शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

जिल्ह्यातील तीन हजारपेन्शनधारक हवालदिल

By admin | Updated: February 15, 2015 00:41 IST

पेन्शनचा प्रश्न : हयातीचे दाखले देऊनही भविष्यनिर्वाह निधीचा कानाडोळा

प्रवीण देसाई ल्ल कोल्हापूर ज्यांना भविष्यनिर्वाह निधी लागू आहे, अशा खासगी क्षेत्रातील उद्योग, संस्था यांमधील निवृत्त कर्मचाऱ्यांना दिली जाणारी भविष्यनिर्वाह निधीची जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांतील पेन्शनच मिळालेली नाही. या कार्यालयाच्या बोटचेप्या धोरणामुळे जिल्ह्यातील तीन हजारांहून अधिक पेन्शनधारकांना वंचित राहावे लागत आहे. जिल्ह्यात एकूण जवळपास चार हजार पेन्शनर आहेत. १९९५ च्या ईपीएस ९५ कायद्यानुसार १८६ खासगी उद्योग, संस्थांमधील जे कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (प्रॉव्हिडंट फंड) भरतात, त्यांना ही पेन्शन लागू आहे. जिल्ह्यातील जवळपास चार हजार निवृत्त कर्मचारी या पेन्शनसाठी पात्र आहेत. यांतील तीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांतील पेन्शनच मिळालेली नाही. ५०० रुपयांपासून २००० रुपयांपर्यंत असलेली ही पेन्शन मिळण्यासाठी त्यांना ताराबाई पार्कातील या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. हयातीचे दाखले नसल्याने ही पेन्शन दिली जात नसल्याचे या कार्यालयाकडून उत्तर दिले जात आहे. वयाची साठी पार केलेला कर्मचारी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून येतो. त्याला योग्य उत्तर देण्याऐवजी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. आपल्या हक्काच्या पेन्शनसाठी या वयोवृद्ध पेन्शनधारकांना झगडावे लागत आहे. या कार्यालयाला पेन्शनधारकाची खात्री करण्यासाठी लागणारे हयातीचे दाखले नोव्हेंबर महिन्यातच देण्यात आले आहेत. हयातीची खातरजमा ही ज्या राष्ट्रीयीकृत बॅँकेत कर्मचाऱ्याचे खाते आहे, तेथून हे दाखले या कार्यालयाकडे पाठविले जातात. त्यानंतर हे कार्यालय पेन्शनचे चेक काढते. या कार्यालयाकडे जवळपास ४००० लोकांचे हयातीचे दाखले नोव्हेंबर महिन्यातच दिले आहेत. त्यानुसार डिसेंबर महिन्यात सर्व पेन्शनधारकांना पेन्शनही मिळाली आहे; परंतु जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांतील पेन्शन न मिळण्याचे कारण हयातीचे दाखले मिळाले नसल्याचे सांगितले जात आहे. एकदा आपण हयात असल्याचा दाखला राष्ट्रीयीकृत बॅँकेकडून या कार्यालयाला दिल्यानंतर पुन्हा तोच दाखला नाही म्हणून पेन्शन थांबविणे योग्य नाही, असा सूर पेन्शनधारकांमधून उमटत आहे. जर डिसेंबर महिन्यातील पेन्शन मिळते, तर आता का नाही? असा सवालही उपस्थित केला जात आहे. राष्ट्रीयीकृत बॅँकांकडून हयातीचे दाखले या कार्यालयाला देण्यात आले आहेत; परंतु संगणकातील सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे ते मिळाले नसल्याचे या कार्यालयाचे म्हणणे आहे; परंतु पेन्शन केव्हा मिळणार हे सांगण्यास येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जिवावर येते. विचारणा करण्यासाठी आलेल्या पेन्शनधारकांना मार्चनंतर बघूया, अशी उत्तरे दिली जातात, अशी पेन्शनधारकांची तक्रार आहे. यामुळे चौकशीसाठी फक्त हेलपाटेच मारून हातात काहीच पडत नसल्याने पेन्शनधारकांतून संतप्त सूर उमटत आहे.