शहरं
Join us  
Trending Stories
1
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
2
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
3
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
4
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
5
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
6
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
7
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
8
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
9
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
10
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
11
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
12
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
13
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
14
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
15
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
16
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
17
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
18
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
19
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
20
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना

Kolhapur: ‘करवीर’मधील मतदारसंघ पुनर्रचनेचे त्रांगडे, हद्दवाढ झाल्यास कमी होतील दोन मतदारसंघ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 17:22 IST

इच्छुकांची घालमेल वाढली

प्रकाश पाटीलकोपार्डे : शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया निवडणूक विभागाने सुरू केली असली तरी हद्दवाढीमुळे त्रांगडे तयार झाले आहे. हद्दवाढीत उचगाव, पाचगाव, कळंबा, उजळाईवाडी या गावांसह पाडळी, बालिंगे येथील कॉलनींचा समावेश होण्याचे संकेत आहेत. ही गावे शहरात गेली तर जिल्हा परिषदेचे किमान दोन मतदारसंघ कमी होणार आहेत. त्यामुळे सगळ्याच मतदारसंघांची अदलाबदल करावी लागणार असल्याने इच्छुकांची घालमेल सुरू आहे.१२ जूनला निघालेल्या नोटिफिकेशनने करवीर तालुक्यात ११ ऐवजी १२ जिल्हा परिषद मतदारसंघ होणार आहेत. १२वा मतदारसंघ कोणता वाढणार याकडे निवडणूक लढवणाऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यानच्या काळात हद्दवाढीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हद्दवाढीत उचगाव, पाचगाव, कळंबा, मोरेवाडी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी या गावांसह पाडळी व बालिंगे या गावांचे गावठाण वगळून कॉलनी अशा आठ गावांचा शहरात समावेश केला जाणार आहेत.मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होण्याअगोदर ही हद्दवाढ झाली तर करवीरमधील दोन जिल्हा परिषद मतदारसंघ कमी होणार आहेत. नाही झाली तर एक मतदारसंघ वाढणार आहे. यामुळे जिल्हा परिषद मतदारसंघ वाढणार की कमी होणार याबाबत त्रांगडे निर्माण झाले आहे.जिल्ह्यात करवीर तालुका अडीच प्लॉटचा सर्वांत मोठा तालुका आहे. यात करवीर विधानसभा मतदारसंघ व दक्षिण विधानसभा मतदारसंघ येतात. करवीरमध्ये काँग्रेसला शिवसेनेचे, तर दक्षिणमध्ये भाजपचे तगडे आव्हान आहे. करवीर विधानसभा मतदारसंघात आमदार नरके यांच्या विजयाने शिये, वडणगे, शिंगणापूर, सांगरूळ जिल्हा परिषद मतदासंघात ताकद वाढली आहे. उचगाव, पाचगाव, मुडशिंगी, उजळाईवाडीत आमदार अमल महाडिक यांचा विधानसभा निवडणुकीत विजय झाल्याने भाजपची ताकद वाढली आहे. वाशी, परितेमध्ये आजही काँग्रेसचे वर्चस्व आहे. करवीरमध्ये आपले वर्चस्व टिकवण्यासाठी काँग्रेसला जिवाचे रान करावे लागणार आहे.

मावळत्या जिल्हा परिषदेतील बलाबल

  • शिवसेना -२
  • काँग्रेस - ८
  • अपक्ष -१

करवीर पंचायत समिती

  • काँग्रेस- १६
  • शिवसेना- ४
  • भाजप -२

हद्दवाढीला गावांचा विरोध असल्याने ती शहरात घेण्याचा प्रश्नच येत नाही. याचबरोबर महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदेच्या प्रभागांच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे; पण निवडणूक आयोगाचेही याबाबत धोरण अजून जाहीर झालेले नाही. यामुळे करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ कमी होणार नाहीत. -आमदार चंद्रदीप नरके