शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

मी कॉलर उडवतो... उडवत राहणार; वयाचा विचार करून गप्प बसतोय : उदयनराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 23:01 IST

‘मी कॉलर उडवतो, यापुढेही उडवत राहणार. तुमच्या वयाचा विचार करून गप्प बसतोय. माझ्यासारखा कोणी वाईट नाही. माझ्या कॉलरवर बोलायचे असेल तर समोर येऊन बोला,’ असा सज्जड इशारा खासदार

सातारा: ‘मी कॉलर उडवतो, यापुढेही उडवत राहणार. तुमच्या वयाचा विचार करून गप्प बसतोय. माझ्यासारखा कोणी वाईट नाही. माझ्या कॉलरवर बोलायचे असेल तर समोर येऊन बोला,’ असा सज्जड इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव न घेता दिला.

खासदार उदयनराजे म्हणाले, ‘मैने एक बार कमिटमेंट कर दी, तो मैं खुद की भी नही सूनता,’ असाही टोला लगावला. ‘सातारा राजधानी महोत्सव या कार्यक्रमातून जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मुलांना वाव मिळाला पाहिजे. त्यांचा उत्कर्ष झाला पाहिजे, हा या मागचा उद्देश आहे. याला कोणी राजकीय स्वरूप देऊ नये. अजूनही असा कोणीही प्रयत्न केला नाही. मुलाच्या भवितव्यासाठी काम करत राहणार आहे. मी केलेली नौटंकी दिसते. लावणी म्हणतो, या पुढेही करतच राहणार. मी नेहमीच खरे बोलतो, खोटे बोलत नाही. माझ्या वागण्यात बदल होणार नाही. मी तत्त्व सोडून बोलत नाही. माझ्या स्वभावात बदल करू शकत नाही.’

दरम्यान, छत्रपती घराण्याचा मानाचा शिवसन्मान पुरस्कार अभिनेते अमिताभ बच्चन यांना तर श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे जीवनगौरव पुरस्कार लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांना जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण सोहळा दि. २७ रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

सातारा गौरव पुरस्कार यांना देण्यात येणार : साहित्यिक व पत्रकारिता- रफिक मुल्ला, कला व सांस्कृतिक- श्वेता शिंदे, क्रीडा- ललिता बाबर, पैलवान नंदकुमार विभूते, शिक्षण- पुरुषोत्तम शेठ, उद्योजकता- अजित मुथा, आदर्श सेवा- गुरुवर्य बबनराव उथळे, छोटे उद्योजकता- राजेंद्र घुले, सामाजिक कार्य- माहेश्वरी ट्रस्ट, विशेष कर्तृत्व- मेजर गौरव जाधव, कृषी-संतोष सूर्यवंशी, आदर्शग्राम- हिवरे (ता. कोरेगाव), पर्यावरण मित्र- विजय निंबाळकर.या पत्रकार परिषदेला पंकज चव्हाण, माजी नगराध्यक्षा रंजना रावत, गीतांजली कदम, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर उपस्थित होते.शिवेंद्रसिंहराजेंना तरी ‘रयत’वर घ्यायला हवे होतेदरम्यान, रयत शिक्षण संस्थेच्या सदस्यपदी निवड करताना माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी यांच्या निवडी केल्या. मात्र, आमच्या राजघराण्यावरच अन्याय का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उदयनराजेंनी रयत शिक्षण संस्थेच्या सदस्यपदी निवडीवरून उघडपणे नाराजी व्यक्त केली. राजघराण्यातील मला नको; पण आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना तरी संस्थेवर घ्यायला हवे होते; पण तसे झाले नाही. ज्यांचे योगदान नाही, अशा लोकांची निवड करून राजघराण्याला डावलले गेले, अशी नाराजी व्यक्त केली. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण