शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Kolhapur Flood: पूरग्रस्त म्हणून किती दिवस जगायचे?, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना बाधितांचा प्रश्न  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 15:43 IST

चित्रदुर्ग मठातील स्थलांतरितांना भेट

कोल्हापूर : साहेब आम्ही पूरग्रस्त म्हणून किती दिवस जगायचे, आमच्याकडे कधी लक्ष देणार? आम्हाचे पुनर्वसन कधी होणार? असे प्रश्न सुतारवाड्यातील पूरबाधित महिलांनी शुक्रवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना विचारला. यावर पालकमंत्री मुश्रीफ यांनी पूर आल्यानंतरच तुम्ही आम्हाला विचारता? इतरवेळी पाठपुरावा करा, वारंवार विचारणा करा, असे उत्तर देऊन निघून गेले.पालकमंत्री मुश्रीफ यांनी चित्रदुर्ग मठातील स्थलांतरित पूरग्रस्तांची भेट घेऊन जाताना सुतारवाड्यातील महिलांना अशी विचारणा केली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.मंत्री मुश्रीफ यांनी शहरातील विविध ठिकाणच्या पूरग्रस्त परिसराची पाहणी केली. चित्रदुर्ग मठातील स्थलांरित पूरग्रस्तांची पाहणी केली. यावेळी प्रशासन के. मंजुलक्ष्मी यांच्याकडून पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या सेवासुविधांची माहिती घेतली.यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, काल रात्री खूप पाऊस झाला. ज्या-ज्या वेळी कमी दाबाचा पट्टा तयार होतो. खूप पाऊस पडतो. यावेळीही अशीच स्थिती निर्माण झाली. जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पूर आला; पण मी आज पांडुरंगाला साकडे घातले आहे. सगळे व्यवस्थित होईल. पुण्याची पुराची घटना वेगळी आणि कोल्हापूरची घटना वेगळी आहे. आमच्यात जरूर मतभेद आहेत. महापालिका, जिल्हा प्रशासन यांच्यात चांगला समन्वय आहे. परिणामी प्रशासन अलर्ट मोडवर आहे. कर्नाटकातील आलमट्टीतून अधिकाधिक विसर्ग होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हिप्परगी धरणातूनही विसर्ग वाढवण्याच्या सूचना दिल्या जातील. येथून एका अधिकाऱ्यास तिकडे पाठवून विसर्गाची नेमकी माहिती घेऊ.

महायुतीचे सरकार येईल..पाच वर्षे कोणालाही थांबायची इच्छा नाही. सध्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी दोन, शिवसेना दोनसह आठ पक्ष आहेत. त्यामुळे इच्छुक वाढले आहेत. विधानसभेला बहुरंगी लढत होईल. यामधून महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास पालकमंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरHasan Mushrifहसन मुश्रीफ