शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
2
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
3
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
4
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
5
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
6
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
7
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
8
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
9
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
10
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
11
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
12
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
13
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
14
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
15
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
16
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
17
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
18
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
19
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
20
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

अन्नसुरक्षा कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करा

By admin | Updated: July 22, 2014 00:40 IST

भाकपचा मोर्चा : ३० जुलैला बैठकीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

कोल्हापूर : अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करावी, यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी, ३० जुलैला या प्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात बैठक घेऊ, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती.सध्या रेल्वेच्या प्रवासी दरात साडेचौदा टक्के व मालवाहतूक दरात साडेसहा टक्के भाडेवाढ केली आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाने अर्थसंकल्प जाहीर केला आहे. त्यामध्ये महागाईचा दृष्टिकोन दिसून येत आहे. अन्नसुरक्षेच्या कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे; परंतु केशरी कार्डावर एक, दोन व तीन रुपयांत मिळणाऱ्या धान्याची सवलत अनेक केशरी कार्डधारकांना मिळत नाहीत, त्याचबरोबर शेतकरी, शेतमजूर अशा ६० वर्षांवरील असंघटितांच्या पेन्शनबाबत मिळावी, या मागणीसाठी टाऊन हॉल बाग येथून ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. दुपारी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला.यावेळी गोविंद पानसरे म्हणाले, केंद्रातील सत्ताधारी भाजप तसेच काँग्रेसच्या संयुक्त पुरोगामी आघाडी या सरकारने जनतेची फसवणूक केली. भाजप सरकार हे भांडवलदारांचे आहे. त्यामुळे निवडणुकीत पैशांचे आमिष दाखवणाऱ्यांना धुडकावून लावा.नामदेव गावडे म्हणाले, केंद्रातील सरकारने दीड महिन्यांतच इंधन व रेल्वे दरवाढ केली. त्यामुळे हे सरकार भांडवलदारांचे हित जपणारे आहे. यावेळी सुशीला यादव, दिलीप पवार, रघुनाथ कांबळे आदींची भाषणे झाली. मोर्चात बाळासाहेब बर्गे, सतीशचंद्र कांबळे, ए. बी. जाधव, शिवाजी शिंदे, महादेव आवटे, दिनकर सूर्यवंशी, रत्नाकर तोरसे, महादेव पडवळ आदी सहभागी होते.