे प्रश्न तेच; हे अपयश कोणाचे?

By राजाराम लोंढे | Updated: April 1, 2024 16:52 IST

तेच मुद्दे किती वर्षे मांडणार? : मतपेटीतून दबाव वाढवण्याची गरज

राजाराम लोंढेकोल्हापूर : गेली २५ वर्षांत ‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या जाहीरनाम्यातील प्रश्न जशाच्या तसेच आहेत. ‘पंचगंगा प्रदूषण’, ‘रेल्वे विस्तारीकरणासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न दाखवून उमेदवार विजयी झाले, पण प्रश्न आहे तसेच आहेत. मग हे अपयश कोणाचे? विकासाचे तेच तेच मुद्दे ऐकून मतदारांनाच आता उबग आली आहे. बिगर राजकीय नागरी समस्या संघटनांच्या माध्यमातून पाच वर्षांचे ऑडिट होऊन मतपेटीतून दबाव निर्माण केल्याशिवाय जाहीरनाम्यावरील प्रश्न बदलणार नाहीत, हे निश्चित आहे.

लोकशाहीमध्ये विकासाच्या मुद्यावर निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत, असे संकेत आहेत. पण, दुर्दैवाने अलीकडील दहा-पंधरा वर्षांत स्थानिक विकासापेक्षा भावनिक मुद्यावर निवडणुका जिंकल्या जात आहेत. त्यामुळेच २०-२५ वर्षे प्रश्न जटील बनले आहेत. लोकसभेच्या मागील पाच निवडणुकांतील सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे जाहीरनामे पाहिले तर प्रत्येक निवडणुकीत तेच मुद्दे दिसतात. पंचगंगा प्रदूषण, कोल्हापूर ते कोकण रेल्वे, विमानतळाचे विस्तारीकरण, कोल्हापूरचा ‘आयटी पार्क’, इचलकरंजीचा पाणीप्रश्न, यंत्रमागधारकांचे प्रश्न हेच मुद्दे प्रचारात रेटले जातात.निवडणूकीनंतर मात्र या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी किती प्रामाणिक प्रयत्न केले जातात, हा संशोधनाचा प्रश्न आहे. निवडणुका जवळ आल्या की संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे मागणीचे पत्र द्यायचे आणि त्याची प्रसिद्ध करायची या पलीकडे दुर्दैवाने काहीच होताना दिसत नाही. कोल्हापूरच्या विमानतळाचा प्रश्न मार्गी लागला पण इतर प्रश्नांचे काय? पारंपरिक मुद्दे उद्या उमेदवारांच्या जाहीरनाम्यात दिसणार आहेत, त्याचा जाब मतदारांनी विचारण्याची गरज आहे.

सर्वांगीण विकास म्हणजे काय रे भाऊ?गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्वच निवडणुकीत उमेदवारांच्या तोंडात सर्वांगीण विकास हाच शब्द असतो. मात्र, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही ‘सर्वांगीण विकास’ या शब्दाचा अर्थ सामान्य माणसाला समजलेला नाही. मतासाठी दारात येणाऱ्या उमेदवारालाच या शब्दाचा अर्थ विचारण्याचे धारिष्ट मतदारांना दाखवावे लागणार आहे.

राजकीय इच्छाशक्तीचा अभावलोकसभेच्या मागील चार निवडणुका विकासापेक्षा भावनिकतेवर लढल्या गेल्या. कधी कोल्हापूरची अस्मिता, जातीचे समीकरण तर कधी ‘आमचं ठरलयं’ यावर निवडणुका झाल्या. येथे विकासापेक्षा व्यक्तिगत शह काटशहाभोवतीच निवडणूक फिरते. जोपर्यंत विकासावर निवडणुका होणार नाहीत तोपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील प्रश्न सुटणार नाहीत.

हे प्रश्न किती वर्षे भिजत पडणार?

  • पंचगंगा प्रदूषण
  • अद्ययावत आयटी पार्क
  • अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा
  • कोल्हापूर-कोकण रेल्वे
  • शाहू मिलच्या ठिकाणी भव्य शाहू स्मारक
  • कोल्हापूर खंडपीठ
  • इचलकरंजी पाणीप्रश्न
  • अडचणीतील यंत्रमागधारकांना मदत

विकासकामांत आर्थिक अडचणी असल्या तरी त्याला सोडवण्यासाठी जनमाणसांचा दबाव नेत्यांवर राहिला पाहिजे. जोपर्यंत चळवळीद्वारे मतपेटीतून दबाव निर्माण करू शकत नाही, तोपर्यंत प्रश्न भिजतच राहणार. - डॉ. अशोक चौसाळकर (राजकीय अभ्यासक)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४kolhapur-pcकोल्हापूर