शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

शर्तभंग नियमित करण्यासाठी आता मंत्रालयात हेलपाटे, शेतकऱ्याची होणार कोंडी; शासनाचा उफराटा फतवा

By विश्वास पाटील | Updated: March 16, 2023 16:15 IST

राज्य सरकार लोकांच्या अडचणी कमी करण्यापेक्षा त्यात कशी भर घालते त्याचा हा आदेश म्हणजे उत्तम नमुना

विश्वास पाटीलकोल्हापूर : जमिनीचा शर्तभंग झाला असल्यास तो नियमित करण्यासाठी लोकांना आता थेट मंत्रालयातच हेलपाटे मारावे लागणार आहेत. कारण फेब्रुवारीपासून शासनाने नियमितीकरणाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडून काढून स्वत:कडे म्हणजे मंत्रालयात घेतले आहेत. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातून वर्षाला सरासरी पाचशेहून अधिक प्रकरणे शर्तभंग नियमितीकरणाची असतात. त्यांना जिल्हा पातळीवरच मंजुरी मिळायला चार-सहा महिने लागतात. आता हा कालावधी वर्षाहून जास्त होणार आहे.राज्य सरकार लोकांच्या अडचणी कमी करण्यापेक्षा त्यात कशी भर घालते त्याचा हा आदेश म्हणजे उत्तम नमुना आहे. इनामी, देवस्थान, वतन,मुलकीपड आणि गावठाण जमिनीची मालकी शासनाकडे असते. त्यांना वर्ग दोनच्या जमिनी म्हटले जाते; परंतु ज्यांच्याकडे या जमिनी कसायला असतात ते लोक विनापरवाना हस्तांतरण, वापरात बदल, पुनर्विकास, टीडीआर, एफएसआय, व अन्य स्वरुपात शर्तभंग करतात.

जमीन देताना शासनाने घातलेल्या अटी व शर्तीचा भंग म्हणजेच शर्तभंग. या जमिनीची खरेदी-विक्री करायची झाल्यास सक्षम प्राधिकरण म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावे लागते. त्यावेळी रेडीरेकनरच्या २५ टक्के रक्कम भरून शर्तभंग नियमित करून दिला जात असे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ३७ अ मधील नवीन तरतुदीनंतर आता असे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे व त्यांनी मंत्रालयात पाठवून द्यावेत असे आदेश महसूल विभागाने २४ फेब्रुवारी २०२३ ला काढले आहेत.तोंडाला फेस येणारया निर्णयाचा जास्त फटका छोट्या शेतकऱ्यांना बसणार आहे. ज्याची जमीन कमी आहे किंवा गायरानातील भूखंड आहे, पैशाची गरज आहे म्हणून तो तातडीने विकून आजारपण, मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण यासाठी पैशाची तजवीज करू इच्छितो अशा शेतकऱ्यांची आता चांगलीच कोंडी होणार आहे.

जे बडे शेतकरी किंवा नोकरदार आहेत ते मंत्रालयात जाऊन त्याचा पाठपुरावा करू शकतील परंतु सामान्य शेतकऱ्याला जिल्हास्तरावरच हेलपाटे मारताना तोंडाला फेस येत होता. शिवाय राज्यभरातील सर्व प्रकरणे मंत्रालयात गेल्यावर तिथे किती विलंब लागेल याचा विचारच न केलेला बरा अशी स्थिती उद्भवणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीMumbaiमुंबई