शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

हिंमत असेल तर वेगवेगळे लढून दाखवा : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 00:37 IST

शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष एकटा लढला. तरीही आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि राजू शेट्टी यांच्या आघाडीच्या नेत्यांच्या तोंडाला फेस आणला. तुम्ही सर्वजण एकत्र आल्यानंतरही आम्ही निम्म्याहून अधिक जागा जिंकल्या.

ठळक मुद्देकाँग्रेस, राष्ट्रवादीला आव्हानजागावाटपात त्यांचे एकमत होणार नाही, एकमत झालेच तर मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होणार आहे.

कोल्हापूर : शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष एकटा लढला. तरीही आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि राजू शेट्टी यांच्या आघाडीच्या नेत्यांच्या तोंडाला फेस आणला. तुम्ही सर्वजण एकत्र आल्यानंतरही आम्ही निम्म्याहून अधिक जागा जिंकल्या. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभेत काय होणार हे स्पष्ट आहे. हिंमत असेल तर वेगवेगळे लढा, कोण सरकार करतंय ते बघूया, अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही काँग्रेस आणि ‘स्वाभिमानी’ला खुले आव्हान दिले आहे.

शिरोळ नगरपालिका निकालानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पृथ्वीराज यादव यांचा केवळ ३३ मतांनी पराभव झाला. १७ नगरसेवकांपैकी ८ जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आहेत, तर तीन जागा ९, १२, २२ इतक्या अल्प मतांनी पडल्या. आणखी एक जागा आली असती तर उपनगराध्यक्षासाठी १७ पैकी ९ म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त जागा भाजपच्या झाल्या असत्या, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी वेगवेगळे लढूच शकत नाहीत म्हणून रोज एकत्र येऊन काथ्याकुट करत आहेत. जागावाटपात त्यांचे एकमत होणार नाही, एकमत झालेच तर मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होणार आहे. एकत्र येऊनसुद्धा आम्हीच तुम्हाला पाडू, हिंमत असेल तर वेगवेगळे लढा, असे खुले आव्हानही पाटील यांनी दिले आहे. स्वतंत्र लढून राज्यात आम्ही १२३ जागा जिंकल्या. त्यामुळे एकटे लढा हा सल्ला तुम्ही देऊ नका, असेही त्यांनी सांगितले. तसेच भाजपला भरभरून मते दिल्याबद्दल शिरोळच्या जनतेचे पाटील यांनी आभार मानले आहेत.उल्हास पाटील यांनी हसे करून घेतलेभाजपला हरविण्यासाठी शिरोळ नगरपालिकेत राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राजू शेट्टी हे एकत्र आले, हे कमी म्हणून की काय, आदल्या रात्री शिवसेनाही त्यांच्यासोबत गेली.

आमदार उल्हास पाटील यांनी आपण उभा केलेला उमेदवार आघाडीसोबत जोडताना विचार करायला हवा होता.भाजप आणि पृथ्वीराज यादव यांच्यावरील रागामुळे आमदार उल्हास पाटील यांनी या निवडणुकीत आपले हसे करून घेतले. त्यांच्या उमेदवाराला जेमतेम १३०० मते पडली.याचा अर्थ रात्रीत ही सगळी मते आघाडीकडे वळवल्याचे स्पष्ट झाल्याचे पाटील यांनी नमूद केले आहे.शिरोळ नगरपालिका निवडणूक

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलPoliticsराजकारणElectionनिवडणूक