शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

"शक्तिपीठ महामार्गासाठी मी कोल्हापूरकर जनतेसाेबतच", खासदार धैर्यशील माने यांनी केलं स्पष्ट

By नितीन काळेल | Updated: February 24, 2025 20:14 IST

Dhairyasheel Mane: प्रत्येकाला पक्ष वाढवायचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्वतंत्र की एकत्र लढायची याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई घेतील, अशी माहिती शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी दिली.

- नितीन काळेल  सातारा -  प्रत्येकाला पक्ष वाढवायचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्वतंत्र की एकत्र लढायची याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई घेतील, अशी माहिती शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी दिली. तसेच खासदार संजय राऊत दिल्लीत काय दिवे लावतात माहीत आहे, असा टोला लगावतानाच शक्तीपीठ महामार्ग प्रश्नासाठी मी कोल्हापूरकर जनतेसाेबतच राहणार, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी दिली.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार माने बोलत होते. यावेळी शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, सातारा शहरप्रमुख नीलेश मोरे, महिला जिल्हाप्रमुख शारदा जाधव यांच्यासह शिंदेसेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी खासदार माने यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरेही दिली.

खासदार धैर्यशील माने म्हणाले, शिंदेसेनेची सभासद नोंदणी अभियान सुरू झाले आहे. माझ्याकडे सातारा जिल्ह्याचीही जबाबदारी आहे. शिंदे सेना ही जिल्ह्यातील गावांत, घराघरांत आणि सामान्य माणसांपर्यंत पोहोचायला हवी यासाठीच हे अभियान आहे. यातून पक्षाला बळकटी देण्यात येईल. सातारा जिल्ह्यात पक्षाचं केडर खूप चांगलं आहे. आता पक्षबांधणीचा कार्यक्रम सुरू आहे.

दरम्यान, पत्रकार परिषदेतच सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार केल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर खासदार माने यांनी प्रत्येक पक्षाला आपले मत जाहीर करण्याचा अधिकारी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक शिंदेसेनेत कशी लढवायची ? याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई घेतील. तरीही शिवसेना वादळात दिवा लावणारा पक्ष आहे. त्यामुळे निवडणुकीतील विजयात शिंदेसेनाच पुढे असेल, असे ठामपणे सांगितले. तर मुख्यमंत्रीपदी असताना एकनाथ शिंदे यांनी ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली. याचा फायदा भाजपकडून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे ?, शिंदेसेना आणि भाजपात वितुष्ट आले आहे का ? असा प्रश्नही पत्रकारांनी केला. यावर खासदार माने यांनी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हे प्रमुख चेहरा होते. सर्वच योजना शिंदे यांच्या काळातच आल्या. राज्यात त्रिवेणी संगम आहे. त्यामुळे आमचं सरकार अभेद्य आहे. सांघिक प्रयत्नाने निवडणुकीत यश मिळाले. शिंदेसेना आणि भाजपमध्ये कोणतेही वितुष्ट आलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत राहिलेला पक्षही संपवणार उध्दवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रश्नावर खासदार माने यांनी राऊत हे आकाशातून उतरलेले विमान आहे. त्यांना दररोज साक्षात्कार होतो. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल ते बोलले. मोठ्या पदावरील व्यक्तींबाबत चुकीचे बाेलू नये. ते दिल्लीत काय दिवे लावतात माहीत आहे. आता ते राहिलेली उध्दवसेनाही संपवायाला निघालेत, असा टोला लगावला.शक्तीपीठाबाबत समन्वयाने मार्ग काढावाराज्यातील शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून तर याला अधिकच विरोध आहे, यावर कोल्हापूरकर म्हणून आपली भूमिका काय ? असा प्रश्न पत्रकारांनी केला. या प्रश्नाला खासदार माने यांनी या शक्तीपीठ महामार्गात अल्पभूधारक शेतकरी अधिक येतात. या महामार्गाबद्दल दोन मतप्रवाह आहेत. राज्य शासनाने याबाबत समन्वयातून मार्ग काढावा. तसेच कोल्हापूरमधील शेतकऱ्यांना हा मार्ग नको असेल तर मी त्यांच्याबरोबरच राहणार, असे उत्तर दिले.

टॅग्स :dhairyasheel maneधैर्यशील मानेkolhapurकोल्हापूर