शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
5
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
6
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
7
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
8
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
9
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
10
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
11
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
12
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
13
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
14
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
15
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
16
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
17
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
18
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
19
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
20
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न

इचलकरंजीत ३३ नगरसेवकांची नवी आघाडी

By admin | Updated: May 6, 2015 00:15 IST

आवाडे, हाळवणकर बाजूला : डाळ्या-चाळके-बागवान यांच्यासह राष्ट्रवादी अशा नवीन राजकारणाची जुळवणी

इचलकरंजी : नगरपालिकेमध्ये राष्ट्रीय कॉँग्रेस व भाजप यांना बाजूला ठेवून एक नवीन आघाडी उदयास आली आहे. या आघाडीने आता नगरपालिकेची सत्ता कायमपणे ताब्यात ठेवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पालिकेतील ५७ पैकी ३३ नगरसेवक या नव्या आघाडीकडे असल्याचा दावा करण्यात येत आहे.नवी आघाडी माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार सुरेश हाळवणकर यांच्यापासून दूर राहणार असल्याने त्याचा परिणाम स्थानिक राजकीय स्थित्यंतरावर होणार आहे. त्यामुळे या आघाडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.शहर विकास आघाडीची स्थापना करून आमदार सुरेश हाळवणकर यांनी पंधरा वर्षांपूर्वी पालिकेच्या राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर सन २००४ मध्ये शहर विकास आघाडीमार्फत निवडणूक लढविली. तर २००६ मध्ये नगरपालिकेमध्ये त्यावेळी असलेले कॉँग्रेसचे काही नगरसेवक फोडले आणि पालिकेमध्ये ‘शविआ’ची सत्ता स्थापित केली. त्यानंतर सन २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच भाजपच्या उमेदवारीवर हाळवणकर यांनी माजी मंत्री आवाडे यांना धक्का दिला आणि ते निवडून आले. मात्र, पुढील सन २०११ मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत ५७ पैकी कॉँग्रेसचे ३०, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे १० व ‘शविआ’चे १७ नगरसेवक निवडून आले. आवाडे यांनी कॉँग्रेस व राष्ट्रवादी अशी आघाडी करून पालिकेची सत्ता ताब्यात ठेवली.जून २०१४ मध्ये शुभांगी बिरंजे या नगराध्यक्षा झाल्या. पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे त्यांचा कालावधी डिसेंबरमध्ये संपत असला तरी त्यांनी त्यास नकार दिला आणि बंड केले. या बंडाला शहर विकास आघाडीने पाठिंबा दिला. तेव्हापासून ‘शविआ’चे प्रमुख सागर चाळके यांचा नगरपालिकेच्या राजकारणात शिरकाव झाला, तर कॉँग्रेसमधील सतीश डाळ्या यांचाही पालिकेत पुनर्प्रवेश झाला आणि नगराध्यक्षांच्या बंडापासूनच नवीन आघाडीची जुळवाजुळव सुरू झाली.नवीन आघाडीचे नेतृत्व चाळके, डाळ्या व बादशहा बागवान हे करीत आहेत. त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील जांभळे व कारंडे या दोन्ही गटांनाही आघाडीमध्ये बरोबर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या डाळ्या गटाकडे कॉँग्रेसमधील १४, तर चाळके यांच्याकडे ‘शविआ’मधील आठ नगरसेवक आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक समाविष्ट झाल्यास ही बेरीज ३३ होते. त्यामुळे नगरपालिकेचे राजकारण ताब्यात घेण्याच्या हालचाली त्यांनी सुरू केल्या आहेत. (प्रतिनिधी)नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबर २०१६ मध्ये होणार असून, चाळके-डाळ्या-बागवान यांच्या आघाडीकडून ही निवडणूक लढविण्यात येणार आहे. या आघाडीमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसचासुद्धा समावेश आहे. परिणामी, सन २०१६ मधील नगरपालिका निवडणूक राष्ट्रीय कॉँग्रेस, भाजप व नवीन आघाडी अशी तिरंगी होण्याचे संकेत आहेत.