शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

त्रुटींची पूर्तता करून कोल्हापुरातील विमानसेवा त्वरित सुरू करा : चंद्रकांतदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 13:18 IST

कोल्हापुरातील विमानसेवा सुरू होण्यामध्ये एक एक दिवसाचा जो विलंब होत आहे, त्यातून जिल्ह्याचे होणारे नुकसान पाहता व लोकभावना लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व त्रुटी तत्काळ पूर्ण करून विमानसेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे दिल्या.

ठळक मुद्दे कोल्हापुरात विमानसेवा सुरू होण्यामध्ये जिल्ह्याचे नुकसान नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या पथकाने घेतली मंत्री पाटील यांची भेट

कोल्हापूर , दि. २७ : कोल्हापुरातील विमानसेवा सुरू होण्यामध्ये एक एक दिवसाचा जो विलंब होत आहे, त्यातून जिल्ह्याचे होणारे नुकसान पाहता व लोकभावना लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व त्रुटी तत्काळ पूर्ण करून विमानसेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे दिल्या.

नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या उपसंचालिका सुब्रता सक्सेना, सहायक संचालक मुकेश वर्मा, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे सरव्यवस्थापक एस. एस. बालन, उपसरव्यवस्थापक कृष्णकुमार, दीपक खोब्रागडे, मानसिंग माने, कोल्हापूर विमानतळाच्या पूजा मालू यांच्या पथकाने पालकमंत्री पाटील यांनी गुरुवारी शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली. यामध्ये विमानसेवा नियमित सुरू होण्यामध्ये येत असलेल्या अडचणींचा व त्यावरील करण्यात येणाºया उपाययोजनांचा मंत्री पाटील यांनी आढावा घेतला.

कोल्हापूरची विमानसेवा लवकरात लवकर सुरू व्हावी यादृष्टीने ‘कंडिशनल लायसन्स’ (अटी व शर्थी घालून परवाने) द्या. त्यामुळे त्रुटी दिलेल्या मुदतीत पूर्ण होतील, असे सांगून मंत्री पाटील यांनी विमानसेवा सुरू करण्यामध्ये कोणत्याच मोठ्या अडचणी नाहीत. सुरक्षिततेच्यादृष्टीने ज्या बाबी असतील त्या कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, असे सांगितले.

यामध्ये विमानतळाची इमारत, एक किलो मीटरची वाढीव धावपट्टी, टॉवर, आदी सर्व अनुषंगिक बाबींवर चर्चा झाली. कोल्हापूरमध्ये नियमित विमानसेवा सुरू होणे ही कोल्हापूरमधील औद्योगिक व अन्य घटकांसाठी अत्यावश्यक बाब असून, जवळपास सहा ते सात वर्षांपासून बंद असलेल्या विमानसेवेमुळे कोल्हापूरच्या आर्थिक, औद्योगिक विकासाला त्याचा चांगलाच फटका बसला आहे.

अनेक नवीन उद्योग, मोठे प्रकल्प कोल्हापूरमध्ये विमानसेवा नसल्याने येऊ शकले नाहीत. याचा जिल्ह्याच्या विकासावरही परिणाम झाला आहे. विमानसेवा लवकरात लवकर सुरू झाल्यावर त्याचे परिणाम सामाजिक, आर्थिक उन्नतीमध्ये लवकरात लवकर दिसून येतील. त्यामुळे ही विमानसेवा लवकरात लवकर सुरू व्हावी. त्यासाठी असणाऱ्या त्रुटी प्रशासनाने प्राधान्याने सोडवाव्यात, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :AirportविमानतळChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील