शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

पंचगंगा घाटावर ४१० गणेश मूर्तींचे विसर्जन : ११५ गणेशमूर्ती अर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 17:54 IST

गणेशभक्तांच्या अपूर्व उत्साहात व भक्तीमय वातावरणात गुरुवारी (दि.१२) सकाळी ते शुक्रवारी पहाटेपर्यंत पंचगंगा घाटावर ४१० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर महापालिकेने केलेल्या आवाहनासही गणेश मंडळांनी प्रतिसाद देत ११५ मूर्तींचे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती अर्पण करण्यात आल्या. या ठिकाणी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिवसभर थांबून होते.

ठळक मुद्देपंचगंगा घाटावर ४१० गणेश मूर्तींचे विसर्जन : ११५ मुर्त्या अर्पणमहापालिकेच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : गणेशभक्तांच्या अपूर्व उत्साहात व भक्तीमय वातावरणात गुरुवारी (दि.१२) सकाळी ते शुक्रवारी पहाटेपर्यंत पंचगंगा घाटावर ४१० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर महापालिकेने केलेल्या आवाहनासही गणेश मंडळांनी प्रतिसाद देत ११५ मूर्तींचे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती अर्पण करण्यात आल्या. या ठिकाणी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिवसभर थांबून होते.पुर ओसरल्यानंतर पंचगंगा घाटावरील गाळ युध्दपातळीवर काढून अग्निशमन दलाच्या बंबाद्वारे पाणी मारुन घाटपरिसराची व या येणा-य मागार्ची स्वच्छता करण्यात आली. यानंतर विर्सजन मिरवणूक गतीने सुरु झाली. तसेच रस्त्यांची डागडूजी करण्यात आली होती. अतिक्रमण व अडथळे हटविण्यात आले होते.

विसर्जन ठिकाणी वीजेची व्यवस्था करण्यात आली होती. पंचगंगा नदी घाट येथे अर्पण करण्यात येणाऱ्या गणेश मुर्ती ठेवणेसाठी मंडप उभारण्यात आले होते. विसर्जन ठिकाणी पोलीस, अग्निशमन दलाचे दक्षता पथक, सुरक्षा रक्षक, पवडी विभाग, आरोग्य विभागाचे कर्मचारी तैनात होते. त्याचबरोबर ट्रॅक्टर, डंपर, जे.सी.बी., रुग्णवाहिका, पाण्याचे टॅकर, बोटी, विद्युत विभागाकडील बुम, रेस्कयु व्हॅन अशी यंत्रणा तैनात करण्यात आली होती. आवश्यक त्या साधनसामुग्रीसह तैनात ठेवणेची व्यवस्था करण्यात आली होती.पंचगंगा नदी घाट येथे पूराचे पाणी असल्याने तराफ्यावरुन गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचे काम महापालिकेकडून सुरु होते. त्याचबरोबर या परिसरात आपत्कालिन विभागाच्या बोटी व जवान कार्यरत होते.

गुरुवारी (दि.१२) सकाळी आठच्या सुमारास पहिल्या गणपतीचे विसर्जन झाले. शुक्रवारी पहाटेपर्यंत या ठिकाणी ४१० मूर्तींचे विसर्जन झाले. त्याचबरोबर महापालिकेने केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती अर्पण आवाहनासही चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये ११५ मूर्ती अपर्ण झाल्या.धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आवाहनपंचगंगा नदी घाटावर डॉ. नानासाहेब धर्माधिकाररी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्य कलश उभारण्यात आला होता. या ठिकाणी ‘पर्यावरण संरक्षणाकरीता निर्माल्य कलशामध्ये टाकावेत’ असा लावलेला फलक विसर्जनासाठी येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता. 

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनkolhapurकोल्हापूर