शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

शांतीसागर महाराजांची जीवनशैली आत्मसात करा

By admin | Updated: June 13, 2017 01:04 IST

कुन्थुसागर महाराज : कुन्थुगिरी येथे जन्मोत्सव जयंती सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क --आळते : सत्य, अहिंसा आणि शांतीचा संदेश पूर्वकालापासून मुनिसंघाने मानवजातीला दिला आहे. त्यामुळे जैन धर्म हा श्रेष्ठ धर्म आहे. आचार्य शांतीसागर महाराजांची आचार, विचार व जीवनशैली आत्मसात केल्यास मानवी जीवन समृद्ध होईल, असा संदेश गणाधिपती गणाधराचार्य श्री कुन्थुसागर महाराज यांनी दिला. आळते (ता. हातकणंगले) येथील कुन्थुगिरी येथे जन्मोत्सव जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गणाधिपती गणधराचार्य श्री कुन्थुसागर महाराज यांच्या ७१ व्या जन्मदिनानिमित्त दि. ८ जून ते ११ जून या चार दिवसांमध्ये कुंन्थुगिरी धर्म क्षेत्रावरती विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये ध्वजारोहण, महामस्तकाभिषेक, आरती, आराधन, दीपोत्सव, संगीत संध्या, गुरुपूजा असे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी धार्मिक प्रवचनामध्ये आचार्य वैराग नंदी, आचार्य निश्चय सागरजी महाराज, आचार्य सुविधी सागरजी महाराज यांचे प्रवचन झाले. मानव जातीच्या कल्याणासाठी जैन धर्मातील सर्व साधूसंतांनी एकत्र येऊन जैन समाज एकसंध ठेवण्याचे काम भविष्यात केले पाहिजे, असा प्रवचनाचा सूर होता. गणाधिपती ऋणधराचार्य कुन्थुसागरजी महाराज यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने १०८ भक्तगणांनी रक्तदान केले. औरंगाबादचे महाजार भक्त संतोषजी पाटणी यांनी चार दिवस येणाऱ्या हजारो भाविकांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. कार्यक्रमासाठी माजी खासदार कल्लापाण्णा आवाडे, आमदार सुजित मिणचेकर, पोलीस अधिकारी सतीश माने, जि. प. सदस्य अरुण इंगवले, सुभाष शेट्टी, माजी जि. प. अध्यक्ष नानासो गाठ, जि. प. सदस्या पद्माराणी पाटील, वंदना मगदूम, सुधाकर मणेर, संजय चौगुले, सुरेश मोघे, सुधीर पाटील, जयूदीदी, पूनम दीदी, दीपक पाटील, प्रमोद जनगोंडा, प्रमोद हावळे, शीतल बुरशे , मान्यवर उपस्थित होते. आळते (ता. हातकणंगले) येथील श्री क्षेत्र कुन्थुगिरी येथे जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गणाधिपती गणधराचार्य श्री कुन्थुसागरजी महाराज यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अन्य मान्यवर उपस्थित होते.