शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

त्रुटींची पूर्तता करून कोल्हापुरातील विमानसेवा त्वरित सुरू करा : चंद्रकांतदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 13:18 IST

कोल्हापुरातील विमानसेवा सुरू होण्यामध्ये एक एक दिवसाचा जो विलंब होत आहे, त्यातून जिल्ह्याचे होणारे नुकसान पाहता व लोकभावना लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व त्रुटी तत्काळ पूर्ण करून विमानसेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे दिल्या.

ठळक मुद्दे कोल्हापुरात विमानसेवा सुरू होण्यामध्ये जिल्ह्याचे नुकसान नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या पथकाने घेतली मंत्री पाटील यांची भेट

कोल्हापूर , दि. २७ : कोल्हापुरातील विमानसेवा सुरू होण्यामध्ये एक एक दिवसाचा जो विलंब होत आहे, त्यातून जिल्ह्याचे होणारे नुकसान पाहता व लोकभावना लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व त्रुटी तत्काळ पूर्ण करून विमानसेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे दिल्या.

नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या उपसंचालिका सुब्रता सक्सेना, सहायक संचालक मुकेश वर्मा, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे सरव्यवस्थापक एस. एस. बालन, उपसरव्यवस्थापक कृष्णकुमार, दीपक खोब्रागडे, मानसिंग माने, कोल्हापूर विमानतळाच्या पूजा मालू यांच्या पथकाने पालकमंत्री पाटील यांनी गुरुवारी शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली. यामध्ये विमानसेवा नियमित सुरू होण्यामध्ये येत असलेल्या अडचणींचा व त्यावरील करण्यात येणाºया उपाययोजनांचा मंत्री पाटील यांनी आढावा घेतला.

कोल्हापूरची विमानसेवा लवकरात लवकर सुरू व्हावी यादृष्टीने ‘कंडिशनल लायसन्स’ (अटी व शर्थी घालून परवाने) द्या. त्यामुळे त्रुटी दिलेल्या मुदतीत पूर्ण होतील, असे सांगून मंत्री पाटील यांनी विमानसेवा सुरू करण्यामध्ये कोणत्याच मोठ्या अडचणी नाहीत. सुरक्षिततेच्यादृष्टीने ज्या बाबी असतील त्या कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, असे सांगितले.

यामध्ये विमानतळाची इमारत, एक किलो मीटरची वाढीव धावपट्टी, टॉवर, आदी सर्व अनुषंगिक बाबींवर चर्चा झाली. कोल्हापूरमध्ये नियमित विमानसेवा सुरू होणे ही कोल्हापूरमधील औद्योगिक व अन्य घटकांसाठी अत्यावश्यक बाब असून, जवळपास सहा ते सात वर्षांपासून बंद असलेल्या विमानसेवेमुळे कोल्हापूरच्या आर्थिक, औद्योगिक विकासाला त्याचा चांगलाच फटका बसला आहे.

अनेक नवीन उद्योग, मोठे प्रकल्प कोल्हापूरमध्ये विमानसेवा नसल्याने येऊ शकले नाहीत. याचा जिल्ह्याच्या विकासावरही परिणाम झाला आहे. विमानसेवा लवकरात लवकर सुरू झाल्यावर त्याचे परिणाम सामाजिक, आर्थिक उन्नतीमध्ये लवकरात लवकर दिसून येतील. त्यामुळे ही विमानसेवा लवकरात लवकर सुरू व्हावी. त्यासाठी असणाऱ्या त्रुटी प्रशासनाने प्राधान्याने सोडवाव्यात, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :AirportविमानतळChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील