शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

इचलकरंजी रेल्वे मार्गासाठी दडपशाही सर्वसामान्य वेठीला : आठशे एकर शेतीसह व्यवसायांवर घाला येणार;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 01:15 IST

दत्ता बिडकर ।हातकणंगले : हातकणंगले ते इचलकरंजी आठ किलोमीटर रेल्वे मार्गाला शेतकरी, कारखानदार आणि नागरी वस्तीमधून रेल्वे जाणार असल्याने बाधित मिळकतदारांचा विरोध आहे. रेल्वे प्रशासनाकडून मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक असे दोन सर्व्हे पूर्ण झाल्यानंतरच तिसरा सर्व्हे करण्याचा नियम आहे. मात्र थेट तिसरा सर्व्हे करून चार गावांतील ऊस शेतीसह सर्व व्यवसायावर ...

ठळक मुद्देघरेही जाणार असल्याने नागरिकांमध्ये संताप

दत्ता बिडकर ।हातकणंगले : हातकणंगले ते इचलकरंजी आठ किलोमीटर रेल्वे मार्गाला शेतकरी, कारखानदार आणि नागरी वस्तीमधून रेल्वे जाणार असल्याने बाधित मिळकतदारांचा विरोध आहे. रेल्वे प्रशासनाकडून मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक असे दोन सर्व्हे पूर्ण झाल्यानंतरच तिसरा सर्व्हे करण्याचा नियम आहे. मात्र थेट तिसरा सर्व्हे करून चार गावांतील ऊस शेतीसह सर्व व्यवसायावर घाला घालण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे रल्वे प्रशासनाविरोधात या परिसरामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांना प्रशासनाकडून पोलीस बळाचा वापर करून वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असल्यामुळे रेल्वे प्रशासन विरुद्ध शेतकरी असा उद्रेक अटळ बनला आहे.इचलकरंजी शहराला रेल्वेने जोडण्याचा काम ‘अच्छे दिनवाले’ सरकार करत आहे. मात्र, यामुळे हातकणंगले, कोरोची, कबनूर आणि चंदूर या चार गावांतील शेतकºयांच्या जवळपास सातशे ते आठशे एकर ऊसपट्ट्यातील शेतीवर गंडांतर येणार आहे. या रेल्वे मार्गामुळे शेतकºयाच्या शेतीचे तुकडे पडणार आहेत. ऊस वाहतुकीपासून ते शेतीच्या मशागतीसाठी शेतकºयांना दोन-दोन किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे.

हातकणंगले, कोरोची, कबनूर आणि चंदूर या चार गावांमध्ये शेतकºयांनी शेती बागायत करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून पंचगंगा नदीवरून चार-सहा किलोमीटरच्या वैयक्तिक पाणी उपसा योजना आणलेल्या आहेत. तर या चार गावांमध्ये सहकारी तत्त्वावर तर पंचगंगा साखर कारखान्यानेही पाणी उपसा योजना राबविल्या आहेत. या योजनांमुळेच आज या चार गावांमध्ये ऊस पिकाचे शंभर टक्के क्षेत्र निर्माण झाले आहे. शेतकºयांची आर्थिक घडी बसली असून या गावांची

आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक परिस्थिती ऊसशेतीवर अलंबूनआहे. मात्र या ऊसपट्ट्यावरच रेल्वेमार्गामुळे घाला घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत.हातकणंगले-इचलकरंंजी रेल्वे मार्गाला लक्ष्मी औद्योगीक वसहात, के.पी.टी औद्योगिक वसाहत, हातकणंगले आणि इचलकरंजी परिसरातील छोटे-मोठे उद्योग, कारखानदार यांनी विरोध केलेला आहे. औद्योगिक वसाहतीमधील काही छोट्या-मोठ्या उद्योगांवर या मार्गामुळे गंडातर येणार असल्यामुळे या उद्योग क्षेत्रानीही या रेल्वे मार्गाला विरोध केला आहे.थेट तिसरा सर्व्हेकोणत्याही रेल्वे मार्गाचा सर्व्हे करताना रेल्वे प्रशासन पहिल्यांदा या मार्गावरील मालवाहतूक किती आहे यांचा अभ्यास करते. त्यानंतर दुसरा सर्व्हे या मार्गावरील प्रवासी वाहतूक किती याचा अभ्यास करते आणि त्यानंतर मुख्य मार्गाचा सर्व्हे करून रेल्वे मंत्रालयाला अहवाल सादर करते. मात्र, हातकणंगले-इचलकरंजी मार्गाबाबत मात्र पहिले दोन सर्व्हे रद्द करून थेट तिसरा सर्व्हे राजकीय दबावाखाली करत असल्याचे यावरून स्पष्ट होते.चार गावांतील हजारो कुटुंबे होणार बेघरहातकणंगले-इचलकरंजी रेल्वे मार्ग हातकणंगले, कोरोची, कबनूर , चंदूर आणि इचलकरंजी उपनगरांतील नागरी वसाहतीमधून जाणार असल्यामुळे हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. या चार गावांतील ग्रामसभेने या रेल्वे मार्गाला विरोध करून तसे ठराव जिल्हा प्रशासनाला पाठवले आहेत. चार गावांतील मिळकतदारांनी औद्योगिक, निवासी आणि व्यापारी एनए करून आपली घरे आणि उद्योग सुरू केलेल्या सर्वसामान्यांवर कुºहाड कोसळणार आहे. या रेल्वे मार्गाचे अंतर आठ किलोमीटर आहे. यातील अंतर सात किलोमीटरचे अंतर चार गावांतील असून एक किलोमीटर अंतर उपनगर भागातून जाणार आहे. त्यामुळे हा रेल्वेमार्ग आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसताना रेल्वे प्रशासनाचा अट्टाहास का असा प्रश्न या गावांतील सर्वसामान्यांना पडला आहे.पोलीस बळाचा वापर करून शेतकºयांना वेठीस धरण्याच्या प्रकाराविरूद्ध तीव्र संताप८00 एकरशेतीवर घालाचार गावांचा विरोधरेल्वे प्रशासनाकडून माल, प्रवासी वाहतूक सर्व्हे न होता थेट तिसरा सर्व्हे

 

पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याच्या प्रकाराविरूद्ध तीव्र संताप ८00 एकर शेतीवर घाला चार गावांचा विरोध रेल्वे प्रशासनाकडून माल, प्रवासी वाहतूक सर्व्हे न होता थेट तिसरा सव्हे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे