शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

राज्यात फळबाग लागवड कार्यक्रम राबविणार

By admin | Updated: October 24, 2015 01:08 IST

एकनाथ खडसे : जिल्हा प्रशासनाच्या ई-डिस्नीक प्रणालीचे कौतुक ; जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामांचा आढावा

कोल्हापूर : राज्यात फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी १०० टक्के अनुदानावर फळबागांचा भरीव कार्यक्रम ‘मनरेगा’च्या माध्यमातून हाती घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी येथे केले.जिल्ह्यातील महसूल, कृषी आदी विभागांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी गोकुळ शिरगाव येथील ‘गोशिमा’च्या सभागृहात आयोजित केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. नारायण शिसोदे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आर. एन. कावळे आदी उपस्थित होते. मंत्री खडसे म्हणाले, शेतकऱ्यांच्या बांधावर फळबाग लागवड हा उपक्रम ‘मनरेगा’च्या माध्यमातून राबविला जाईल. शेतकऱ्यांच्या ‘फळबागांसाठी एक्स्पोर्ट झोन’ निर्माण करून त्यासाठीच्या सर्व व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा मानस आहे तसेच शेतकऱ्यांनी किमान १० टक्के क्षेत्रावर फळबाग लागवड कार्यक्रम हाती घ्यावा, यासाठी शासनस्तरावरून आवश्यक त्या सवलती उपलब्ध करून दिल्या जातील. त्याबरोबरच तेलबिया आणि डाळींसाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्याबरोबरच ठिबक व तुषार सिंचन हे उपक्रमही प्रभावीपणे राबवून उपलब्ध पाण्यावर अधिकाधिक शेती उत्पन्न घेण्याचा शासनाचा मानस आहे.मंत्री खडसे यांनी शेतकऱ्यांना जमिनीची आरोग्यपत्रिका देण्याचा १०० टक्के कार्यक्रम हाती घ्यावा, यासाठी आवश्यकतेनुसार प्रयोगशाळा निर्माण कराव्यात, प्रसंगी उद्योजकांचे सहकार्य घेऊन अशा प्रयोगशाळा स्थापन करण्याची सूचनाही त्यांनी केली. स्वयंचलित हवामान केंद्रे विकसित करून शेतकऱ्यांना वेळोवेळी सल्ला देण्याबाबत शासनाचा पुढाकार राहील, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर जमिनीमध्ये पाण्याचे साठे निर्माण करण्यासाठी शासनाने हाती घेतलेला ‘जलयुक्त शिवार अभियान’ हा कार्यक्रम अधिक गतिमान करा, अशी सूचना करून राज्य शासनाचा प्राधान्यक्रमाचा कार्यक्रम म्हणून ‘जलयुक्त शिवार अभियाना’कडे पाहिले जात आहे. त्यामुळे यासाठी केंद्र सरकारकडूनही १०० कोटी रुपये डिझेलसाठी उपलब्ध होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.‘ई कॉलिस’मुळे झालेल्या निकालांच्या नकलांसाठी आता दीर्घकाळ वाट न पाहता ते संकेतस्थळावर सर्व निकाल त्वरित उपलब्ध होत असल्याचे जिल्हाधिकारी सैनी यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी ‘महाराजस्व अभियान’ तसेच खरीप, रब्बी हंगाम, पाऊस, पैसेवारी, उत्पादन शुल्क विभागांच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, जिल्हा सूचना कार्यालयाचे तांत्रिकी संचालक चंद्रकांत मुंगळी, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी, प्रांताधिकारी प्रशांत पाटील, संगीता चौगुले, अश्विनी जिरंगे, मोनिका सिंह उपस्थित होते. ई डिस्नीक प्रणाली राज्यभर राबविणारकोल्हापूर जिल्हा प्रशासनाने निर्माण केलेल्या ‘ई-डिस्नीक प्रणाली’स देशपातळीवरचे पारितोषिक मिळाले असून ही प्रणाली संपूर्ण राज्यभर राबविली जात असल्याबद्दल महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी या प्रणालीचे कौतुक केले.