शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पंचगंगेतच गणेशमूर्ती विसर्जनाला परवानगी, आवाडेंची मागणी म्हणजे मूर्तिदान चळवळीला खोडा

By समीर देशपांडे | Updated: August 12, 2022 12:59 IST

आवाडेंच्या या मागणीमुळे फडणवीसही अडचणीत येण्याची शक्यता

समीर देशपांडेकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने रुजत चाललेल्या गणेशमूर्ती आणि निर्माल्य दान चळवळीला नख लावण्याची भूमिका आमदार प्रकाश आवाडे यांनी घेतली आहे. पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जन करू नये असे न्यायालयाचे आदेश डावलून जर आवाडे ही भूमिका घेणार असतील, तर तो न्यायालयाचा अवमान ठरेलच. परंतु, जिल्ह्यातील एका विधायक परंपरेचा बळी घेण्याचे पाप आवाडे आणि भाजपच्या नावावर यानिमित्ताने जमा होणार आहे. आवाडेंची मागणी म्हणजे चक्र उलटे फिरविण्याचा प्रकार आहे.

काँग्रेस सोडून भाजपच्या जवळ गेलेल्या आवाडे यांनी आपण भाजपवाल्यांपेक्षाही किती कट्टर हिंदुत्ववादी आहोत हे दाखविण्यासाठी स्वत:शीच स्पर्धा सुरू केली आहे. त्यांची गेल्या एक, दीड वर्षातील भाषणेच खूप काही सांगून जातात. परंतु, बोलण्यापेक्षा त्यांनी घेतलेली ही नवी भूमिका पंचगंगा नदीसाठी मारक आहे. इचलकरंजीतील गणेशभक्तांच्या विनंतीनुसार पंचगंगा नदीत घरगुती आणि सार्वजनिक मूर्ती विसर्जित करण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आवाडे यांनी परवानगी मिळवली आहे.पंधरा वर्षांपूर्वीपासून पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा गाजत आहे. यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिकाही दाखल झाल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांना यासाठी आढावा बैठक घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. पंचगंगेतील प्रदूषणाला इचलकरंजीतील कापड उद्योगातील अनेक त्रुटी कशा कारणीभूत आहेत याची आकडेवारी दरवर्षी प्रसिद्ध होते.

याच आवाडे यांनी प्रयाग चिखलीपासून काढलेल्या प्रदूषणमुक्तीच्या यात्रेमध्ये कोल्हापुरातील दसरा चौक मैदानावर पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी शिरा ताणून भाषण केले होते. असे असताना आवाडे यांनी सर्व मूर्ती नदीमध्ये विसर्जित करण्याची परवानगी आणून आपल्याच भूमिकेपासून लांब पलायन केले आहे. जिल्ह्यातील हजारो नागरिकांना पंचगंगा आपल्यामुळे आणखी प्रदूषित होऊ नये अशी भूमिका पटली असताना, लाखो मूर्ती दरवर्षी पर्यायी व्यवस्थेद्वारे विसर्जित केल्या जात असताना केवळ मतांसाठी जर आवाडे अशी पर्यावरणविरोधी भूमिका घेणार असतील, तर ते विधायकतेचे चक्र उलटे फिरवल्यासारखे होईल.

कोल्हापूरचा राज्याला आदर्शजिल्ह्यात २०१५ पासून आतापर्यंत घरगुती १६ लाख ४१ हजार १०२ मूर्ती विसर्जित करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक १२,६७४ मूर्ती आणि एकूण १६,५३,७७६ मूर्ती विसर्जित करण्यात आल्या आहेत. ११८१ घंटागाड्या आणि ८३१४ ट्राॅली भरून निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. कोल्हापूरने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा राज्यात एक आदर्श घालून दिला आहे. मात्र, आवाडे यांच्यासारखे सुसंस्कृत लोकप्रतिनिधी याउलट कशी भूमिका घेतात याचे अनेकांना कोडे पडले आहे.

आवाडे फडणवीसांना आणणार अडचणीत

नदीमध्ये मूर्ती विसर्जित करू नये असे उच्च न्यायालयाचे १३ आदेश आहेत. हरित लवादानेही असे निर्णय दिले असून, प्रदूषण नियंत्रण मंडळालाही याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. १८३/२०१२ या क्रमांकाने पंचगंगा प्रदूषणाची याचिका उच्च न्यायालयात आहे. हे सर्व डावलून पंचगंगेतच मूर्ती विसर्जन करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आवाडे यांनी परवानगी आणली आहे. त्यामुळे आवाडेंच्या या मागणीमुळे फडणवीसही अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीनेही अशी परवानगी कशी दिली याबद्दलही लोकांत संतप्त भावना आहेत.

शिव्याशापानंतर मिळतोय प्रतिसादमूर्ती आणि निर्माल्यदान चळवळीला कोल्हापूर जिल्ह्यात सहजासहजी यश मिळालेले नाही. यामध्ये डाव्या, पुरोगामी विचारांचे विज्ञानवादी, रंकाळा बचावचे कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद, महापालिका प्रशासन यांच्यासह सर्वसामान्य नागरिकही सहभागी झाले. पहिल्यांदा अनेकांना शिव्याही खायला लागल्या. त्यानंतर आपले पाणवठे आपणच स्वच्छ ठेवायला पाहिजे अशी भूमिका घेऊन नागरिकांनी ही चळवळ मनावर घेतली. निव्वळ मतांसाठी त्या चळवळीला मागे वळविण्याचे पाप आवाडे यांनी करू नये.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGanpati Festivalगणेशोत्सवriverनदीPrakash Awadeप्रकाश आवाडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस