शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

वीज दरवाढ केली तर रस्त्यावरची लढाई अटळ, माजी आमदार संजय घाटगेंचा इशारा

By राजाराम लोंढे | Updated: February 28, 2023 15:22 IST

महावितरणने वीज दरवाढीचा घाट घातला

कोल्हापूर : महापूर, कोरोना नंतर महागड्या खतामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना आतामहावितरणने वीज दरवाढीचा घाट घातला आहे. या दरवाढीला शेतकऱ्यांचा विरोध असून त्यातूनही शेतकऱ्यांच्या माथी दरवाढ मारली तर रस्त्यावरची लढाईल अटळ असल्याचा इशारा माजी आमदार संजय घाटगे यांनी दिला. महावितरणच्या वतीने वीज दरवाढीबाबत सुनावणीची प्रक्रिया सुरु आहे. त्यानंतर दरवाढ लागू करण्याबाबत हालचाली असून त्याला विरोध म्हणून महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीने मंगळवारी महावितरणच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयासमोर वीज दरवाढ प्रस्तावाची होळी करण्यात आली. त्यावेळी घाटगे बोलत होते. इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर म्हणाले, अगोदरच शेती आतबट्यात आली असताना त्या महावितरणने शेतकऱ्यांना दरवाढीच्या माध्यमातून शॉक देण्याची तयारी केली आहे. हे कदापी खपवून घेणार नाही. शेतकऱ्यांवर येणाऱ्या संकटाचा विचार करुन सहकारी पाणी पुरवठा संस्थांचा सवलतीचा कृषी पंप वीज दर किमान २०२५ पर्यंत कायम ठेवावा. यावेळी जय शिवराय शेतकरी संघटनेचे नेते शिवाजी माने, व्यंकाप्पा भोसले आदींनी मनोगत व्यक्त केले.दरवाढी करु नये या मागणीचे निवेदन महावितरणचे मुख्य अभियंता परेश भागवत यांना देण्यात आले. प्रताप होगाडे, भारत पाटील-भुयेकर, ‘कुंभी’चे संचालक संजय पाटील-खुपीरेकर, चंद्रकांत पाटील, आर. के. पाटील, मारुती पाटील आदी उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmahavitaranमहावितरणelectricityवीज