शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोल्हापूरचे सैरभैर पर्यटन: गोट्या खेळून, टायर फिरवून पर्यटन कसे वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 18:39 IST

चौकाची रंगरंगोटी, तिथे काही तरी वेगळे उभे करणे, तलावाभोवती पेव्हिंग ब्लॉक बसविणे, हायमास्ट दिवे लावून त्याखाली बाकडी टाकणे म्हणजे पर्यटन विकास नव्हे

समीर देशपांडेकोल्हापूर : कोल्हापूरचे नूतन पालकमंत्री दीपक केसरकर यांना कोल्हापूरचा दसरा म्हैसूरच्या धर्तीवर साजरा करायचा आहे. दोन वर्षांत कोल्हापूरचा त्यांना जयपूरच्या धर्तीवर विकास करायचा आहे. मग यासाठी रस्त्यावर गोट्या खेळून आणि टायर फिरवून काहीच साध्य होणार नाही. या क्षेत्रात खरोखरच काही भरीव काम केलेल्यांची मते विचारात घेऊन तसा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.याआधीही तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सतेज पाटील यांनी पर्यटनवाढीसाठी काही प्रयत्न केले. परंतु, यामध्ये तत्कालीक उपक्रमांची संख्या जास्त होती. यासारखे उपक्रम कोल्हापूरमध्ये अनेक संस्था करत असतात. त्याला महाराष्ट्र शासनाची गरज नाही. शासनाने पर्यटन वाढवताना त्याठिकाणी जाण्यासाठी उत्तम खड्डेविरहीत रस्ते, त्या-त्या ठिकाणी स्वच्छ असलेली स्वच्छतागृहे, कुठूनही जाण्या-येण्यासाठी फलकांच्या माध्यमातून मार्गदर्शन याकडे लक्ष देण्याची गरज आहे.कोल्हापुरात आल्यानंतर पार्किंग कुठे करायचे, या विवंचनेत असलेला भाविक, पर्यटक मेटाकुटीला येतो. मग अंबाबाई दर्शन. त्याठिकाणी प्रचंड गर्दी. घाेषणा झाल्या परंतु निधीच नसल्याने अंबाबाई मंदिर परिसराचा विकास रखडला. दर्शन झाल्यानंतर आणखी काय, कुठे पहायचे याची नेमकी माहिती देणारी यंत्रणा नाही. मग कोणाला तरी विचारून कुठे जायचे याचे नियोजन होते. त्यामुळे अजूनही पालकमंत्री केसरकर यांनी फुटकळ उपक्रमांपेक्षा पर्यटन वाढीसाठी आवश्यक असलेल्या मुलभूत सोयी आणि सुविधा पहिल्यांदा देण्यावर भर द्यावा, जेणेकरून पर्यटकांना दिलासा मिळेल.

लाईटही नाही आणि साऊंडही नाहीअनेक ठिकाणी त्या-त्या शहराचे वैशिष्ट्य सांगणारा एखादा अर्ध्या तासाचा कार्यक्रम संध्याकाळच्या वेळी शहरात सादर केला जातो. परंतु, कोल्हापुरात यातील काहीही होत नाही. भवानी मंडपमध्ये अशा पद्धतीचे सादरीकरण पर्यटकांना पर्वणी ठरेल. पण धोरण म्हणून काही गोष्टी नीट ठरविल्या गेल्या पाहिजेत.

सुशोभिकरण म्हणजे पर्यटन विकास नव्हे

चौकाची रंगरंगोटी, तिथे काही तरी वेगळे उभे करणे, तलावाभोवती पेव्हिंग ब्लॉक बसविणे, हायमास्ट दिवे लावून त्याखाली बाकडी टाकणे आणि मंदिरांच्या समोर सांस्कृतिक सभागृह उभारणे म्हणजे पर्यटन विकास अशी कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांची धारणा झाली आहे. देश-विदेशात फिरणाऱ्या या मंडळींना कणेरी मठावरील ग्रामजीवनाच्या संकल्पनेसारखी भव्य-दिव्य संकल्पना आपल्या जिल्ह्यात राबवावी, असे आतापर्यंत का वाटले नसावे, याचेच आश्चर्य वाटते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटन