शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

हुपरीतील सीईटीपी प्लँट अद्ययावत होणार

By admin | Updated: November 17, 2014 23:52 IST

पंचतारांकित औद्योगिक वसाहत : ७० लाखांचा खर्च अपेक्षित

तानाजी घोरपडे - हुपरी --तळंदगे, पट्टणकोडोली व इंगळी (ता. हातकणंगले) येथे औद्योगिक वसाहतीतील दूषित पाण्यामुळे गावातील पाण्याचे नैसर्गिक स्रोतही प्रदूषित होत आहेत. ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या रसायनमिश्रित प्रदूषित पाण्याबाबत उपाययोजना आवश्यक होत्या. यासाठी सीईटीपी प्लँटचे अत्याधुनिकीकरण करण्याचा निर्णय पंचतारांकित औद्योगिक वसाहत सीईटीपी को-आॅपरेटिव्ह इंडस्ट्रीजने घेतला आहे. या निर्णयाची लवकर अंमलबजावणी करून प्रदूषित पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ करीत आहेत. रसायनमिश्रित प्रदूषित पाण्याबाबत पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना अखेर दखल घ्यावीच लागली. तळंदगे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने याविरोधात सातत्याने विविध पातळीवर उठविलेला आवाज व त्यास ‘लोकमत’ने सातत्याने दिलेले पाठबळ यामुळे सुमारे ७० लाख रु. खर्च करून सीईटीपी प्लँटचे अत्याधुनिकीकरण करण्याचा निर्णय पंचतारांकित औद्योगिक वसाहत सीईटीपी को-आॅपरेटिव्ह इंडस्ट्रीजने घेतला आहे. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांमधून बाहेर पडणाऱ्या रसायनमिश्रित प्रदूषित पाण्यावर शुद्धिकरण प्रक्रिया करण्यासाठी तळंदगे गावानजीक सीईटीपी प्लँट उभारण्यात आला आहे. दहा लाख लिटर क्षमता असणाऱ्या या प्लँटच्या देखभाल-दुरुस्तीचे काम योग्यप्रकारे होत नसल्याने रसायनमिश्रित प्रदूषित पाणी गावाच्या ओढ्यात सरळ सरळ सोडण्यात येत असे. अशा प्रकारे गेल्या सहा वर्षांपासून सुरू राहिल्याने गावातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत (विहिरी, तलाव, विंधन विहिरी, ओढे) प्रदूषित झाले आहेत. यातूनच हजारो ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. तसेच ओढा परिसरातील तळंदगे, पट्टणकोडोली व इंगळीतील पिकाऊ शेतजमिनीचा पोत बिघडण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी अनेकवेळा याप्रश्नी विविध आंदोलनेही केली. उपसरपंच राजेंद्र हवालदार, सागर चौगुले यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन शासनदरबारी हा प्रश्न सातत्याने लावून धरला होता. परिणामी औद्योगिक वसाहत महामंडळाचे कार्यकारी अभियंता एस. बी. भांडेकर व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियामक महामंडळाचे सचिव राजीवकुमार मित्तल यांना विशेष लक्ष केंद्रित करावे लागले. ‘लोकमत’ने अनेकवेळा सातत्याने याप्रश्नी आवाज उठवून प्रदूषित पाण्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्या मांडून ग्रामस्थांचा आवाज शासनदरबारी पोहोचविला.‘लोकमत’चा पाठपुरावासरपंच मंगल वाघमोडे व उपसरपंच राजेंद्र हवालदार म्हणाले, औद्योगिक वसाहतीतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे शेतीच्या पाण्याबरोबरच ग्रामस्थांचे आरोग्यही धोक्यात येत होते. त्याच्या विरोधात ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामपंचायतीने वेळोवेळी आंदोलने केली. त्याला ‘लोकमत’ने भक्कम पाठबळ दिल्यामुळेच आमचा आवाज शासन व प्रदूषण नियामक महामंडळापर्यंत पोहोचला गेला. त्यामुळेच हा जटील प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर१याबाबत पंचतारांकित औद्योगिक वसाहत सीईटीपी को-आॅप. इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सदानंद गुप्ता म्हणाले, प्रदूषित सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या अत्याधुनिक प्रकल्पाच्या देखभाल-दुरुस्तीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. २हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी सुमारे २० लाख रुपये खर्च असून, अत्याधुनिक पद्धतीचा प्रकल्प अस्तित्वात आणण्यासाठी आणखी ५० लाखांचा खर्च येणार आहे. ३हा संपूर्ण खर्च असोसिएशन करणार आहे. हा प्रकल्प दुरुस्तीनंतर कार्यान्वित झाल्यास शेतीच्या पाण्याचे होणारे प्रदूषण तसेच विहिरी, नाले यांत मिसळणारे सांडपाणी पूर्णत: बंद होणार आहे. हा प्रकल्प येत्या तीन महिन्यांत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल, अशी आशा व्यक्त केली.