शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसात शेतकऱ्यांचे ऊस बील भागवले नाही तर मालमत्ता जप्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 19:11 IST

थकीत रक्कमेवरील पंधरा टक्के प्रमाणे होणारे व्याज अंदाजे सात कोटी रुपये देणे बाकी आहे.या कारखान्याला एफ.आर.पी थकीत ठेवल्याने पुढील हंगामाचा गाळप परवाना देवु नये अशी साखर आयुक्ताकडे मागणी केली आहे.व जप्ती आदेशाची तहसिलदार यांनी तात्काळ अंमलबजावणी करावी.

ठळक मुद्देपन्हाळा तहसिलदार रमेश शेंडगे यांनी साखर कारखान्यास दिली नोटीसअन्यथा सोमवार दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ पासुन तहसिल कार्यलय पन्हाळा येथे सर्व शेतकऱ्यांना सोबत घेवुव बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार अशी नोटीस जय शिवराय संघटनेने दिली होती

पन्हाळा- :  तात्यासाहेब कोरे वारणा सह.साखर कारखान्यावरची जप्ती आदेशाची अंमलबाजवणी करण्यात यावी.व शेतकऱ्यांचे मागील गळीत हंगामातील व्याजासह पैसे वसुल करुन द्यावे अशी मागणी जय शिवराय किसान संघटनेच्या वतीने करण्यात आली यासाठी तहसीलदार कार्यालया समोर ठ्ठिय्या अंदोलन करण्यात आले पन्हाळा तहसिलदार रमेश शेंडगे यांनी साखर कारखान्यास पुढील दहा दिवसात शेतकऱ्यांचे ऊस बील भागवले नाही तर मालमत्ता जप्त करणार अशी नोटीस साखर कारखान्यास दिली. 

तात्यासाहेब कोरे वारणा सह. साखरकारखान्याने शेतकऱ्यांची एफ.आर.पी थकवली होती.म्हणुन मा.साखर आयुक्त पुणे यांनी जानेवारी २०१९ मध्ये आर.आर.सी कारवाई केली होती.त्या आदेशाची प्रत पन्हाळा तहसिलदार यांच्याकडे फेब्रुवारी महिन्यात आली आहे.त्या आदेशानुसार कारखान्याची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करुन थकीत एफ.आर.पी व थकीत एफ.आर.पी वरील पंधरा टक्के प्रमाणे होणारे व्याज शेतकऱ्यांच्या खात्यावर त्याचवेळी जमा करायला पाहीजे होती.जप्ती आदेशाची अंमलबाजवणी आपणाकडुन तीन महिन्यात पुर्ण करणे कायद्याने बंधनकारक असताना गेले दहा महिने होत आले तरी तहसिलदार यांच्याकडुन जप्तीची कारवाई केलेली नाही.आजही सदर साखर कारखाना एफ.आर.पी चे चौतीस कोटी पेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांची देणे आहे.तसेच थकीत रक्कमेवरील पंधरा टक्के प्रमाणे होणारे व्याज अंदाजे सात कोटी रुपये देणे बाकी आहे.या कारखान्याला एफ.आर.पी थकीत ठेवल्याने पुढील हंगामाचा गाळप परवाना देवु नये अशी साखर आयुक्ताकडे मागणी केली आहे.व जप्ती आदेशाची तहसिलदार यांनी तात्काळ अंमलबजावणी करावी.महापुराने शेतकरी आर्थिक संकटात असताना कारखान्याने शेतकऱ्यांनी थकीत बिले यापुर्वीच द्यायला हवी होती.शिवाय नुकताच दिपावलीचा सण आर्थिक कुचंबणेमुळे करता आला नाही.यावरुन त्यांची बिले देण्याची मानसिकता दिसत नाही.म्हणुन आपण कारखान्याची शिल्लक साखर व उपपदार्थ यांची जप्ती करून शेतकऱ्यांची बिले आठ दिवसांच्या आत देण्यात यावी.अन्यथा सोमवार दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ पासुन तहसिल कार्यलय पन्हाळा येथे सर्व शेतकऱ्यांना सोबत घेवुव बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार अशी नोटीस जय शिवराय संघटनेने दिली होती त्यावर चर्चा होवुन तोडगा काढत तहसीलदार रमेश शेंडगे यांनी साखर कारखान्यास पुढील दहा दिवसात तात्काळ शेतकऱ्यांचे पैसे देण्याची नोटीस लागु केली या नंतर आंदोलन स्थगीत केल्याचे संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी सांगीतले यावेळी जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने,जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील,पन्हाळा तालुकाध्यक्ष अतुल पाटील,किरण पाटील(आप्पा),उत्तम पाटील,राहुल पाटील दत्ता पाटील,स्वप्निल पाटील आदी उपस्थित होते.फोटो कँप्शन:-वारणा सह.साखर कारखान्यावरील जप्ती आदेशाची अंमलबाजावणी व्हावी या मागणीसाठी आंदोलन करताना जय शिवराय संघटनेचे कार्यकर्ते     

 

टॅग्स :TahasildarतहसीलदारSugar factoryसाखर कारखाने