शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी रेल्वे मार्गासाठी दडपशाही सर्वसामान्य वेठीला : आठशे एकर शेतीसह व्यवसायांवर घाला येणार;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 01:15 IST

दत्ता बिडकर ।हातकणंगले : हातकणंगले ते इचलकरंजी आठ किलोमीटर रेल्वे मार्गाला शेतकरी, कारखानदार आणि नागरी वस्तीमधून रेल्वे जाणार असल्याने बाधित मिळकतदारांचा विरोध आहे. रेल्वे प्रशासनाकडून मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक असे दोन सर्व्हे पूर्ण झाल्यानंतरच तिसरा सर्व्हे करण्याचा नियम आहे. मात्र थेट तिसरा सर्व्हे करून चार गावांतील ऊस शेतीसह सर्व व्यवसायावर ...

ठळक मुद्देघरेही जाणार असल्याने नागरिकांमध्ये संताप

दत्ता बिडकर ।हातकणंगले : हातकणंगले ते इचलकरंजी आठ किलोमीटर रेल्वे मार्गाला शेतकरी, कारखानदार आणि नागरी वस्तीमधून रेल्वे जाणार असल्याने बाधित मिळकतदारांचा विरोध आहे. रेल्वे प्रशासनाकडून मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक असे दोन सर्व्हे पूर्ण झाल्यानंतरच तिसरा सर्व्हे करण्याचा नियम आहे. मात्र थेट तिसरा सर्व्हे करून चार गावांतील ऊस शेतीसह सर्व व्यवसायावर घाला घालण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे रल्वे प्रशासनाविरोधात या परिसरामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांना प्रशासनाकडून पोलीस बळाचा वापर करून वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असल्यामुळे रेल्वे प्रशासन विरुद्ध शेतकरी असा उद्रेक अटळ बनला आहे.इचलकरंजी शहराला रेल्वेने जोडण्याचा काम ‘अच्छे दिनवाले’ सरकार करत आहे. मात्र, यामुळे हातकणंगले, कोरोची, कबनूर आणि चंदूर या चार गावांतील शेतकºयांच्या जवळपास सातशे ते आठशे एकर ऊसपट्ट्यातील शेतीवर गंडांतर येणार आहे. या रेल्वे मार्गामुळे शेतकºयाच्या शेतीचे तुकडे पडणार आहेत. ऊस वाहतुकीपासून ते शेतीच्या मशागतीसाठी शेतकºयांना दोन-दोन किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे.

हातकणंगले, कोरोची, कबनूर आणि चंदूर या चार गावांमध्ये शेतकºयांनी शेती बागायत करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून पंचगंगा नदीवरून चार-सहा किलोमीटरच्या वैयक्तिक पाणी उपसा योजना आणलेल्या आहेत. तर या चार गावांमध्ये सहकारी तत्त्वावर तर पंचगंगा साखर कारखान्यानेही पाणी उपसा योजना राबविल्या आहेत. या योजनांमुळेच आज या चार गावांमध्ये ऊस पिकाचे शंभर टक्के क्षेत्र निर्माण झाले आहे. शेतकºयांची आर्थिक घडी बसली असून या गावांची

आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक परिस्थिती ऊसशेतीवर अलंबूनआहे. मात्र या ऊसपट्ट्यावरच रेल्वेमार्गामुळे घाला घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत.हातकणंगले-इचलकरंंजी रेल्वे मार्गाला लक्ष्मी औद्योगीक वसहात, के.पी.टी औद्योगिक वसाहत, हातकणंगले आणि इचलकरंजी परिसरातील छोटे-मोठे उद्योग, कारखानदार यांनी विरोध केलेला आहे. औद्योगिक वसाहतीमधील काही छोट्या-मोठ्या उद्योगांवर या मार्गामुळे गंडातर येणार असल्यामुळे या उद्योग क्षेत्रानीही या रेल्वे मार्गाला विरोध केला आहे.थेट तिसरा सर्व्हेकोणत्याही रेल्वे मार्गाचा सर्व्हे करताना रेल्वे प्रशासन पहिल्यांदा या मार्गावरील मालवाहतूक किती आहे यांचा अभ्यास करते. त्यानंतर दुसरा सर्व्हे या मार्गावरील प्रवासी वाहतूक किती याचा अभ्यास करते आणि त्यानंतर मुख्य मार्गाचा सर्व्हे करून रेल्वे मंत्रालयाला अहवाल सादर करते. मात्र, हातकणंगले-इचलकरंजी मार्गाबाबत मात्र पहिले दोन सर्व्हे रद्द करून थेट तिसरा सर्व्हे राजकीय दबावाखाली करत असल्याचे यावरून स्पष्ट होते.चार गावांतील हजारो कुटुंबे होणार बेघरहातकणंगले-इचलकरंजी रेल्वे मार्ग हातकणंगले, कोरोची, कबनूर , चंदूर आणि इचलकरंजी उपनगरांतील नागरी वसाहतीमधून जाणार असल्यामुळे हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. या चार गावांतील ग्रामसभेने या रेल्वे मार्गाला विरोध करून तसे ठराव जिल्हा प्रशासनाला पाठवले आहेत. चार गावांतील मिळकतदारांनी औद्योगिक, निवासी आणि व्यापारी एनए करून आपली घरे आणि उद्योग सुरू केलेल्या सर्वसामान्यांवर कुºहाड कोसळणार आहे. या रेल्वे मार्गाचे अंतर आठ किलोमीटर आहे. यातील अंतर सात किलोमीटरचे अंतर चार गावांतील असून एक किलोमीटर अंतर उपनगर भागातून जाणार आहे. त्यामुळे हा रेल्वेमार्ग आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसताना रेल्वे प्रशासनाचा अट्टाहास का असा प्रश्न या गावांतील सर्वसामान्यांना पडला आहे.पोलीस बळाचा वापर करून शेतकºयांना वेठीस धरण्याच्या प्रकाराविरूद्ध तीव्र संताप८00 एकरशेतीवर घालाचार गावांचा विरोधरेल्वे प्रशासनाकडून माल, प्रवासी वाहतूक सर्व्हे न होता थेट तिसरा सर्व्हे

 

पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याच्या प्रकाराविरूद्ध तीव्र संताप ८00 एकर शेतीवर घाला चार गावांचा विरोध रेल्वे प्रशासनाकडून माल, प्रवासी वाहतूक सर्व्हे न होता थेट तिसरा सव्हे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे