शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
2
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
3
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
4
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
5
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
6
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
7
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
8
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
9
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
10
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
11
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
12
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
13
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
14
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
15
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
16
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
17
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
18
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
19
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
20
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचे सैरभैर पर्यटन: गोट्या खेळून, टायर फिरवून पर्यटन कसे वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 18:39 IST

चौकाची रंगरंगोटी, तिथे काही तरी वेगळे उभे करणे, तलावाभोवती पेव्हिंग ब्लॉक बसविणे, हायमास्ट दिवे लावून त्याखाली बाकडी टाकणे म्हणजे पर्यटन विकास नव्हे

समीर देशपांडेकोल्हापूर : कोल्हापूरचे नूतन पालकमंत्री दीपक केसरकर यांना कोल्हापूरचा दसरा म्हैसूरच्या धर्तीवर साजरा करायचा आहे. दोन वर्षांत कोल्हापूरचा त्यांना जयपूरच्या धर्तीवर विकास करायचा आहे. मग यासाठी रस्त्यावर गोट्या खेळून आणि टायर फिरवून काहीच साध्य होणार नाही. या क्षेत्रात खरोखरच काही भरीव काम केलेल्यांची मते विचारात घेऊन तसा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.याआधीही तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सतेज पाटील यांनी पर्यटनवाढीसाठी काही प्रयत्न केले. परंतु, यामध्ये तत्कालीक उपक्रमांची संख्या जास्त होती. यासारखे उपक्रम कोल्हापूरमध्ये अनेक संस्था करत असतात. त्याला महाराष्ट्र शासनाची गरज नाही. शासनाने पर्यटन वाढवताना त्याठिकाणी जाण्यासाठी उत्तम खड्डेविरहीत रस्ते, त्या-त्या ठिकाणी स्वच्छ असलेली स्वच्छतागृहे, कुठूनही जाण्या-येण्यासाठी फलकांच्या माध्यमातून मार्गदर्शन याकडे लक्ष देण्याची गरज आहे.कोल्हापुरात आल्यानंतर पार्किंग कुठे करायचे, या विवंचनेत असलेला भाविक, पर्यटक मेटाकुटीला येतो. मग अंबाबाई दर्शन. त्याठिकाणी प्रचंड गर्दी. घाेषणा झाल्या परंतु निधीच नसल्याने अंबाबाई मंदिर परिसराचा विकास रखडला. दर्शन झाल्यानंतर आणखी काय, कुठे पहायचे याची नेमकी माहिती देणारी यंत्रणा नाही. मग कोणाला तरी विचारून कुठे जायचे याचे नियोजन होते. त्यामुळे अजूनही पालकमंत्री केसरकर यांनी फुटकळ उपक्रमांपेक्षा पर्यटन वाढीसाठी आवश्यक असलेल्या मुलभूत सोयी आणि सुविधा पहिल्यांदा देण्यावर भर द्यावा, जेणेकरून पर्यटकांना दिलासा मिळेल.

लाईटही नाही आणि साऊंडही नाहीअनेक ठिकाणी त्या-त्या शहराचे वैशिष्ट्य सांगणारा एखादा अर्ध्या तासाचा कार्यक्रम संध्याकाळच्या वेळी शहरात सादर केला जातो. परंतु, कोल्हापुरात यातील काहीही होत नाही. भवानी मंडपमध्ये अशा पद्धतीचे सादरीकरण पर्यटकांना पर्वणी ठरेल. पण धोरण म्हणून काही गोष्टी नीट ठरविल्या गेल्या पाहिजेत.

सुशोभिकरण म्हणजे पर्यटन विकास नव्हे

चौकाची रंगरंगोटी, तिथे काही तरी वेगळे उभे करणे, तलावाभोवती पेव्हिंग ब्लॉक बसविणे, हायमास्ट दिवे लावून त्याखाली बाकडी टाकणे आणि मंदिरांच्या समोर सांस्कृतिक सभागृह उभारणे म्हणजे पर्यटन विकास अशी कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांची धारणा झाली आहे. देश-विदेशात फिरणाऱ्या या मंडळींना कणेरी मठावरील ग्रामजीवनाच्या संकल्पनेसारखी भव्य-दिव्य संकल्पना आपल्या जिल्ह्यात राबवावी, असे आतापर्यंत का वाटले नसावे, याचेच आश्चर्य वाटते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटन