शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

कोल्हापूरचे सैरभैर पर्यटन: गोट्या खेळून, टायर फिरवून पर्यटन कसे वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 18:39 IST

चौकाची रंगरंगोटी, तिथे काही तरी वेगळे उभे करणे, तलावाभोवती पेव्हिंग ब्लॉक बसविणे, हायमास्ट दिवे लावून त्याखाली बाकडी टाकणे म्हणजे पर्यटन विकास नव्हे

समीर देशपांडेकोल्हापूर : कोल्हापूरचे नूतन पालकमंत्री दीपक केसरकर यांना कोल्हापूरचा दसरा म्हैसूरच्या धर्तीवर साजरा करायचा आहे. दोन वर्षांत कोल्हापूरचा त्यांना जयपूरच्या धर्तीवर विकास करायचा आहे. मग यासाठी रस्त्यावर गोट्या खेळून आणि टायर फिरवून काहीच साध्य होणार नाही. या क्षेत्रात खरोखरच काही भरीव काम केलेल्यांची मते विचारात घेऊन तसा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.याआधीही तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सतेज पाटील यांनी पर्यटनवाढीसाठी काही प्रयत्न केले. परंतु, यामध्ये तत्कालीक उपक्रमांची संख्या जास्त होती. यासारखे उपक्रम कोल्हापूरमध्ये अनेक संस्था करत असतात. त्याला महाराष्ट्र शासनाची गरज नाही. शासनाने पर्यटन वाढवताना त्याठिकाणी जाण्यासाठी उत्तम खड्डेविरहीत रस्ते, त्या-त्या ठिकाणी स्वच्छ असलेली स्वच्छतागृहे, कुठूनही जाण्या-येण्यासाठी फलकांच्या माध्यमातून मार्गदर्शन याकडे लक्ष देण्याची गरज आहे.कोल्हापुरात आल्यानंतर पार्किंग कुठे करायचे, या विवंचनेत असलेला भाविक, पर्यटक मेटाकुटीला येतो. मग अंबाबाई दर्शन. त्याठिकाणी प्रचंड गर्दी. घाेषणा झाल्या परंतु निधीच नसल्याने अंबाबाई मंदिर परिसराचा विकास रखडला. दर्शन झाल्यानंतर आणखी काय, कुठे पहायचे याची नेमकी माहिती देणारी यंत्रणा नाही. मग कोणाला तरी विचारून कुठे जायचे याचे नियोजन होते. त्यामुळे अजूनही पालकमंत्री केसरकर यांनी फुटकळ उपक्रमांपेक्षा पर्यटन वाढीसाठी आवश्यक असलेल्या मुलभूत सोयी आणि सुविधा पहिल्यांदा देण्यावर भर द्यावा, जेणेकरून पर्यटकांना दिलासा मिळेल.

लाईटही नाही आणि साऊंडही नाहीअनेक ठिकाणी त्या-त्या शहराचे वैशिष्ट्य सांगणारा एखादा अर्ध्या तासाचा कार्यक्रम संध्याकाळच्या वेळी शहरात सादर केला जातो. परंतु, कोल्हापुरात यातील काहीही होत नाही. भवानी मंडपमध्ये अशा पद्धतीचे सादरीकरण पर्यटकांना पर्वणी ठरेल. पण धोरण म्हणून काही गोष्टी नीट ठरविल्या गेल्या पाहिजेत.

सुशोभिकरण म्हणजे पर्यटन विकास नव्हे

चौकाची रंगरंगोटी, तिथे काही तरी वेगळे उभे करणे, तलावाभोवती पेव्हिंग ब्लॉक बसविणे, हायमास्ट दिवे लावून त्याखाली बाकडी टाकणे आणि मंदिरांच्या समोर सांस्कृतिक सभागृह उभारणे म्हणजे पर्यटन विकास अशी कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांची धारणा झाली आहे. देश-विदेशात फिरणाऱ्या या मंडळींना कणेरी मठावरील ग्रामजीवनाच्या संकल्पनेसारखी भव्य-दिव्य संकल्पना आपल्या जिल्ह्यात राबवावी, असे आतापर्यंत का वाटले नसावे, याचेच आश्चर्य वाटते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटन