शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

इचलकरंजीत प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:26 IST

नगरपालिकेत संनियंत्रण समितीची बैठक लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने रुग्णांची संख्याही झपाट्याने ...

नगरपालिकेत संनियंत्रण समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. नागरिकांची कोरोना तपासणी केल्यानंतर एकूण तपासणीच्या ११ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. ही बाब खूपच गंभीर आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार प्रशासनाने समन्वयातून कडक भूमिका घ्यावी. लसीकरणासाठी जागरुकता निर्माण करावी. त्यासाठी आपण दहा रिक्षा देऊ, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले.

नगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी, पुढील दोन महिने नागरिकांना काळजी घेण्याची आवश्यकता आहे. शहरातील लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे. पहिल्या लाटेपासून शहरवासीयांनी बोध घेणे गरजेचे होते; पण तसे होताना दिसत नाही. त्यामुळे आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले. तसेच नगरपालिका व पोलीस प्रशासनाने नियमांचे पालन करण्यासाठी कडक अंमलबजावणी करावी.

आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी, इचलकरंजी शहर हे दाट लोकवस्तीचे शहर आहे. गेल्या ४५ दिवसांमध्ये २०५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत. सध्याची पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही पाच पट असून, शहराला धोक्याची घंटा आहे. त्यामुळे त्रिसूत्रीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. आयजीएमचे डॉ. एम. ए. महाडिक यांनी आयजीएममधील सद्यपरिस्थितीची माहिती दिली.

बैठकीत नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, नगरसेवक सागर चाळके, राहुल खंजिरे, सुनील पाटील आदींनी मत मांडले. यावेळी पालिकेचे सभापती, अधिकारी, तसेच गावभाग, शिवाजीनगर, शहापूर व शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी उपस्थित होते. प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील यांनी आभार मानले.

चौकटी

शहरातील सर्व यंत्रमाग सुरू राहणार

इचलकरंजी हे औद्योगिक शहर असून, येथील लोकांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन यंत्रमाग व्यवसाय आहे. शहराचे अर्थचक्र हे या व्यवसायावरच चालते. त्यामुळे यंत्रमाग व्यवसाय कोरोनाचे सर्व नियम पाळून सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी यंत्रमागधारकांनी कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणे. लस घेतली नसेल, तर निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगावे व एखादा पॉझिटिव्ह आढळल्यास त्याची जबाबदारी घेणे बंधनकारक राहणार आहे.

कडक कारवाई करणार

अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनीही नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच पुन्हा तपासणी नाके सुरू करणार असल्याचे सांगितले.

फोटो ओळी

०६०४२०२१-आयसीएच-०४

इचलकरंजी संनियंत्रण समितीच्या बैठकीत आमदार प्रकाश आवाडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, नगराध्यक्षा अलका स्वामी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बाबूराव महामुनी आदी उपस्थित होते.