शहरं
Join us  
Trending Stories
1
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
2
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
3
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
4
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
5
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
7
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
8
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
9
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
10
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
12
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
13
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
14
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
15
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
16
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
17
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
18
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
19
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
20
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

हुपरीच्या तलावाचे तरूणांच्या श्रमदानातून रूप पालटणार

By admin | Updated: March 16, 2017 00:58 IST

रंकाळ्याच्या धर्तीवर सुशोभीकरणाचे नियोजन : काढलेल्या ६00 ट्रॉल्या गाळाचे परिसरातील शेतकऱ्यांना मोफत वितरण

हुपरी : रौप्यनगरी हुपरी (ता. हातकणंगले) शहराच्या मध्यभागी असलेला व शहराचे वैभव म्हणून नावारूपास आलेल्या सूर्यतलावातून (गाढव तळे ) सुमारे ६00 ट्रॉल्या गाळ काढण्यात आला. हा गाळ परिसरातील शेतकऱ्यांना मोफत देण्यात आला. तलावाचे कोल्हापुरातील रंकाळ्याच्या धर्तीवर सुशोभीकरण करण्याचे नियोजन आखण्यात आले असून, यासाठी काही तरुणांकडून विशेष परिश्रम घेण्यात येत आहेत.घाण, दलदल व दुर्गंधीच्या साम्राज्यात हा तलाव सापडला असून, नामशेष होण्याच्या मार्गावर होता. ही परिस्थिती वेळीच लक्षात घेऊन गावातील काही होतकरू तरुणांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबवून हा सूर्यतलाव स्वच्छ केला आहे. शहराचा कारभार हाकणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे रौप्यनगरीचे लयास जात असलेले वैभव जोपासण्याच्या तरुणांच्या या उपक्रमास समाजातील सर्वच स्तरांतून मोठा पाठिंबा मिळाला. तरुणांच्या या उपक्रमाचे समाजाकडून कौतुकही करण्यात आले. ‘गाव करील ते राव काय करील’ या म्हणीची प्रचिती तरुणांनी सुरू केलेल्या या श्रमदानातून शहरवासीयांना निश्चितपणे झाली.संपूर्ण देशात रौप्यनगरी असा नावलौकिक असलेल्या हुपरी शहराच्या अगदी मध्यावर हा सूर्यतलाव आहे. हा तलाव बाराही महिने पूर्ण भरल्याचे चित्र नेहमीच पाहावयास मिळते. परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती (पुतळा), लोकसेवक आबा नाईक विद्यालय, व्यवसाय उद्योगधंद्याने फुललेले छत्रपती शिवाजी मार्केट, मुख्य बसस्थानक, पोलिस ठाणे, तसेच अनेक नामांकित चांदी व्यावसायिकांचे वास्तव्य असलेली यशवंतनगर वसाहत, अशा चोहोबाजूंनी बहरलेल्या परिसरात हा सूर्यतलाव आहे. पूर्वी या तलावाला ‘गाढव तलाव’ म्हणून ओळखण्यात येत होते. हुपरीच्या चांदी उद्योगाचे उर्ध्वयू हुपरीभूषण य. रा. तथा बापूसाहेब नाईक यांनी या तलावाचा परिसर शासनाकडून ताब्यात घेऊन या प्रशस्त ठिकाणी तलावात सूर्यमंदिर उभारण्याबरोबरच संपूर्ण परिसर सुंदर व निसर्गरम्य करण्याचा प्रयत्न चालविला होता. मात्र, रौप्यनगरीवासीयांच्या दुर्दैवाने त्यांचा हा उपक्रम त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकला नाही. दरम्यानच्या कालावधीत बापूसाहेबांच्या या स्तुत्य उपक्रमाकडे सर्वांचेच मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले. परिणामी, सूर्यतलाव नाव धारण केलेल्या या तलाव परिसराची अत्यंत वाईट व दयनीय परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळू लागले होते. परिसरात मोठ्या प्रमाणात उगवलेली खुरटी झाडे-झुडपे, पान वनस्पती, परिसरात साचलेला विविध प्रकारचा कचरा, यामुळे सर्वत्र घाण, दलदलीचे व दुर्गंधीयुक्त वातावरण पसरले होते. ग्रामपंचायत प्रशासनाने तर कधी या तलावाकडे साधे ढुंकूनही पाहिले नाही.स्वच्छता तर फार लांबची गोष्ट आहे. अशा पद्धतीची अवकळा प्राप्त झालेल्या व दुर्लक्षित राहिलेल्या या तलावाची व परिसराची श्रमदानातून स्वच्छता करण्याचा प्रयत्न काही तरुणांनी गेल्या महिन्यापासून सुरू केला आहे. शहराचे लयास जात असलेले वैभव जतन करण्याच्या होतकरू तरुणांच्या या उपक्रमास समाजातील सर्वच स्तरांतून मोठा प्रतिसादही मिळाला. तलावातील दूषित व अस्वच्छ पाणी बाहेर काढून तलावामध्ये वर्षानुवर्षे साठलेला गाळ परिसरातील शेतकऱ्यांना मोफत वितरित करण्यात आला.रौप्यनगरी हुपरी (ता. हातकणंगले) शहराचे वैभव असलेल्या सूर्यतलावाची (गाढव तळे ) स्वच्छता करून तलावातील गाळ शेतकऱ्यांना मोफत वितरित करण्यात येत आहे.