शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

अस्तिंत्वाला आव्हान द्याल तर आमच्याशी गाठ

By admin | Updated: March 10, 2017 00:16 IST

कल्लाप्पाण्णा आवाडे : पक्षासाठी आजपर्यंत अन्याय सहन केला; पदाधिकारी सत्कार सोहळ्यात आवाडे पिता-पुत्रांनी मन केले मोकळे

इचलकरंजी : आमच्या अस्तित्वालाच जर कोणी आव्हान देत असाल, तर गाठ आमच्याशी आहे. पक्षासाठी आजपर्यंत खूप अन्याय सहन केले, पण आता बस्स झाले. आवाडे गट आपली ताकद दाखविण्यासाठी सज्ज झाला आहे. ज्यांनी व्यक्तिद्वेषातून विरोध केला, त्यांचा समाचार घ्यावाच लागेल, असा गर्भीत इशारा माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी दिला.ताराराणी विकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. येथील लायन्स क्लबमध्ये ‘आम्ही आवाडे समर्थक’ यांच्यावतीने हा समारंभ घेण्यात आला. यावेळी ते म्हणाले, जिल्हा कॉँग्रेस जिवंत ठेवण्याचे काम हे पूर्वीपासून इचलकरंजीकरांनी केले आहे. यापूर्वीच्या नेत्यांमध्येही मतभेद होते; पण त्यांनी पक्षाची हानी होऊ दिली नाही. मात्र, आता ज्या पद्धतीने आवाडे घराण्याला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो खपवून घेतला जाणार नाही. सध्याच्या राजकारणात सगळीकडच्या आघाड्या चालतात. फक्त आवाडेंची चालत नाही. यावेळी थोडी घाईगडबड झाली; पण पुढे ही समीकरणे चुकणार नाहीत. कॉँग्रेसअंतर्गत आवाडे गट म्हणून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.प्रकाश आवाडे म्हणाले, व्यक्तिद्वेषातून पछाडलेल्या कॉँग्रेसमधील काही मंडळींनी नेहमी द्वेषाचे राजकारण केले. त्यातूनच हा उद्रेक झाला. जे झाले, ते योग्यच आहे. जिल्ह्यातील बदलत्या राजकारणाची ही नांदी आहे. आम्ही काय करू शकतो, हे आता दाखवून दिले आहे. पुढच्या काळात खूप वेगळ्या पद्धतीचे राजकारण बघायला मिळणार आहे. आता आमची कोणत्याही पक्षाबरोबर बांधीलकी राहिली नाही. ज्यांनी आम्हाला विरोध केला, ते रिंगणात येतील त्यावेळी त्यांना त्यांची जागा दाखविली जाईल. राहुलच्या माध्यमातून नव्या पिढीतील राजकारणाला सुरुवात झाली आहे. तरुणांनी पुढील काळात आवश्यक त्या पद्धतीने पावले टाकत सोबत येणाऱ्या सर्वांना गोळा करा. सगळ्या पक्षातील सगळे आम्हाला चालतात. गत निवडणुकांमध्ये आमच्याच लोकांनी आमचा कार्यक्रम केला. आता त्यांना सुटी नाही. नव्याने तयार झालेली फळी घट्टपणाने बांधायची आहे. कार्यक्रमाचे स्वागत शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी केले. यावेळी विलास गाताडे, पद्माराणी पाटील, महेश पाटील, शशांक बावचकर, राहुल आवाडे, आदींची भाषणे झाली. (वार्ताहर)ताराराणी विकास आघाडीच्या माध्यमातून रिंगणात आवाडेंनी पक्षाकडून वारंवार डावलले जात असल्याच्या कारणावरून पक्षाशी फारकत घेत नव्याने ताराराणी विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली. त्यामध्ये मिळालेल्या यशाबद्दल आवाडे समर्थकांकडून हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असला तरी यामध्ये मंचकावर बहुतांशी कॉँग्रेसचे पदाधिकारी जातीने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत शहर कॉँग्रेसच्या अध्यक्षांनीच केले. याबाबत कार्यक्रमस्थळी चर्चा सुरू होती.कॉँग्रेसला सुबुद्धीज्यावेळी कॉँग्रेस पक्षाला सुबुद्धी सुचेल, त्यावेळी काय निर्णय घ्यायचा, ते ठरविले जाईल. तोपर्यंत ताराराणी आघाडीच राहील. त्या माध्यमातून आपल्या गटाची ताकद कार्यकर्त्यांनी वाढवावी, असे आवाहन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.आवाडे गटाची ताकद वाढविणार आगामी काळात इचलकरंजीसह हातकणंगले, वडगाव व शिरोळ या विधानसभा मतदारसंघांतही आवाडे गटाची ताकद वाढविली जाईल. नव्या राजकारणात नव्याने घडामोडी घडवून आवाडे गटाची ताकद वाढविली जाणार आहे, असे प्रकाश आवाडे यांनी भाषणात नमूद केले.दादा-अण्णांच्या माघारी आघाडीची नोंदणीताराराणी विकास आघाडीची नोंदणी करताना याबाबत आपण माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना न सांगताच केली होती, असे राहुल आवाडे यांनी स्पष्ट करत त्या आघाडीच्या माध्यमातूनच आवाडे घराण्याच्या राजकारणाला बळ मिळाल्याचे आपल्या भाषणात सांगितले.राजू शेट्टी-मिणचेकरनिवडणुकीत खासदार राजू शेट्टी व आमदार सुजित मिणचेकर यांच्याशी चर्चा केली. मात्र, वेळ कमी असल्याने ते घडले नाही. आगामी काळात हे समीकरण नक्कीच जुळवून आणून हातकणंगले तालुक्यातील राजकारण केले जाईल, असेही प्रकाश आवाडे यांनी संकेत दिले.