शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

इचलकरंजीत व्यापाऱ्यांचे आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरातील व्यापाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार अखेर सोमवारी सकाळी आपली दुकाने उघडली. त्याला नगरपालिकेच्या पथकाने विरोध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहरातील व्यापाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार अखेर सोमवारी सकाळी आपली दुकाने उघडली. त्याला नगरपालिकेच्या पथकाने विरोध केल्याने व्यापारी व कर्मचारी यांच्यात वाद-विवाद घडला. त्यानंतरही दुकाने सुरूच ठेवण्यात आली होती. दरम्यान, कोल्हापुरात झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार दोन दिवस आंदोलन स्थगित करून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय झाला.

प्रशासनाने व्यापाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम, अटींचे पालन करत ठरावीक वेळेत दुकाने उघडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी अनेक वेळा केली.

मात्र, प्रशासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व्यापाऱ्यांना सवलत नाकारली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आपली दुकाने उघडली. यामुळे के. एल. मलाबादे चौकात व्यापारी व अधिकारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. व्यापाऱ्यांनी प्रशासनास गेल्या ८५ दिवसांपासून दुकाने बंद ठेवून सहकार्य केले आहे. आता व्यापाऱ्यांना आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. गाळा भाडे व वीज बिल अंगावर पडत आहे. त्यामुळे आता थांबणे शक्य नाही, असे म्हणत व्यापाऱ्यांनी सोमवारी दुकाने उघडली. यावेळी व्यापारी व प्रशासन यांच्यात काही काळ तणाव निर्माण झाला. दरम्यान, कोल्हापुरातील बैठकीत पोलीस अधीक्षकांनी दोन दिवसांत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी पुन्हा दुकाने बंद करत आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित केले.

चौकट

माझे दुकान माझी जबाबदारी

व्यापाऱ्यांनी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या धर्तीवर ‘माझी आस्थापना माझी जबाबदारी' असे म्हणत दुकान उघडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार दुकान उघडून काही व्यापारी प्लास्टिकचे फलक शर्टवर अडकवून फिरत होते. त्यावर विविध आवाहने व प्रश्न उपस्थित केले होते.

फोटो ओळी

२८०६२०२१-आयसीएच-०३

इचलकरंजीत के. एल. मलाबादे चौकात व्यापारी व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाली.

२८०६२०२१-आयसीएच-०४

इचलकरंजीत दुकाने सुरू झाल्याने मुख्य चौकातील नगरपालिका कॉम्प्लेक्स गजबजले होते.

२८०६२०२१-आयसीएच-०५

इचलकरंजी नागरिक मंचच्या कार्यकर्त्यांनी प्लास्टिकचा फलक परिधान करून व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत सूचना दिल्या.