कोल्हापूर : राज्य सरकार टोल रद्द करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेत आहे. निर्णय घेण्यास कदाचित दोन-चार दिवसांचा फरक पडू शकतो. त्यामुळे १५ दिवसांची मुदत संपली म्हणून ‘आयआरबी’ कंपनीने आज, मंगळवारी रात्रीपासून टोलवसुली करण्याचा प्रयत्न करू नये; अन्यथा पुन्हा एकदा टोलविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सर्वपक्षीय कृती समितीने सोमवारी दिला. तसेच कोणत्याही नेत्यांची वाट न पाहता टोलवसुलीला विरोध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी टोलनाक्यांवर जमावे, असे आवाहनही समितीने केले आहे. शहरातील रस्ते विकास प्रकल्पाच्या कामांची किंमत ठरविणाऱ्या मूल्यांकन समितीने राज्य सरकारला अहवाल दिला असून, १५ दिवसांत त्यावर निर्णय घेतला जाणार होता. मात्र, १५ दिवसांची ही मुदत संपत आली तरी सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ‘आयआरबी’ कंपनीकडून पुन्हा टोल सुरू करण्याच्या हालचाली आहेत.
‘आयआरबी’ने टोलवसुली सुरू केल्यास आंदोलन
By admin | Updated: August 25, 2015 00:28 IST