शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
3
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
4
कतरिना कैफही आहे गरोदर? ओव्हरकोट ड्रेसमध्ये दिसला बेबीबंप; नवऱ्यासोबत लंडनमध्ये फेरफटका
5
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
6
'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
8
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
9
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
10
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
11
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
12
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
13
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 
14
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
15
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
16
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
17
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
18
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
19
आईसोबत सतत फिरते मग शाळेत जाते कधी? ऐश्वर्याने दिलं ट्रोलर्सला उत्तर
20
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला

इचलकरंजीत खड्ड्यांची शर्यत संपता संपेना

By admin | Published: March 16, 2017 12:24 AM

२0 कोटी खर्चूनही खड्डे कायम : ‘खड्डा दाखवा बक्षिस मिळवा’ म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांनी फेरफटका मारावा

  अतुल आंबी ल्ल इचलकरंजी ‘रस्त्यावर खड्डा दाखवा आणि बक्षिस मिळवा’ म्हणणाऱ्या राज्यातील क्रमांक २ चे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी इचलकरंजी शहरातील मुख्य मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात फेरफटका मारावा, अशी मिश्कीलपणाने शहरातील नागरिकांकडून टीका केली जात आहे. २0 कोटी रुपयांच्या विशेष रस्ता अनुदानातून शहरातील रस्ते करणार असल्याची घोषणा आमदार सुरेश हाळवणकर यानी केली होती. मात्र, हे मुख्य रस्ते पूर्ण झाले नसून, बरेच रस्ते प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे शहरवासीयांची खड्ड्यांच्या अडथळ्यांची शर्यत अद्याप संपलेली नाही. इचलकरंजी शहरासाठी अंतर्गत भुयारी गटार योजना मंजूर झाली आणि नगरपालिकेने संपूर्ण शहरातील रस्ते खुदाई करून पाईपलाईनचे काम केले. या योजनेतील कामात कुचराई झाल्याने रस्त्यांचाही बोजवारा उडाला. त्यानंतर नगरपालिकेने टेंडर काढून हे सर्व रस्ते केले. मात्र, टक्केवारीच्या कामकाजामुळे रस्त्यांचा दर्जा अतिशय निकृष्ट बनला. पहिल्या पावसातच रस्ते अक्षरश: पाण्याबरोबर धुऊन गेले आणि पहिल्यापेक्षा रस्त्यांची अवस्था बिकट बनली. अशा बिकट रस्त्यावरून कसरत करीत नागरिकांना मार्गक्रमण करावे लागत होते. त्यातून अनेक लहान-मोठे अपघात घडले. शहरातील कित्येक नागरिकांनी जीव गमावला. शहरातील विविध सामाजिक संघटनांसह नागरिकांनी रस्त्यासाठी नगरपालिकेवर मोर्चे काढले, आंदोलने केली. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची जबाबदारी नगरपालिकेवर घालून मुख्याधिकारी व नगराध्यक्षांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. रस्त्यांच्या कामाचा भूलभुलय्या शहरातील रस्त्यांची परिस्थिती पाहता छत्रपती शिवाजी पुतळा ते ईदगाह मैदान, कोल्हापूर रोडवरील हॉटेल चेतना पासून कबनूर नाका, संभाजी चौक ते मरगुबाई मंदिर, छत्रपती शिवाजी पुतळा ते राजवाडा मार्गे मरगुबाई मंदिर, राजवाडा ते सांगली नाका, डेक्कन चौक ते पंचगंगा पेट्रोल पंप, आंबेडकर पुतळा ते रिंग रोड या मार्गावरील रस्ते झाले नाहीत. हे परिसर वगळता याच मार्गावरील पुढील रस्ता झाला आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामाचा भूलभुलय्या झाल्याचे बोलले जात आहे. वारंवारच्या आंदोलनानंतर संबंधित मक्तेदारांच्या कामाची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते आणि वातावरण शांत झाल्यानंतर हे प्रकरणही हळूहळू शांत करण्यात आले. या रस्त्याच्या कामातील साखळी पद्धतीमुळे दोषी कोणाला ठरवायचे, असा प्रश्न पडल्यानेच हे चौकशी प्रकरण शांत केल्याचे उघडपणाने बोलले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार सुरेश हाळवणकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रयत्न करून शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी २0 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. नगरपालिकेच्या कामकाजाची पार्श्वभूमी पाहता त्यानी ही सर्व कामे सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत करण्याचा निर्णय घेतला. त्यावरही जोरदार टीकाटिप्पणी झाली. सरते शेवटी शहरातील रस्त्यांचे कामही सुरू झाले. शहरातील विविध भागांत वेगवेगळ्या मक्तेदारांमार्फत धुमधडाक्यात रस्ते करण्यास सुरूवात झाली. मात्र, सापशिडीप्रमाणे अधले-मधले रस्ते होत असल्याने नेमका कुठला रस्ता कुठेपर्यंत होणार आहे? याबाबत कोणालाच काही समजेना. आता जवळपास सर्वच रस्त्यांचे काम संपले आहे. मात्र, प्रमुख मार्गांवरील अनेक खड्डे तसेच आहेत. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रस्त्यावर खड्डा दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी घोषणा केली होती. याला दुसरे वर्ष उलटले तरी इचलकरंजीतील खड्डे अद्याप तसेच आहेत. त्यामुळे मंत्री पाटील यांनी मुख्यमंत्र्यांप्रमाणे आपल्या निधीतील काही निधी विशेष बाब म्हणून इचलकरंजीला द्यावा आणि राहिलेले रस्ते पूर्ण करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.