शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसात शेतकऱ्यांचे ऊस बील भागवले नाही तर मालमत्ता जप्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 19:11 IST

थकीत रक्कमेवरील पंधरा टक्के प्रमाणे होणारे व्याज अंदाजे सात कोटी रुपये देणे बाकी आहे.या कारखान्याला एफ.आर.पी थकीत ठेवल्याने पुढील हंगामाचा गाळप परवाना देवु नये अशी साखर आयुक्ताकडे मागणी केली आहे.व जप्ती आदेशाची तहसिलदार यांनी तात्काळ अंमलबजावणी करावी.

ठळक मुद्देपन्हाळा तहसिलदार रमेश शेंडगे यांनी साखर कारखान्यास दिली नोटीसअन्यथा सोमवार दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ पासुन तहसिल कार्यलय पन्हाळा येथे सर्व शेतकऱ्यांना सोबत घेवुव बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार अशी नोटीस जय शिवराय संघटनेने दिली होती

पन्हाळा- :  तात्यासाहेब कोरे वारणा सह.साखर कारखान्यावरची जप्ती आदेशाची अंमलबाजवणी करण्यात यावी.व शेतकऱ्यांचे मागील गळीत हंगामातील व्याजासह पैसे वसुल करुन द्यावे अशी मागणी जय शिवराय किसान संघटनेच्या वतीने करण्यात आली यासाठी तहसीलदार कार्यालया समोर ठ्ठिय्या अंदोलन करण्यात आले पन्हाळा तहसिलदार रमेश शेंडगे यांनी साखर कारखान्यास पुढील दहा दिवसात शेतकऱ्यांचे ऊस बील भागवले नाही तर मालमत्ता जप्त करणार अशी नोटीस साखर कारखान्यास दिली. 

तात्यासाहेब कोरे वारणा सह. साखरकारखान्याने शेतकऱ्यांची एफ.आर.पी थकवली होती.म्हणुन मा.साखर आयुक्त पुणे यांनी जानेवारी २०१९ मध्ये आर.आर.सी कारवाई केली होती.त्या आदेशाची प्रत पन्हाळा तहसिलदार यांच्याकडे फेब्रुवारी महिन्यात आली आहे.त्या आदेशानुसार कारखान्याची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करुन थकीत एफ.आर.पी व थकीत एफ.आर.पी वरील पंधरा टक्के प्रमाणे होणारे व्याज शेतकऱ्यांच्या खात्यावर त्याचवेळी जमा करायला पाहीजे होती.जप्ती आदेशाची अंमलबाजवणी आपणाकडुन तीन महिन्यात पुर्ण करणे कायद्याने बंधनकारक असताना गेले दहा महिने होत आले तरी तहसिलदार यांच्याकडुन जप्तीची कारवाई केलेली नाही.आजही सदर साखर कारखाना एफ.आर.पी चे चौतीस कोटी पेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांची देणे आहे.तसेच थकीत रक्कमेवरील पंधरा टक्के प्रमाणे होणारे व्याज अंदाजे सात कोटी रुपये देणे बाकी आहे.या कारखान्याला एफ.आर.पी थकीत ठेवल्याने पुढील हंगामाचा गाळप परवाना देवु नये अशी साखर आयुक्ताकडे मागणी केली आहे.व जप्ती आदेशाची तहसिलदार यांनी तात्काळ अंमलबजावणी करावी.महापुराने शेतकरी आर्थिक संकटात असताना कारखान्याने शेतकऱ्यांनी थकीत बिले यापुर्वीच द्यायला हवी होती.शिवाय नुकताच दिपावलीचा सण आर्थिक कुचंबणेमुळे करता आला नाही.यावरुन त्यांची बिले देण्याची मानसिकता दिसत नाही.म्हणुन आपण कारखान्याची शिल्लक साखर व उपपदार्थ यांची जप्ती करून शेतकऱ्यांची बिले आठ दिवसांच्या आत देण्यात यावी.अन्यथा सोमवार दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ पासुन तहसिल कार्यलय पन्हाळा येथे सर्व शेतकऱ्यांना सोबत घेवुव बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार अशी नोटीस जय शिवराय संघटनेने दिली होती त्यावर चर्चा होवुन तोडगा काढत तहसीलदार रमेश शेंडगे यांनी साखर कारखान्यास पुढील दहा दिवसात तात्काळ शेतकऱ्यांचे पैसे देण्याची नोटीस लागु केली या नंतर आंदोलन स्थगीत केल्याचे संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी सांगीतले यावेळी जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने,जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील,पन्हाळा तालुकाध्यक्ष अतुल पाटील,किरण पाटील(आप्पा),उत्तम पाटील,राहुल पाटील दत्ता पाटील,स्वप्निल पाटील आदी उपस्थित होते.फोटो कँप्शन:-वारणा सह.साखर कारखान्यावरील जप्ती आदेशाची अंमलबाजावणी व्हावी या मागणीसाठी आंदोलन करताना जय शिवराय संघटनेचे कार्यकर्ते     

 

टॅग्स :TahasildarतहसीलदारSugar factoryसाखर कारखाने