शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

स्थानिकांना हवा असेल तर नाणार प्रकल्प हाेईल : राजन साळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:22 IST

राजापूर : कोकणात रोजगार नाही... नोकऱ्या नाहीत त्यामुळे प्रकल्प व्हावा, अशी मागणी स्थानिकांकडून पुढे येत आहे. स्थानिकांनी मागणी केली ...

राजापूर : कोकणात रोजगार नाही... नोकऱ्या नाहीत त्यामुळे प्रकल्प व्हावा, अशी मागणी स्थानिकांकडून पुढे येत आहे. स्थानिकांनी मागणी केली तर भविष्यात नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील, असा आशावाद वाटतो, असे सूचक विधान आमदार राजन साळवी यांनी मुंबईत एका वृत्त वाहिनीशी बोलताना केले. त्यामुळे नाणार प्रकल्पाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

राजापूर तालुक्यात आलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासह नाणार रिफायनरी प्रकल्पाविरुध्द शिवसेनेने सुरुवातीपासूनच प्रखर विरोधाची भूमिका घेतली होती. तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारविरोधात आंदोलने झाली. एका तरूणाचा त्यात मृत्यूही झाला. तरीही काँग्रेस आघाडी सरकारने आपले प्रयत्न सुरू ठेवले. अखेर हेक्टरी साडेबावीस लाख रुपये सानुग्रह देण्याची घोषणा सरकारने केल्यानंतर लोकांनी मोबदला स्वीकारण्यास सुरूवात केली. आतापर्यंत जैतापूर परिसरातील सुमारे ९५ टक्के प्रकल्पग्रस्त जनतेने शासनाकडून मिळणारा मोबदला स्वीकारला आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार राजन साळवी यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना आपली भूमिका मांडली. जैतापूरप्रमाणेच शासनाने नाणार प्रकल्पग्रस्तांना मोबदला दिला तर शिवसेनेचा विरोध मावळेल का? असा प्रश्न आमदार साळवी यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, नाणार प्रकल्पासंदर्भात शिवसेना स्थानिक जनतेच्या पाठीशी आहे. स्थानिक जनतेने विरोध केल्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुखांनी हा प्रकल्प रद्द करुन घेतला होता. मात्र, कोकणात रोजगार नाही, नोकऱ्या नाहीत, त्यामुळे नाणार प्रकल्प व्हावा, अशी मागणी स्थानिक जनतेतून पुढे येत आहे. भविष्यात हा प्रकल्प व्हावा, अशी मागणी स्थानिकांनी केली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्याबद्दल योग्य निर्णय घेतील, असे साळवी यांनी सांगितले.