शहरं
Join us  
Trending Stories
1
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
2
"हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात..."; प्रकाश आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकरांना खरमरीत प्रश्न
3
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
4
Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू
5
एका भाजी विक्रेत्याच्या भांडणाने पेटले इस्रायल-सीरिया युद्ध; आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू...
6
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
7
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
8
IND vs ENG: "जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी" माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड असे का म्हणाले? वाचा
9
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'
10
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
11
'मी १००० तरुणींसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, पण आता मला...'; ३१ वर्षीय तरुण का आहे चर्चेत?
12
१.१७ कोटी आधार कार्ड झाली बंद; 'अशा' लोकांचं आधार कार्ड निष्क्रिय करतंय UIDAI, पाहा डिटेल्स
13
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
14
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
15
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
16
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
17
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
18
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
19
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
20
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी

स्वच्छ कारभाराच्या गप्पा मारता, मग ‘ब’ वर्ग कसा?

By admin | Updated: April 17, 2015 00:09 IST

संजय पाटील यांची सत्तारूढांना विचारणा : पारदर्शकतेचा बुरखा फाटल्याने परिवर्तन अटळ

राजाराम लोंढे -कोल्हापूर -गेल्या अकरा वर्षांत आदर्श कारभार केल्याचा डांगोरा पिटणाऱ्यांनी पतसंस्थेच्या लेखापरीक्षण अहवालावर बोलावे. पतसंस्थेचा ‘सीडी’ रेशो ११५ टक्के, गुंतवणुकीवर कर्ज उचलून पतसंस्थेला आर्थिक अडचणीत आणण्याचे काम सत्तारूढ गटाने केले आहे. स्वच्छ कारभाराच्या गप्पा मारता मग पतसंस्थेचा आॅडिट वर्ग सलग ‘ब’ कसा? अशी विचारणा पतसंस्थेचे माजी सभापती व राजर्षी शाहू परिवर्तन महाआघाडीचे नेते संजय डी. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. संजय पाटील म्हणाले, पतसंस्थेच्या लेखापरीक्षण अहवालात गंभीर शेरे मारले आहेत. १९५ कोटींच्या ठेवींवर किमान ५५ कोटी गुंतवणूक गरजेची होती, पण या मंडळींनी २८ कोटी गुंतवणूक केली तीही तारण देऊन कॅश क्रेडिट उचलले आहे. ठेवी व कर्जाचे गुणोत्तर प्रमाण ११५ टक्क्यांवर पोहोचले आहे, अशी भयानक अवस्था पतसंस्थेची केल्यानेच लेखापरीक्षण अहवालात ताशेरे ओढले आहेत. रिकरिंग व शेअर्स ठेव कमी व्याजाने घेऊन ती सभासदांनाच १२.५ टक्क्यांनी दिली जाते, वर्षाला पाच कोटी रुपये सभासदांचे नुकसान होते, हीच दादा लाड यांची पारदर्शकता काय? शेजारील जिल्ह्णातील माध्यमिक शिक्षकांच्या पतसंस्थेचा कारभार पाहिला तर सत्तारूढ मंडळींची धूळफेक लक्षात येते. ५५ लाख रुपये खर्च करूनही सर्व शाखांत संगणकीकरण पूर्ण झालेले नाही. संघटनांच्या नेत्यांनी नोकरभरती केल्याची टीका दादा लाड करत आहेत, पण यांनी काय केले. साडेआठ हजार सभासदांना सव्वा कोटी लाभांश आणि ५४ कर्मचाऱ्यांचा दीड कोटी पगार होत असल्याने नोकरभरतीऐवजी कर्जाचा व्याजदर १२ टक्के करावा, अशी मागणी आमची होती पण लाड यांनी बहुमताच्या जोरावर भरतीचा घाट घातला, त्याविरोधात न्यायालयीन लढाई केली, चुकीची माहिती देऊन न्यायालयाचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही सबळ पुरावे दिल्याने स्थगिती मिळाली. अशा मंडळींना संघटनेच्या भरतीवर बोलण्याचा नैतिक अधिकार काय? या प्रश्नांची जाहीर सभांमधून विचारणा करूनही दादांची बोलती बंद का ? असा खडा सवालही पाटील यांनी केला. महाआघाडीला खिचडी म्हणणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे, आम्हाला सत्तेची हाव कधीच नव्हती आणि नाही, पण आठ हजार सभासदांची संस्था वाचविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारणाऱ्यांची बुरखा फाटला असून सूज्ञ सभासदांनी अशा प्रवृत्तीला बाजूला करण्याचे ठरविल्याने परिवर्तन अटळ असल्याचेही त्यांनी सांगितले.