शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

काळम्मावाडी कालव्यास गळती, शेती नापीकीचा धोका; शेकडो एकर जमिनीला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 12:32 IST

कालव्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे डाव्या व उजव्या कालव्यातील पाण्याची सतत गळती होऊन धरण परिक्षेत्रातील जवळपास २० गावांतील कालवेग्रस्त भूमीपुत्रांची शेकडो एकर जमीन नापीक झाली आहे.

निवास पाटीलसोळांकूर : महाराष्ट्रसह कर्नाटक राज्यातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येईल व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल या उद्देशाने काळम्मावाडी धरणाची उभारणी केली गेली. वर्षानुवर्षे कोरड असणारी जमीन ओलिताखाली आल्याने बहुतांशी भाग सुजलाम् सुफलाम झाला आहे. पण या प्रकल्पाकडे सध्या दुर्लक्ष झाले आहे. कोणतेही विकासात्मक काम न होता हे धरण समस्यांच्या गराड्यात सापडले आहे.त्यापैकी कालव्यातील गळतीचा प्रश्न गंभीर बनला आहे. कालव्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे डाव्या व उजव्या कालव्यातील पाण्याची सतत गळती होऊन धरण परिक्षेत्रातील जवळपास २० गावांतील कालवेग्रस्त भूमीपुत्रांची शेकडो एकर जमीन नापीक झाली आहे.

काही एकर शेतात सततच्या पाण्यामुळे दलदल निर्माण होऊन पिकांच्या उत्पादनात घट होऊन उत्पादन निम्म्यावर आले आहे. शेतातील मशागती, खते यांचा विचार करता लाखोंचा फटका भूमिपुत्रांना सोसावा लागत आहे. जमिनीचे उत्पादन घटल्याने पीक कर्जासाठी काढलेले कर्जदेखील फेडताना भूमिपुत्रांना घाम फुटत आहे. आटेगाव पंडेवाडी या गावात राहत्या घरामध्ये पाण्याचे उमाळे फुटले आहेत. पोवारवाडी, आटेगाव, पंडेवाडी, मल्लेवाडी येथील काही घरांच्या पायातूनच पाण्याचे पाट वाहत आहेत.

तसेच काळम्मावाडी, लिंगाचीवाडी पनोरी, हेळेवाडी, पनोरी, मल्लेवाडी, मोघर्डे, सुळंबी, सोळांकुर, पंडेवाडी, ढेंगेवाडी, सावर्डेपाटणकर, पोवारवाडी, आटेगाव, उंदरवाडी, बुजवडे तसेच कालव्यालगत असणाऱ्या अनेक शेतामध्ये पाणी उमटून जमीन नापीक होण्याच्या मार्गावर आहे, तर काही शेतात माठाचे अंश दिसत आहेत.

सन १९९३-९४ पासून काळम्मावाडी धरणाच्या मुख्य कालव्यातून टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात आले. मुख्य कालवा कि.मी १ ते कि.मी. १० मध्ये सिमेंटचे अस्तरीकरण करण्यात आले होते. पण येथील जमीन विचित्र भूस्तराची असल्याने अनेक वेळा कालवा फुटीचे प्रकार घडलेले आहेत. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तेवढ्यापुरते पंचनामे झाले; पण नुकसानभरपाई मिळाली नाही. काही शेतकऱ्यांनी कालव्यालगतची जमीन कसणे सोडून दिले आहे. काही ठिकाणी संरक्षक भिंती उभारूनदेखील लोकांच्या घरात पाण्याचे उमाळे फुटले आहेत.

कालवेग्रस्तांनी अनेक वेळा रस्ता रोको, आंदोलने व संघर्ष करून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. पाण्याच्या गळतीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. या अन्यायाला वाचा फोडणारा कोणी वाली भेटणार का ? अशी आर्त हाक भूमिपुत्र करत आहेत.

 २६ वर्षांपासून कालव्यांची डागडुजी नाही

गेली २६ वर्षे मुख्य कालव्यासह डाव्या व उजव्याची कोणत्याही प्रकारचे डागडुजी अथवा नवीन काम करण्यात आले नाही. नियोजित पोट कालवे अद्याप कागदावर आहेत. काही ठिकाणी कालव्यात झाडेझुडपे वाढली आहेत, तर कालव्यात दगड, खाचखळगे आहेत. प्रायोगिक तत्त्वावर जिओ सिंथेटिक अस्तरीकरणचा प्रयोग करण्यात आला होता. त्यालाही वाटण्याच्या अक्षदा लागल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर