शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

"शक्तिपीठ महामार्गासाठी मी कोल्हापूरकर जनतेसाेबतच", खासदार धैर्यशील माने यांनी केलं स्पष्ट

By नितीन काळेल | Updated: February 24, 2025 20:14 IST

Dhairyasheel Mane: प्रत्येकाला पक्ष वाढवायचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्वतंत्र की एकत्र लढायची याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई घेतील, अशी माहिती शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी दिली.

- नितीन काळेल  सातारा -  प्रत्येकाला पक्ष वाढवायचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्वतंत्र की एकत्र लढायची याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई घेतील, अशी माहिती शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी दिली. तसेच खासदार संजय राऊत दिल्लीत काय दिवे लावतात माहीत आहे, असा टोला लगावतानाच शक्तीपीठ महामार्ग प्रश्नासाठी मी कोल्हापूरकर जनतेसाेबतच राहणार, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी दिली.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार माने बोलत होते. यावेळी शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, सातारा शहरप्रमुख नीलेश मोरे, महिला जिल्हाप्रमुख शारदा जाधव यांच्यासह शिंदेसेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी खासदार माने यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरेही दिली.

खासदार धैर्यशील माने म्हणाले, शिंदेसेनेची सभासद नोंदणी अभियान सुरू झाले आहे. माझ्याकडे सातारा जिल्ह्याचीही जबाबदारी आहे. शिंदे सेना ही जिल्ह्यातील गावांत, घराघरांत आणि सामान्य माणसांपर्यंत पोहोचायला हवी यासाठीच हे अभियान आहे. यातून पक्षाला बळकटी देण्यात येईल. सातारा जिल्ह्यात पक्षाचं केडर खूप चांगलं आहे. आता पक्षबांधणीचा कार्यक्रम सुरू आहे.

दरम्यान, पत्रकार परिषदेतच सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार केल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर खासदार माने यांनी प्रत्येक पक्षाला आपले मत जाहीर करण्याचा अधिकारी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक शिंदेसेनेत कशी लढवायची ? याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई घेतील. तरीही शिवसेना वादळात दिवा लावणारा पक्ष आहे. त्यामुळे निवडणुकीतील विजयात शिंदेसेनाच पुढे असेल, असे ठामपणे सांगितले. तर मुख्यमंत्रीपदी असताना एकनाथ शिंदे यांनी ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली. याचा फायदा भाजपकडून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे ?, शिंदेसेना आणि भाजपात वितुष्ट आले आहे का ? असा प्रश्नही पत्रकारांनी केला. यावर खासदार माने यांनी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हे प्रमुख चेहरा होते. सर्वच योजना शिंदे यांच्या काळातच आल्या. राज्यात त्रिवेणी संगम आहे. त्यामुळे आमचं सरकार अभेद्य आहे. सांघिक प्रयत्नाने निवडणुकीत यश मिळाले. शिंदेसेना आणि भाजपमध्ये कोणतेही वितुष्ट आलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत राहिलेला पक्षही संपवणार उध्दवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रश्नावर खासदार माने यांनी राऊत हे आकाशातून उतरलेले विमान आहे. त्यांना दररोज साक्षात्कार होतो. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल ते बोलले. मोठ्या पदावरील व्यक्तींबाबत चुकीचे बाेलू नये. ते दिल्लीत काय दिवे लावतात माहीत आहे. आता ते राहिलेली उध्दवसेनाही संपवायाला निघालेत, असा टोला लगावला.शक्तीपीठाबाबत समन्वयाने मार्ग काढावाराज्यातील शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून तर याला अधिकच विरोध आहे, यावर कोल्हापूरकर म्हणून आपली भूमिका काय ? असा प्रश्न पत्रकारांनी केला. या प्रश्नाला खासदार माने यांनी या शक्तीपीठ महामार्गात अल्पभूधारक शेतकरी अधिक येतात. या महामार्गाबद्दल दोन मतप्रवाह आहेत. राज्य शासनाने याबाबत समन्वयातून मार्ग काढावा. तसेच कोल्हापूरमधील शेतकऱ्यांना हा मार्ग नको असेल तर मी त्यांच्याबरोबरच राहणार, असे उत्तर दिले.

टॅग्स :dhairyasheel maneधैर्यशील मानेkolhapurकोल्हापूर