शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

अन्नसुरक्षा कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करा

By admin | Updated: July 22, 2014 00:40 IST

भाकपचा मोर्चा : ३० जुलैला बैठकीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

कोल्हापूर : अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करावी, यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी, ३० जुलैला या प्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात बैठक घेऊ, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती.सध्या रेल्वेच्या प्रवासी दरात साडेचौदा टक्के व मालवाहतूक दरात साडेसहा टक्के भाडेवाढ केली आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाने अर्थसंकल्प जाहीर केला आहे. त्यामध्ये महागाईचा दृष्टिकोन दिसून येत आहे. अन्नसुरक्षेच्या कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे; परंतु केशरी कार्डावर एक, दोन व तीन रुपयांत मिळणाऱ्या धान्याची सवलत अनेक केशरी कार्डधारकांना मिळत नाहीत, त्याचबरोबर शेतकरी, शेतमजूर अशा ६० वर्षांवरील असंघटितांच्या पेन्शनबाबत मिळावी, या मागणीसाठी टाऊन हॉल बाग येथून ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. दुपारी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला.यावेळी गोविंद पानसरे म्हणाले, केंद्रातील सत्ताधारी भाजप तसेच काँग्रेसच्या संयुक्त पुरोगामी आघाडी या सरकारने जनतेची फसवणूक केली. भाजप सरकार हे भांडवलदारांचे आहे. त्यामुळे निवडणुकीत पैशांचे आमिष दाखवणाऱ्यांना धुडकावून लावा.नामदेव गावडे म्हणाले, केंद्रातील सरकारने दीड महिन्यांतच इंधन व रेल्वे दरवाढ केली. त्यामुळे हे सरकार भांडवलदारांचे हित जपणारे आहे. यावेळी सुशीला यादव, दिलीप पवार, रघुनाथ कांबळे आदींची भाषणे झाली. मोर्चात बाळासाहेब बर्गे, सतीशचंद्र कांबळे, ए. बी. जाधव, शिवाजी शिंदे, महादेव आवटे, दिनकर सूर्यवंशी, रत्नाकर तोरसे, महादेव पडवळ आदी सहभागी होते.