शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीला दोन दिवसांतून एकदा पाणी

By admin | Updated: March 12, 2015 00:09 IST

उन्हाळ्याबरोबर टंचाईचे चटके : नागरिक, महिला वर्गातून संताप, ‘नदी उशाला आणि कोरड घशाला’ या म्हणीप्रमाणे अवस्था

अतुल आंबी - इचलकरंजी -उन्हाळ्याची सुरुवात झाली आणि नागरिकांना पाणीटंचाईची झळ बसू लागली. ‘नदी उशाला आणि कोरड घशाला’ या म्हणीप्रमाणे इचलकरंजीवासीयांची अवस्था झाली आहे. वर्षभर एक दिवसआड येणारे पाणी आता दोन ते तीन दिवसआड मिळत आहे.विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वी २४ बाय ७ ची घोषणा केली असली तरी दिवसातून एकवेळ पाणी देणेसुद्धा नगरपालिकेला आजतागायत जमले नाही. त्यामुळे नेमके पाणी मुरते कुठे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.शहरात ५४ एमएलडी (दशलक्ष लिटर) पाणी शुद्धिकरण प्रकल्प सध्या कार्यान्वित असून, आणखीन एक ५४ एमएलडीचा शुद्धिकरण प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहराला पंचगंगा व कृष्णा या दोन नद्यांतून पाणीपुरवठा करणाऱ्या योजना आहेत. या योजनांमधून प्रकल्पाला ४० एमएलडी पाणीपुरवठा होतो. मात्र, नगरपालिकेचे योग्य नियोजन नसल्याने पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकत नाही. ४० एमएलडी पाण्यामधील शुद्ध केलेले ३० टक्के पाणी नळांना तोट्या नसल्याने वाया जाते. दहा टक्के कारखान्यांना वापर केला जातो. कारखान्यांमध्ये शुद्ध पाण्याची आवश्यकता नसताना हे पाणी वाया जाते.त्याचबरोबर शहरात नवी-जुनी अशी एकूण सुमारे एक हजार किलोमीटर पाईपलाईन करण्यात आली आहे. यामध्ये जुनी नलिका न काढता नवीन बसविल्याने दोन्ही नळ्यांमध्ये पाणी खेळल्याने नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. काही भागात ‘वशिला’ असलेल्या नागरिकांनी बेकायदेशीररित्या अर्धा-पाऊण इंची जोडणी घेतली आहे. याचाही पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम होतो. नळांना मीटर बसविणे. त्याचबरोबर बेकायदेशीर जोडण्या बंद करणे, यासह जुन्या पाईपलाईन थांबवून एकमार्गी नवीन पाईपलाईनमधून पाणी देणे यासारख्या उपाययोजना करून नगरपालिकेने योग्य पद्धतीने नियोजन केल्यास सध्या प्रकल्पात येणारे ४० एमएलडी पाणीसुद्धा दररोज नागरिकांना पुरवठा करता येणे शक्य आहे. हे नियोजन नसल्याने एक दिवसआड मिळणारे पाणी आता गेल्या वीस दिवसांपासून दोन-तीन दिवसांआड मिळत आहे. त्यामुळे नागरिक व महिला वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.