शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बारावीच्या लेखी परीक्षेवर बहिष्कार टाकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 17:06 IST

विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने बुधवारी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मूक मोर्चा काढला. मागण्यांच्या पूर्ततेबाबत लवकर सकारात्मक कार्यवाही शासनाकडून व्हावी, अन्यथा बारावीच्या लेखी परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा संघाच्यावतीने सचिव प्रा. अविनाश तळेकर यांनी यावेळी दिला.

ठळक मुद्देबारावीच्या लेखी परीक्षेवर बहिष्कार टाकणारकनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचा इशाराशिक्षण उपसंचालक कार्यालयावर मूक मोर्चा

कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने बुधवारी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मूक मोर्चा काढला. मागण्यांच्या पूर्ततेबाबत लवकर सकारात्मक कार्यवाही शासनाकडून व्हावी, अन्यथा बारावीच्या लेखी परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा संघाच्यावतीने सचिव प्रा. अविनाश तळेकर यांनी यावेळी दिला.महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आदेशानुसार विभागीय संघाने आंदोलनाच्या तिसऱ्या टप्पा म्हणून मूक मोर्चा काढला. टाऊन हॉलपासून दुपारी तीन वाजता मोर्चा सुरू झाला. तोंडाला काळ्या फिती बांधून, प्रलंबित मागण्या आणि विभागीय संघाच्या नावाचे फलक घेऊन मोर्चामध्ये शिक्षक सहभागी झाले.

दसरा चौक, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, शिवाजी चौक, महानगरपालिका चौक मार्गे शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर हा मोर्चा आला. याठिकाणी झालेल्या निषेध सभेत प्रा. तळेकर यांनी मार्गदर्शन केले. शासनाशी वेळोवेळी चर्चा होवून झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. दप्तर दिरंगाईमुळे शिक्षकांच्या मान्यता, त्यांच्या शालार्थ मान्यतेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. त्यामुळे हे आंदोलन शासनाने लादलेले आहे. महासंघाकडून आंदोलनाचे तीन टप्पे पूर्ण झाले, तरी शासन अजून जागे झालेले नाही. येत्या दोन दिवसांत महासंघाची बैठक होवून आंदोलनाचा पुढील टप्पा जाहीर होईल, असे प्रा. तळेकर यांनी सांगितले.

यानंतर शिक्षण निरीक्षक डी. एस. पवार यांना आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले. आंदोलनात संघाचे विभागीय अध्यक्ष पी. एन. औताडे, उपाध्यक्ष एन. डी. बिरनाळे, एन. बी. चव्हाण, के. जी. जाधव, बी. बी. पाटील, ए. बी. उरूणकर,ए. डी. चौगुले, शिवाजीराव होडगे, टी. के. सरगर, विजय मेटकरी, अजित डवरी, कांचन पाटील, नेत्रा पवार, आर. एस. किरूळकर, अशोक पाटील यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिक्षक सहभागी झाले.

 

टॅग्स :Morchaमोर्चाTeacherशिक्षकkolhapurकोल्हापूर