शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
3
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
4
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
5
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
6
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
7
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
8
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
9
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
10
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
11
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
12
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
13
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
14
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
15
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
16
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
17
सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा
18
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
19
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
20
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार

इचलकरंजीला दोन दिवसांतून एकदा पाणी

By admin | Updated: March 12, 2015 00:09 IST

उन्हाळ्याबरोबर टंचाईचे चटके : नागरिक, महिला वर्गातून संताप, ‘नदी उशाला आणि कोरड घशाला’ या म्हणीप्रमाणे अवस्था

अतुल आंबी - इचलकरंजी -उन्हाळ्याची सुरुवात झाली आणि नागरिकांना पाणीटंचाईची झळ बसू लागली. ‘नदी उशाला आणि कोरड घशाला’ या म्हणीप्रमाणे इचलकरंजीवासीयांची अवस्था झाली आहे. वर्षभर एक दिवसआड येणारे पाणी आता दोन ते तीन दिवसआड मिळत आहे.विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वी २४ बाय ७ ची घोषणा केली असली तरी दिवसातून एकवेळ पाणी देणेसुद्धा नगरपालिकेला आजतागायत जमले नाही. त्यामुळे नेमके पाणी मुरते कुठे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.शहरात ५४ एमएलडी (दशलक्ष लिटर) पाणी शुद्धिकरण प्रकल्प सध्या कार्यान्वित असून, आणखीन एक ५४ एमएलडीचा शुद्धिकरण प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहराला पंचगंगा व कृष्णा या दोन नद्यांतून पाणीपुरवठा करणाऱ्या योजना आहेत. या योजनांमधून प्रकल्पाला ४० एमएलडी पाणीपुरवठा होतो. मात्र, नगरपालिकेचे योग्य नियोजन नसल्याने पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकत नाही. ४० एमएलडी पाण्यामधील शुद्ध केलेले ३० टक्के पाणी नळांना तोट्या नसल्याने वाया जाते. दहा टक्के कारखान्यांना वापर केला जातो. कारखान्यांमध्ये शुद्ध पाण्याची आवश्यकता नसताना हे पाणी वाया जाते.त्याचबरोबर शहरात नवी-जुनी अशी एकूण सुमारे एक हजार किलोमीटर पाईपलाईन करण्यात आली आहे. यामध्ये जुनी नलिका न काढता नवीन बसविल्याने दोन्ही नळ्यांमध्ये पाणी खेळल्याने नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. काही भागात ‘वशिला’ असलेल्या नागरिकांनी बेकायदेशीररित्या अर्धा-पाऊण इंची जोडणी घेतली आहे. याचाही पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम होतो. नळांना मीटर बसविणे. त्याचबरोबर बेकायदेशीर जोडण्या बंद करणे, यासह जुन्या पाईपलाईन थांबवून एकमार्गी नवीन पाईपलाईनमधून पाणी देणे यासारख्या उपाययोजना करून नगरपालिकेने योग्य पद्धतीने नियोजन केल्यास सध्या प्रकल्पात येणारे ४० एमएलडी पाणीसुद्धा दररोज नागरिकांना पुरवठा करता येणे शक्य आहे. हे नियोजन नसल्याने एक दिवसआड मिळणारे पाणी आता गेल्या वीस दिवसांपासून दोन-तीन दिवसांआड मिळत आहे. त्यामुळे नागरिक व महिला वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.