शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

संमतीपत्राच्या आडून शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर याद राखा; स्वाभिमानीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 21:05 IST

कायद्यातील पळवाटेचा आधार घेऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करून समंती पत्राच्या आडून फसवणूक कराल, तर याद स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी आहे. असा इशारा देत संतप्त कार्यकर्त्यांनी निवेदन फाडून कार्यालयात भिरकावल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.

ठळक मुद्देसमंतीपत्राच्या आडून फसवणूक कराल तर याद राखा : स्वाभिमानीचा इशारासंतप्त कार्यकर्त्यांनी निवेदन फाडून भिरकावली

कोल्हापूर: कायद्यातील पळवाटेचा आधार घेऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करून संमती पत्राच्या आडून फसवणूक कराल, तर गाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी आहे, असा इशारा देत संतप्त कार्यकर्त्यांनी निवेदन फाडून कार्यालयात भिरकावल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून संमती पत्रे घेऊन एफआरपी दोन-तीन टप्यात सप्टेंबरपर्यंत देण्यासाठी कायद्याने बांधून घेतले आहे. त्याबाबत सोमवारी लोकमतने वस्तूस्थिती मांडल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून त्याचा जाब विचारण्यासाठी स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाने सोमवारी प्रादेशिक साखर सहसंचालक एन. आर. निकम यांची भेट घेऊन संमती पत्राच्या आडून एफआरपीचे तुकडे पाडू देणार नसल्याचे ठणकावून सांगितले.सागर शंभूशेट्टे म्हणाले, वारणा कारखान्याने मागील एफआरपी दिली नसताना गेल्या वर्षी गाळप परवाना दिला कसा? शेतकऱ्यांनाच तेवढे कायदा आणि कारखानदार मोकाट फिरणार असतील तर याद राखा, गाठ स्वाभिमानीशी आहे, असा इशारा वैभव कांबळे व रंगराव पाटील यांनी दिला. याच दरम्यान, सागर शंभूशेट्टे यांनी निवेदन फाडून कार्यालयात भिरकावल्याने वातावरण तणावपुर्ण बनले. पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना शांत केले.यावर, जबरदस्तीने कोणाला समंती पत्रे घेता येणार नाहीत. असे कोण करत असेल व नोंद किंवा ऊस तोडीबाबत अडवणूक करत असेल तर साखर सहसंचालक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रादेशिक साखर सहसंचालक एन. आर. निकम यांनी सांगितले. यावेळी साखर उपसंचालक एस. एन. जाधव, सहकार श्रेणी अधिकारी-१ रमेश बारडे उपस्थित होते.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना