शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

CoronaVirus Lockdown :जिल्ह्यातील ४८ हजार दिव्यांगांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 14:14 IST

जिल्ह्यातील सुमारे ४८ हजार दिव्यांग बांधव जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना घरातून बाहेर पडणे तसेच कोणत्याही रांगेत थांबणे शक्य नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन संंबंधित यंत्रणेला या संदर्भात निर्देश दिले आहेत; परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ४८ हजार दिव्यांगांवर उपासमारीची वेळ जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळणार कधी ? : कोरोनाची झळ

प्रवीण देसाईकोल्हापूर : जिल्ह्यातील सुमारे ४८ हजार दिव्यांग बांधव जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना घरातून बाहेर पडणे तसेच कोणत्याही रांगेत थांबणे शक्य नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन संंबंधित यंत्रणेला या संदर्भात निर्देश दिले आहेत; परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे चित्र आहे.कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी व्यक्तींना सूट देण्यात आली आहे; परंतु दिव्यांगांना घरातून बाहेर पडणे व वस्तू खरेदी करण्यासाठी रांगेत थांबणे शक्य नाही. त्यामुळे त्यांच्यावर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे.

ही बाब लक्षात आल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे घरपोच वाटप करावे किंवा तत्काळ विनारांग रेशन द्यावे, असे निर्देश शहर प्रभाग समिती व ग्रामस्तरीय समितीला दिले. तसेच तात्पुरत्या निवारागृहातील दिव्यांगांची माहिती घेऊन त्यांना स्वयंसेवकांनी मदत देण्याबाबतही सांगितले आहे.अंथरुणाला खिळलेल्या, तीव्र, अतितीव्र दिव्यांगांना सॅनिटायझर, मास्क, डेटॉल, फिनेल, आदी वस्तूही पुरविण्यात याव्यात. गरजू दिव्यांगांची आवश्यकता असेल तेथे स्वयंसेवी संस्थेमार्फत जेवणाची सोय करावी. राष्ट्रीय बँका व इतर बँकांमध्ये दिव्यांगांना रांगेत न थांबविता तत्काळ सेवा द्याव्यात. दिव्यांगांच्या शारीरिक दुर्बलतेमुळे त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळे विशेष बाब म्हणून सर्व बँका, रेशन दुकानदारांनी त्यांना प्राधान्य द्यावे. यासह दिव्यांगांना एक महिन्याची आगाऊ पेन्शन देण्याची सूचनाही संबंधित विभागाला केली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले असले तरी ग्राम व शहर स्तरांवरील समित्यांकडून याची कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. काही गावांत दिव्यांगांनी ग्रामसेवकांना विचारणा केल्यावर त्यांच्याकडून आम्हाला अद्याप कोणतेही निर्देश आलेले नाहीत; त्यामुळे तुम्हाला जीवनावश्यक वस्तू मिळू शकत नाहीत, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे आम्ही जायचे कोणाकडे व दाद कोणाकडे मागायची, असा सूर दिव्यांग बांधवांमधून उमटत आहे. जिल्ह्यात जवळपास ४८ हजार दिव्यांग बांधव असून सर्वजण मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

दिव्यांगांना प्राधान्याने जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यासंदर्भात ग्राम व शहर प्रभाग समित्यांना निर्देश दिले आहेत. त्यांना याबाबत पुन्हा सूचना देण्यात येतील. तरीही यामध्ये टाळाटाळ झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.- दौलत देसाई, जिल्हाधिकारी

केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशांनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तू घरपोहोच देण्याचे आदेश दिले आहेत; परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. विशेषत: ग्रामीण भागातील दिव्यांग मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.- देवदत्त माने, जिल्हाध्यक्ष, प्रहार अपंग क्रांती संघटना

दिव्यांग हे घराबाहेर पडू शकत नसल्याने त्यांना जीवनावश्यक वस्तू बाजारात जाऊन आणणे शक्य नाही. मदतीसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील दिव्यांग बांधवांकडून फोन येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर मदत द्यावी.- अनिल मिरजे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र अपंग साहाय्य सेना

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरDivyangदिव्यांग