शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

HSC 12th Result 2022: कोल्हापूर विभाग राज्यात पाचव्या स्थानी, ९५.७ टक्के निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 12:40 IST

गेल्यावर्षी कोल्हापूर विभाग ९९.९७ टक्क्यांसह राज्यात चौथ्या क्रमांकावर होता. यंदाच्या निकालात घसरण झाल्याने पाचव्या स्थानावर गेला आहे.

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता बारावीचा ऑनलाईन निकाल आज, बुधवारी जाहीर झाला. त्यात ९५. ७ टक्के निकालासह कोल्हापूर विभाग राज्यात पाचव्या स्थानी राहिला. या विभागात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याचा समावेश आहे. गेल्यावर्षी कोल्हापूर विभाग ९९.९७ टक्क्यांसह राज्यात चौथ्या क्रमांकावर होता. यंदाच्या निकालात घसरण झाल्याने पाचव्या स्थानावर गेला आहे.फेब्रुवारी-मार्च दरम्यान बारावीची परीक्षा झाली. त्यासाठी कोल्हापूर विभागातून १ लाख २१ हजार ९२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख २१ हजार ३४० जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख १५ हजार ३६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी ९५.७ टक्के इतकी आहे. कोल्हापूर विभागात प्राविण्यासह प्रथम श्रेणीत ३५०७६ विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये ६४३७७, द्वीतीय श्रेणी ४०९०८ विद्यार्थी, तर उत्तीर्ण श्रेणीमध्ये ४२५७ जणांनी यश मिळविले.यंदाही कोकण विभागाचीच बाजीराज्यात एकूण ९४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर दरवर्षी प्रमाणे यंदाची कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागातून सर्वाधिक ९७.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला असून ९०.९१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना निकाल दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाइन पद्धतीनं पाहता येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHSC Exam Resultबारावी निकाल