शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
4
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
5
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
6
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
7
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
8
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
9
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
10
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
11
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
12
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
13
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
14
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
15
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
16
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
17
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
18
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
19
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
20
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...

Lok sabha 2024: ‘कोल्हापूर’, ‘हातकणंगले’चे प्रश्न तेच; हे अपयश कोणाचे?

By राजाराम लोंढे | Updated: April 1, 2024 16:52 IST

तेच मुद्दे किती वर्षे मांडणार? : मतपेटीतून दबाव वाढवण्याची गरज

राजाराम लोंढेकोल्हापूर : गेली २५ वर्षांत ‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या जाहीरनाम्यातील प्रश्न जशाच्या तसेच आहेत. ‘पंचगंगा प्रदूषण’, ‘रेल्वे विस्तारीकरणासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न दाखवून उमेदवार विजयी झाले, पण प्रश्न आहे तसेच आहेत. मग हे अपयश कोणाचे? विकासाचे तेच तेच मुद्दे ऐकून मतदारांनाच आता उबग आली आहे. बिगर राजकीय नागरी समस्या संघटनांच्या माध्यमातून पाच वर्षांचे ऑडिट होऊन मतपेटीतून दबाव निर्माण केल्याशिवाय जाहीरनाम्यावरील प्रश्न बदलणार नाहीत, हे निश्चित आहे.

लोकशाहीमध्ये विकासाच्या मुद्यावर निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत, असे संकेत आहेत. पण, दुर्दैवाने अलीकडील दहा-पंधरा वर्षांत स्थानिक विकासापेक्षा भावनिक मुद्यावर निवडणुका जिंकल्या जात आहेत. त्यामुळेच २०-२५ वर्षे प्रश्न जटील बनले आहेत. लोकसभेच्या मागील पाच निवडणुकांतील सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे जाहीरनामे पाहिले तर प्रत्येक निवडणुकीत तेच मुद्दे दिसतात. पंचगंगा प्रदूषण, कोल्हापूर ते कोकण रेल्वे, विमानतळाचे विस्तारीकरण, कोल्हापूरचा ‘आयटी पार्क’, इचलकरंजीचा पाणीप्रश्न, यंत्रमागधारकांचे प्रश्न हेच मुद्दे प्रचारात रेटले जातात.निवडणूकीनंतर मात्र या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी किती प्रामाणिक प्रयत्न केले जातात, हा संशोधनाचा प्रश्न आहे. निवडणुका जवळ आल्या की संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे मागणीचे पत्र द्यायचे आणि त्याची प्रसिद्ध करायची या पलीकडे दुर्दैवाने काहीच होताना दिसत नाही. कोल्हापूरच्या विमानतळाचा प्रश्न मार्गी लागला पण इतर प्रश्नांचे काय? पारंपरिक मुद्दे उद्या उमेदवारांच्या जाहीरनाम्यात दिसणार आहेत, त्याचा जाब मतदारांनी विचारण्याची गरज आहे.

सर्वांगीण विकास म्हणजे काय रे भाऊ?गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्वच निवडणुकीत उमेदवारांच्या तोंडात सर्वांगीण विकास हाच शब्द असतो. मात्र, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही ‘सर्वांगीण विकास’ या शब्दाचा अर्थ सामान्य माणसाला समजलेला नाही. मतासाठी दारात येणाऱ्या उमेदवारालाच या शब्दाचा अर्थ विचारण्याचे धारिष्ट मतदारांना दाखवावे लागणार आहे.

राजकीय इच्छाशक्तीचा अभावलोकसभेच्या मागील चार निवडणुका विकासापेक्षा भावनिकतेवर लढल्या गेल्या. कधी कोल्हापूरची अस्मिता, जातीचे समीकरण तर कधी ‘आमचं ठरलयं’ यावर निवडणुका झाल्या. येथे विकासापेक्षा व्यक्तिगत शह काटशहाभोवतीच निवडणूक फिरते. जोपर्यंत विकासावर निवडणुका होणार नाहीत तोपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील प्रश्न सुटणार नाहीत.

हे प्रश्न किती वर्षे भिजत पडणार?

  • पंचगंगा प्रदूषण
  • अद्ययावत आयटी पार्क
  • अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा
  • कोल्हापूर-कोकण रेल्वे
  • शाहू मिलच्या ठिकाणी भव्य शाहू स्मारक
  • कोल्हापूर खंडपीठ
  • इचलकरंजी पाणीप्रश्न
  • अडचणीतील यंत्रमागधारकांना मदत

विकासकामांत आर्थिक अडचणी असल्या तरी त्याला सोडवण्यासाठी जनमाणसांचा दबाव नेत्यांवर राहिला पाहिजे. जोपर्यंत चळवळीद्वारे मतपेटीतून दबाव निर्माण करू शकत नाही, तोपर्यंत प्रश्न भिजतच राहणार. - डॉ. अशोक चौसाळकर (राजकीय अभ्यासक)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४kolhapur-pcकोल्हापूर