शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

मुस्कटदाबी करणारा जनसुरक्षा कायदा तत्काळ मागे घ्या, महाविकास आघाडी, डाव्या पक्ष संघटनांची कोल्हापुरात निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 12:07 IST

शासनच महाराष्ट्र अशांत करतेय..

कोल्हापूर : पावसाळी अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात आलेल्या हरकती डावलून महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा विधेयकाला मंजुरी दिली आहे. हा कायदा आंदोलनकर्त्या जनतेची मुस्कटदाबी करणारा आहे. घटनेने दिलेले मुलभूत अधिकार नाकारणारा असून तो लोकशाही विरोधी आहे. तो तत्काळ मागे घ्यावा यासाठी महाविकास आघाडी व डाव्या पक्ष संघटनांच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या.आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना याबाबतचे निवेदन दिले. आमदार पाटील म्हणाले, शासनाने बहुमताचा गैरवापर करून हा कायदा केला आहे. यामागे नक्षलवादाचे कारण दाखविले जात आहे. नक्षलवाद संपावा ही आमची देखील इच्छा आहे त्यासाठी कायद्यात बदल करावा. जनसुरक्षा कायदा करून सामाजिक संघटनांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासनाचे मत झाले असेल तर एखादी संघटना बेकायदेशीर असल्याचे राजपत्रातील अधिसूचनेद्वारे घोषित केले जाणार आहे. आमचा या कायद्याला विरोध असून हा कायदा रद्द होईपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहणार आहे.यावेळी विजय देवणे, भरत रसाळे, व्ही. बी. पाटील, संपत देसाई, आर. के. पोवार, सुनील शिंत्रे, संजय चौगुले, वैभव उगळे, उदय नारकर, संदीप देसाई, सुभाष देसाई, सचिन चव्हाण, दिलीप पवार, बाबूराव कदम, चंद्रकांत यादव, रघुनाथ कांबळे, संदीप मोहिते, वैशाली महाडिक, किशोर खानविलकर, विवेकानंद गोडसे, दाऊद पटेल, जगन्नाथ कुडतुडकर, अनिल घाटगे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शासनच महाराष्ट्र अशांत करतेय..आमदार पाटील म्हणाले, महाराष्ट्र हित हे आत्ताच्या सरकारचे उद्देश नाही. यांचा अजेंडा फक्त नागरिकांना अडचणीत आणायचा आहे. शक्तिपीठ महामार्ग, जनसुरक्षा कायदा, आरक्षणाचा संभ्रम अशा गोष्टीतून सरकारच महाराष्ट्राला अशांत करत आहेत.

लोकशाही अबाधित राखण्याचे आव्हाननेपाळमधील घटनेचा संदर्भ देत पाटील म्हणाले, भ्रष्टाचार, राेजगार, महागाई या प्रश्नांवरून नेपाळमध्ये उद्रेक झाला. भविष्यात या बाबींवर उपाययोजना करून लोकशाही अबाधित राखण्याचे आव्हान सरकारपुढे असणार आहे.