शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

त्रुटींची पूर्तता करून कोल्हापुरातील विमानसेवा त्वरित सुरू करा : चंद्रकांतदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 13:18 IST

कोल्हापुरातील विमानसेवा सुरू होण्यामध्ये एक एक दिवसाचा जो विलंब होत आहे, त्यातून जिल्ह्याचे होणारे नुकसान पाहता व लोकभावना लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व त्रुटी तत्काळ पूर्ण करून विमानसेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे दिल्या.

ठळक मुद्दे कोल्हापुरात विमानसेवा सुरू होण्यामध्ये जिल्ह्याचे नुकसान नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या पथकाने घेतली मंत्री पाटील यांची भेट

कोल्हापूर , दि. २७ : कोल्हापुरातील विमानसेवा सुरू होण्यामध्ये एक एक दिवसाचा जो विलंब होत आहे, त्यातून जिल्ह्याचे होणारे नुकसान पाहता व लोकभावना लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व त्रुटी तत्काळ पूर्ण करून विमानसेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे दिल्या.

नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या उपसंचालिका सुब्रता सक्सेना, सहायक संचालक मुकेश वर्मा, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे सरव्यवस्थापक एस. एस. बालन, उपसरव्यवस्थापक कृष्णकुमार, दीपक खोब्रागडे, मानसिंग माने, कोल्हापूर विमानतळाच्या पूजा मालू यांच्या पथकाने पालकमंत्री पाटील यांनी गुरुवारी शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली. यामध्ये विमानसेवा नियमित सुरू होण्यामध्ये येत असलेल्या अडचणींचा व त्यावरील करण्यात येणाºया उपाययोजनांचा मंत्री पाटील यांनी आढावा घेतला.

कोल्हापूरची विमानसेवा लवकरात लवकर सुरू व्हावी यादृष्टीने ‘कंडिशनल लायसन्स’ (अटी व शर्थी घालून परवाने) द्या. त्यामुळे त्रुटी दिलेल्या मुदतीत पूर्ण होतील, असे सांगून मंत्री पाटील यांनी विमानसेवा सुरू करण्यामध्ये कोणत्याच मोठ्या अडचणी नाहीत. सुरक्षिततेच्यादृष्टीने ज्या बाबी असतील त्या कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, असे सांगितले.

यामध्ये विमानतळाची इमारत, एक किलो मीटरची वाढीव धावपट्टी, टॉवर, आदी सर्व अनुषंगिक बाबींवर चर्चा झाली. कोल्हापूरमध्ये नियमित विमानसेवा सुरू होणे ही कोल्हापूरमधील औद्योगिक व अन्य घटकांसाठी अत्यावश्यक बाब असून, जवळपास सहा ते सात वर्षांपासून बंद असलेल्या विमानसेवेमुळे कोल्हापूरच्या आर्थिक, औद्योगिक विकासाला त्याचा चांगलाच फटका बसला आहे.

अनेक नवीन उद्योग, मोठे प्रकल्प कोल्हापूरमध्ये विमानसेवा नसल्याने येऊ शकले नाहीत. याचा जिल्ह्याच्या विकासावरही परिणाम झाला आहे. विमानसेवा लवकरात लवकर सुरू झाल्यावर त्याचे परिणाम सामाजिक, आर्थिक उन्नतीमध्ये लवकरात लवकर दिसून येतील. त्यामुळे ही विमानसेवा लवकरात लवकर सुरू व्हावी. त्यासाठी असणाऱ्या त्रुटी प्रशासनाने प्राधान्याने सोडवाव्यात, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :AirportविमानतळChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील