शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ कारभाराच्या गप्पा मारता, मग ‘ब’ वर्ग कसा?

By admin | Updated: April 17, 2015 00:09 IST

संजय पाटील यांची सत्तारूढांना विचारणा : पारदर्शकतेचा बुरखा फाटल्याने परिवर्तन अटळ

राजाराम लोंढे -कोल्हापूर -गेल्या अकरा वर्षांत आदर्श कारभार केल्याचा डांगोरा पिटणाऱ्यांनी पतसंस्थेच्या लेखापरीक्षण अहवालावर बोलावे. पतसंस्थेचा ‘सीडी’ रेशो ११५ टक्के, गुंतवणुकीवर कर्ज उचलून पतसंस्थेला आर्थिक अडचणीत आणण्याचे काम सत्तारूढ गटाने केले आहे. स्वच्छ कारभाराच्या गप्पा मारता मग पतसंस्थेचा आॅडिट वर्ग सलग ‘ब’ कसा? अशी विचारणा पतसंस्थेचे माजी सभापती व राजर्षी शाहू परिवर्तन महाआघाडीचे नेते संजय डी. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. संजय पाटील म्हणाले, पतसंस्थेच्या लेखापरीक्षण अहवालात गंभीर शेरे मारले आहेत. १९५ कोटींच्या ठेवींवर किमान ५५ कोटी गुंतवणूक गरजेची होती, पण या मंडळींनी २८ कोटी गुंतवणूक केली तीही तारण देऊन कॅश क्रेडिट उचलले आहे. ठेवी व कर्जाचे गुणोत्तर प्रमाण ११५ टक्क्यांवर पोहोचले आहे, अशी भयानक अवस्था पतसंस्थेची केल्यानेच लेखापरीक्षण अहवालात ताशेरे ओढले आहेत. रिकरिंग व शेअर्स ठेव कमी व्याजाने घेऊन ती सभासदांनाच १२.५ टक्क्यांनी दिली जाते, वर्षाला पाच कोटी रुपये सभासदांचे नुकसान होते, हीच दादा लाड यांची पारदर्शकता काय? शेजारील जिल्ह्णातील माध्यमिक शिक्षकांच्या पतसंस्थेचा कारभार पाहिला तर सत्तारूढ मंडळींची धूळफेक लक्षात येते. ५५ लाख रुपये खर्च करूनही सर्व शाखांत संगणकीकरण पूर्ण झालेले नाही. संघटनांच्या नेत्यांनी नोकरभरती केल्याची टीका दादा लाड करत आहेत, पण यांनी काय केले. साडेआठ हजार सभासदांना सव्वा कोटी लाभांश आणि ५४ कर्मचाऱ्यांचा दीड कोटी पगार होत असल्याने नोकरभरतीऐवजी कर्जाचा व्याजदर १२ टक्के करावा, अशी मागणी आमची होती पण लाड यांनी बहुमताच्या जोरावर भरतीचा घाट घातला, त्याविरोधात न्यायालयीन लढाई केली, चुकीची माहिती देऊन न्यायालयाचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही सबळ पुरावे दिल्याने स्थगिती मिळाली. अशा मंडळींना संघटनेच्या भरतीवर बोलण्याचा नैतिक अधिकार काय? या प्रश्नांची जाहीर सभांमधून विचारणा करूनही दादांची बोलती बंद का ? असा खडा सवालही पाटील यांनी केला. महाआघाडीला खिचडी म्हणणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे, आम्हाला सत्तेची हाव कधीच नव्हती आणि नाही, पण आठ हजार सभासदांची संस्था वाचविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारणाऱ्यांची बुरखा फाटला असून सूज्ञ सभासदांनी अशा प्रवृत्तीला बाजूला करण्याचे ठरविल्याने परिवर्तन अटळ असल्याचेही त्यांनी सांगितले.