शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

कोरोनाच्या भीतीने लग्न उरकण्याची घाई, त्यात मुहूर्त कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 12:03 IST

पुन्हा निर्बंध आले तर २५ माणसांत लग्न उरकावे लागेल. त्यापेक्षा जरा घाई करून जानेवारीत वधू-वरांचे हात पिवळे करण्याकडे लोकांचा कल आहे.

कोल्हापूर : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग वाढला तर विवाह सोहळ्याला ब्रेक लागू नये म्हणून या महिन्यातच लग्न उरकण्याची घाई सुरू झाली आहे. केंद्र सरकारने वेळ पडली तर रात्रीची संचारबंदी करा, असे सांगितले आहे. या व्हेरिएंटचा धोका कमी असला तरी संसर्गाचे प्रमाण खूप मोठे आहे, त्यामुळे पुन्हा नागरिकांवर निर्बंध येण्याची शक्यता असल्याने या १५ दिवसांतील लवकरात लवकर असेल ते मुहूर्त काढले जात आहेत.

गेली पावणे दोन वर्षे सगळ्या जगाला वेठीला धरलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत परदेशांमध्ये कोरोना ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे आता भारतातदेखील ही लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दिवाळीपासून शासनाने जवळपास सगळे निर्बंध उठविले आहेत; पण आता पुन्हा संसर्गाचा धोका वाढल्याने राज्य सरकारने रात्रीची संचारबंदी लागू करण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे पुन्हा कडक निर्बंधांची शक्यता आहे.

जानेवारीत मुहूर्त कमी

जानेवारी महिन्यात पहिल्या १५ दिवसांत एकही विवाह मुहूर्त नाही. त्यानंतर २०, २२, २३, २७, २९ हे पाचच दिवस मुहूर्त आहेत. फेब्रुवारी महिन्यात सहा दिवस तर मार्चमध्ये सर्वांत कमी फक्त चार मुहूर्त आहे. एप्रिलमध्ये आणि त्यापेक्षा मे महिन्यात सर्वाधिक मुहूर्त आहेत.

२५ माणसांत लग्न नको...

कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून गेल्या पावणे दोन वर्षांतील दीड वर्ष लोकांना २५ ते ५० माणसांमध्ये विवाह सोहळे अक्षरश: उरकावे लागले आहेत. करवलींची धम्माल नाही, वरातीत नाचणं नाही, मेहंदीपण घरातल्या घरात, संगीताचा कार्यक्रम झाला नाही. लग्नाला मोजकेच नातेवाईक, मित्र परिवाराला निमंत्रणच नाही. सगळ्यांना एकदम बोलावता येत नाही म्हणून प्रत्येक सोहळ्याला वेगवेगळ्या नातेवाइकांना बोलवायचे अशी तडजोड करावी लागली. आता दिवाळीनंतर कुठे धूमधडाक्यात विवाह सोहळे होत आहेत. पुन्हा निर्बंध आले तर २५ माणसांत उरकावे लागेल. त्यापेक्षा जरा घाई करून जानेवारीत वधू-वरांचे हात पिवळे करण्याकडे लोकांचा कल आहे.

जानेवारीत विवाह मुहूर्त कमी आहेत, त्या दिवशी एकाच विवाह सोहळ्यासाठी कार्यालय देता येते. किमान दीड दिवस कार्यालय बुक असते. त्यामुळे पहिल्यांदा आलेल्या पार्टीकडून कार्यालय बुक झाले की दुसऱ्यांना देता येत नाही. कोरोनामुळे लोकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. त्यामुळे अजूनही म्हणावे तसे बुकिंग होत नाही. -सुशील जवळगेकर, मंगल कार्यालय चालक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न