शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
4
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
5
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
6
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
7
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
8
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
9
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
10
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
11
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
12
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
14
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
15
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
16
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
17
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
18
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
19
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
20
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...

जनतेच्या सुखदु:खात सहभागी होता येत नसल्याची हुरहुर-- हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:04 IST

जनतेच्या प्रत्येक सुखदु:खात धावून जाणारा आपण एक कार्यकर्ता आहे; पण अशा परिस्थितीमुळे गाठीभेटी घेता येत नसल्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे. 

कोल्हापूर : राज्यातील सत्तापेचामुळे विधानसभेचा निकाल लागून महिना उलटला तरी जनतेच्या आभाराला जाऊ शकलो नाही, त्याचबरोबर जनतेच्या सुखदु:खात सहभागी होता येत नसल्याची हुरहुर असल्याची माहिती आमदारहसन मुश्रीफ यांनी पत्रकातून दिली. 

विधानसभेचे २१ आॅक्टोबरला मतदान झाले आणि २४ आॅक्टोबरला मतमोजणी झाली. पहिल्या आठवड्यात कागल शहर, गडहिंग्लज शहर, कडगाव-कौलगे व उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघात आभार दौरा पूर्ण केला; पण त्यानंतर राज्यात अभूतपूर्व सत्ता पेचामुळे मुंबईत राहावे लागले आहे; त्यामुळे इतर गावांना भेटी देता आल्या नाहीत. त्याचबरोबर या काळात पवार कुटुंब व राष्टÑवादीतच मतभेद झाले आणि घटनेचा आघात आपल्यावर झाला.

अशा परिस्थितीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. या राजकीय घडामोडींमुळे मुंबईतच राहावे लागत असून, रोज सकाळी सहापासून हजारोंच्या संख्येने येणारी जनता व कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहणारा व जनतेच्या प्रत्येक सुखदु:खात धावून जाणारा आपण एक कार्यकर्ता आहे; पण अशा परिस्थितीमुळे गाठीभेटी घेता येत नसल्याचे आमदारहसन मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.  

 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफMLAआमदारkolhapurकोल्हापूर