शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

शर्तभंग नियमित करण्यासाठी आता मंत्रालयात हेलपाटे, शेतकऱ्याची होणार कोंडी; शासनाचा उफराटा फतवा

By विश्वास पाटील | Updated: March 16, 2023 16:15 IST

राज्य सरकार लोकांच्या अडचणी कमी करण्यापेक्षा त्यात कशी भर घालते त्याचा हा आदेश म्हणजे उत्तम नमुना

विश्वास पाटीलकोल्हापूर : जमिनीचा शर्तभंग झाला असल्यास तो नियमित करण्यासाठी लोकांना आता थेट मंत्रालयातच हेलपाटे मारावे लागणार आहेत. कारण फेब्रुवारीपासून शासनाने नियमितीकरणाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडून काढून स्वत:कडे म्हणजे मंत्रालयात घेतले आहेत. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातून वर्षाला सरासरी पाचशेहून अधिक प्रकरणे शर्तभंग नियमितीकरणाची असतात. त्यांना जिल्हा पातळीवरच मंजुरी मिळायला चार-सहा महिने लागतात. आता हा कालावधी वर्षाहून जास्त होणार आहे.राज्य सरकार लोकांच्या अडचणी कमी करण्यापेक्षा त्यात कशी भर घालते त्याचा हा आदेश म्हणजे उत्तम नमुना आहे. इनामी, देवस्थान, वतन,मुलकीपड आणि गावठाण जमिनीची मालकी शासनाकडे असते. त्यांना वर्ग दोनच्या जमिनी म्हटले जाते; परंतु ज्यांच्याकडे या जमिनी कसायला असतात ते लोक विनापरवाना हस्तांतरण, वापरात बदल, पुनर्विकास, टीडीआर, एफएसआय, व अन्य स्वरुपात शर्तभंग करतात.

जमीन देताना शासनाने घातलेल्या अटी व शर्तीचा भंग म्हणजेच शर्तभंग. या जमिनीची खरेदी-विक्री करायची झाल्यास सक्षम प्राधिकरण म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावे लागते. त्यावेळी रेडीरेकनरच्या २५ टक्के रक्कम भरून शर्तभंग नियमित करून दिला जात असे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ३७ अ मधील नवीन तरतुदीनंतर आता असे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे व त्यांनी मंत्रालयात पाठवून द्यावेत असे आदेश महसूल विभागाने २४ फेब्रुवारी २०२३ ला काढले आहेत.तोंडाला फेस येणारया निर्णयाचा जास्त फटका छोट्या शेतकऱ्यांना बसणार आहे. ज्याची जमीन कमी आहे किंवा गायरानातील भूखंड आहे, पैशाची गरज आहे म्हणून तो तातडीने विकून आजारपण, मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण यासाठी पैशाची तजवीज करू इच्छितो अशा शेतकऱ्यांची आता चांगलीच कोंडी होणार आहे.

जे बडे शेतकरी किंवा नोकरदार आहेत ते मंत्रालयात जाऊन त्याचा पाठपुरावा करू शकतील परंतु सामान्य शेतकऱ्याला जिल्हास्तरावरच हेलपाटे मारताना तोंडाला फेस येत होता. शिवाय राज्यभरातील सर्व प्रकरणे मंत्रालयात गेल्यावर तिथे किती विलंब लागेल याचा विचारच न केलेला बरा अशी स्थिती उद्भवणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीMumbaiमुंबई