शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

हुपरीच्या तलावाचे तरूणांच्या श्रमदानातून रूप पालटणार

By admin | Updated: March 16, 2017 00:58 IST

रंकाळ्याच्या धर्तीवर सुशोभीकरणाचे नियोजन : काढलेल्या ६00 ट्रॉल्या गाळाचे परिसरातील शेतकऱ्यांना मोफत वितरण

हुपरी : रौप्यनगरी हुपरी (ता. हातकणंगले) शहराच्या मध्यभागी असलेला व शहराचे वैभव म्हणून नावारूपास आलेल्या सूर्यतलावातून (गाढव तळे ) सुमारे ६00 ट्रॉल्या गाळ काढण्यात आला. हा गाळ परिसरातील शेतकऱ्यांना मोफत देण्यात आला. तलावाचे कोल्हापुरातील रंकाळ्याच्या धर्तीवर सुशोभीकरण करण्याचे नियोजन आखण्यात आले असून, यासाठी काही तरुणांकडून विशेष परिश्रम घेण्यात येत आहेत.घाण, दलदल व दुर्गंधीच्या साम्राज्यात हा तलाव सापडला असून, नामशेष होण्याच्या मार्गावर होता. ही परिस्थिती वेळीच लक्षात घेऊन गावातील काही होतकरू तरुणांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबवून हा सूर्यतलाव स्वच्छ केला आहे. शहराचा कारभार हाकणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे रौप्यनगरीचे लयास जात असलेले वैभव जोपासण्याच्या तरुणांच्या या उपक्रमास समाजातील सर्वच स्तरांतून मोठा पाठिंबा मिळाला. तरुणांच्या या उपक्रमाचे समाजाकडून कौतुकही करण्यात आले. ‘गाव करील ते राव काय करील’ या म्हणीची प्रचिती तरुणांनी सुरू केलेल्या या श्रमदानातून शहरवासीयांना निश्चितपणे झाली.संपूर्ण देशात रौप्यनगरी असा नावलौकिक असलेल्या हुपरी शहराच्या अगदी मध्यावर हा सूर्यतलाव आहे. हा तलाव बाराही महिने पूर्ण भरल्याचे चित्र नेहमीच पाहावयास मिळते. परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती (पुतळा), लोकसेवक आबा नाईक विद्यालय, व्यवसाय उद्योगधंद्याने फुललेले छत्रपती शिवाजी मार्केट, मुख्य बसस्थानक, पोलिस ठाणे, तसेच अनेक नामांकित चांदी व्यावसायिकांचे वास्तव्य असलेली यशवंतनगर वसाहत, अशा चोहोबाजूंनी बहरलेल्या परिसरात हा सूर्यतलाव आहे. पूर्वी या तलावाला ‘गाढव तलाव’ म्हणून ओळखण्यात येत होते. हुपरीच्या चांदी उद्योगाचे उर्ध्वयू हुपरीभूषण य. रा. तथा बापूसाहेब नाईक यांनी या तलावाचा परिसर शासनाकडून ताब्यात घेऊन या प्रशस्त ठिकाणी तलावात सूर्यमंदिर उभारण्याबरोबरच संपूर्ण परिसर सुंदर व निसर्गरम्य करण्याचा प्रयत्न चालविला होता. मात्र, रौप्यनगरीवासीयांच्या दुर्दैवाने त्यांचा हा उपक्रम त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकला नाही. दरम्यानच्या कालावधीत बापूसाहेबांच्या या स्तुत्य उपक्रमाकडे सर्वांचेच मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले. परिणामी, सूर्यतलाव नाव धारण केलेल्या या तलाव परिसराची अत्यंत वाईट व दयनीय परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळू लागले होते. परिसरात मोठ्या प्रमाणात उगवलेली खुरटी झाडे-झुडपे, पान वनस्पती, परिसरात साचलेला विविध प्रकारचा कचरा, यामुळे सर्वत्र घाण, दलदलीचे व दुर्गंधीयुक्त वातावरण पसरले होते. ग्रामपंचायत प्रशासनाने तर कधी या तलावाकडे साधे ढुंकूनही पाहिले नाही.स्वच्छता तर फार लांबची गोष्ट आहे. अशा पद्धतीची अवकळा प्राप्त झालेल्या व दुर्लक्षित राहिलेल्या या तलावाची व परिसराची श्रमदानातून स्वच्छता करण्याचा प्रयत्न काही तरुणांनी गेल्या महिन्यापासून सुरू केला आहे. शहराचे लयास जात असलेले वैभव जतन करण्याच्या होतकरू तरुणांच्या या उपक्रमास समाजातील सर्वच स्तरांतून मोठा प्रतिसादही मिळाला. तलावातील दूषित व अस्वच्छ पाणी बाहेर काढून तलावामध्ये वर्षानुवर्षे साठलेला गाळ परिसरातील शेतकऱ्यांना मोफत वितरित करण्यात आला.रौप्यनगरी हुपरी (ता. हातकणंगले) शहराचे वैभव असलेल्या सूर्यतलावाची (गाढव तळे ) स्वच्छता करून तलावातील गाळ शेतकऱ्यांना मोफत वितरित करण्यात येत आहे.